शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच : शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 20:48 IST

सीएए कायद्यावरुन खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींंवर जाेरदार टीका केली.

पुणे : आपले पंतप्रधान विश्वसार्हता गमावून बसले आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये ताेचताेचपणा आहे. माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच असे म्हणत खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींवर टीका केली. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वामध्ये गांधी शांती यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे. ही यात्री आज पुण्यातील गांधीभवन येथे आली. त्यावेळी आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये शत्रुघ्न सिन्हा बाेलत हाेते. यावेळी यशवंत सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, गांधीभवनचे प्रमुख डाॅ. कुमार सप्तर्षी उपस्थित हाेते. 

सिन्हा म्हणाले, मी या गांधी शांती यात्रेसाेबत आहे. आज देशाला शांततेची गरज आहे. देशातील तरुण आज आक्राेशीत आहेत. तरुणांनी जी चळवळ सुरु केली आहे, अशी चळवळ अनेक दशकांनंतर पाहायला मिळाली. ही चळवळ पाहून जे. पींच्या चळवळीची आठवण झाली. देशातील सध्याच्या वातावारणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बाेबडे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आपल्या प्रधानमंत्र्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. माेदी बाेलतात वेगळंच आणि करतात वेगळंच. देशात डिटेंशन कॅम्प नाहीत असे माेदी म्हणाले हाेते, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी असे कॅम्प बांधल्याचे समाेर आले आहे. 

सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबवणार नाही : यशवंत सिन्हा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज देशात प्रक्षाेभक वातावरण आहे. आपले संविधान धाेक्यात आले आहे. देशाचे विभाजन करण्याचे काम सरकार करत आहे. सरकारचे हे कारस्थान ओळखून विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. संसदेत बहुमत मिळाल्यानंतर आता सरकारचा छुपा अजेंडा समाेर येत आहे. याची माेठी किंमत देशाला माेजावी लागणार आहे. जेएनयुतील हल्ल्याबाबत बाेलताना ते म्हणाले, सरकारने गुंड पाठवून जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चाेपून काढले. विद्यार्थ्यांचे आंदाेलन चिरडून टाकण्याचे काम सरकार करत आहे. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक