शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

PMC | घरपट्टी सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे- मोहन जोशी

By राजू इनामदार | Updated: April 19, 2023 18:05 IST

सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे आहे, भाजपने त्यावर हक्क दाखवू नये असे ते म्हणाले...

पुणे : स्वायत्त असलेल्या महापालिकाने विशेष ठराव करून पुणेकर मालमत्ताधारकाला घरपट्टीत अनेक वर्षांपूर्वी दिलेली ४० टक्केची सवलत काढून घेण्याचा राज्य सरकारला अधिकारच नव्हता. मात्र तरीही त्यांनी ते केले व अखेर पुणेकरांच्या रेट्यापुढे भारतीय जनता पक्षाला झुकावेच लागले अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे आहे, भाजपने त्यावर हक्क दाखवू नये असे ते म्हणाले.

मंत्रीमंडळाने ही सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांची प्रत्यक्ष अमलबजावणी मात्र होत नव्हती असे स्पष्ट करून जोशी म्हणाले, काँग्रेसने त्यासाठी सातत्याने आंदोलने केली. अखेर प्रभू रामचंद्रांला आम्ही साकडे घातले. शेवटी सरकारला निर्णय घ्यावाच लागला. यावरून श्रीराम त्यांच्याबरोबर नाही तर आमच्याबरोबरच असल्याचे सिद्ध होते.

कसब्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला मात दिली. सलग २८ वर्षे ताब्यात असलेला हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने काढून घेतला. त्याचवेळी पुणेकर भाजपवर किती रूष्ट झाले आहे ते दिसले. त्यामुळेच भाजपला झुकावे लागले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील घरपट्टीच्या प्रश्नाविषयी उदासिन होते. पुणेकरांवर विनाकारण वार्षिक काही हजारांचा बोजा पडणार आहे याबद्दल काहीच माहिती नसल्यासारखे त्यांनी हात वर केले होते. त्यामुळे आता निर्णय अमलात येण्याचे श्रेय त्यांनी घेऊ नये, ते श्रेय पुणेकरांचे आहे असे जोशी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसkasba-peth-acकसबा पेठ