शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दोन महिन्यात पंचवीसपेक्षा जास्त गाड्यांनी घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:00 IST

उन्हाळा आला की गाड्या पेटण्याच्या घटना बऱ्याचवेळा ऐकायला मिळतात. यंदाची फेब्रुवारी २०१८पासूनची आकडेवारी काढली असता पुणे शहरात सुमारे पंचवीसपेक्षा अधिक गाड्यांनी पेट घेतल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून गाड्या पेटवण्याच्या प्रमाणात वाढ दोन महिन्यात पंचवीसपेक्षा अधिक वाहनांनी घेतला पेट

पुणे : उन्हाळा आला की ज्याप्रमाणे तापमान वाढतं त्याप्रमाणे गाड्या पेटण्याच्या संख्येत वाढ होत असते. यंदाही या घटना वाढण्यास सुरुवात झाली असून गेल्या दोन महिन्यात गाड्या पेटण्याच्या घटनांचा रौप्यमहोत्सव झाला आहे. गाड्या पेटण्याच्या कारणांमध्ये वाढते तापमान, शॉर्टसर्किटही ही कारणे तर आहेतच. पण सध्या पूर्ववैमनस्य किंवा रागातून वाहने पेटवण्याचे प्रकारही वाढत आहेत. काहीही कारण नसताना दारूच्या नशेतही गाड्या पेटवण्याचे उदाहरणही एकदा घडलेले आहे. मात्र गेल्या काही वर्षात या गाड्या पेटण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अनेकदा गाड्या पेटल्यावर नेमकं काय करायचं हे माहिती नसल्याने या धुरात काहींना जीव गमवावा लागला आहे.काही वर्षांपूर्वी नवी पेठ भागात लागलेल्या आगीत धुरामुळे एका व्यक्तीचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही अनेकांना माहिती आहे. याशिवाय विविध कारणांमुळे पीएमपी बसही पेट घेत असतात. उन्हाळ्यात त्याचीही आकडेवारी मोठी असून त्यामुळे पुणेकर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या सगळ्यात गाड्या पेटवून देणे सर्वाधिक धोकेदायक असून ही विकृती कमी करण्याची गरज आहे असे मत मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दल