शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात पंचवीसपेक्षा जास्त गाड्यांनी घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:00 IST

उन्हाळा आला की गाड्या पेटण्याच्या घटना बऱ्याचवेळा ऐकायला मिळतात. यंदाची फेब्रुवारी २०१८पासूनची आकडेवारी काढली असता पुणे शहरात सुमारे पंचवीसपेक्षा अधिक गाड्यांनी पेट घेतल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून गाड्या पेटवण्याच्या प्रमाणात वाढ दोन महिन्यात पंचवीसपेक्षा अधिक वाहनांनी घेतला पेट

पुणे : उन्हाळा आला की ज्याप्रमाणे तापमान वाढतं त्याप्रमाणे गाड्या पेटण्याच्या संख्येत वाढ होत असते. यंदाही या घटना वाढण्यास सुरुवात झाली असून गेल्या दोन महिन्यात गाड्या पेटण्याच्या घटनांचा रौप्यमहोत्सव झाला आहे. गाड्या पेटण्याच्या कारणांमध्ये वाढते तापमान, शॉर्टसर्किटही ही कारणे तर आहेतच. पण सध्या पूर्ववैमनस्य किंवा रागातून वाहने पेटवण्याचे प्रकारही वाढत आहेत. काहीही कारण नसताना दारूच्या नशेतही गाड्या पेटवण्याचे उदाहरणही एकदा घडलेले आहे. मात्र गेल्या काही वर्षात या गाड्या पेटण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अनेकदा गाड्या पेटल्यावर नेमकं काय करायचं हे माहिती नसल्याने या धुरात काहींना जीव गमवावा लागला आहे.काही वर्षांपूर्वी नवी पेठ भागात लागलेल्या आगीत धुरामुळे एका व्यक्तीचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही अनेकांना माहिती आहे. याशिवाय विविध कारणांमुळे पीएमपी बसही पेट घेत असतात. उन्हाळ्यात त्याचीही आकडेवारी मोठी असून त्यामुळे पुणेकर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या सगळ्यात गाड्या पेटवून देणे सर्वाधिक धोकेदायक असून ही विकृती कमी करण्याची गरज आहे असे मत मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दल