शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

मोदी सरकार कामगारविरोधी, इंटकची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:19 AM

केंद्रातील मोदी सरकार बेरोजगारांना नोकरीचे आश्वासन देत सत्तेवर आले, मात्र सत्ता मिळताच ते बेरोजगारांना तर विसरलेच पण ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्यावरही गदा आणत आहेत, हे सरकार भांडवलदारांचे लाड करणारे आहे

पुणे - केंद्रातील मोदी सरकार बेरोजगारांना नोकरीचे आश्वासन देत सत्तेवर आले, मात्र सत्ता मिळताच ते बेरोजगारांना तर विसरलेचपण ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्यावरही गदा आणत आहेत, हे सरकार भांडवलदारांचे लाड करणारे आहे, देशातील असंघटित कामगारच त्यांना त्यांची जागा दाखवेल अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व आॅल इंडिया इंटकचे उपाध्यक्ष रामचंद्र खुंटिया यांनी केली.राष्ट्रीय मजदूर संघाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.खुंटिया यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार भाई जगताप, अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे उपाध्यक्ष इरफान आलम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे आदी या वेळी उपस्थित होते.संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी संघटनेच्या कामाचा धावता आढावा घेत कामगारांचे हित केंद्रव राज्य सरकारने धोक्यात आणले असल्याची टीका केली. असंघटित कामगारांची संख्या वाढत आहे,त्यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत व सरकार त्यांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे असे इरफान आलम यांनी सांगितले. या कामगारांना संघटित करून त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यात येतील, असे ते म्हणाले.आमदार जगताप, हर्षवर्धन पाटील यांचीही या वेळी भाषणे झाली. सुजाता आल्हाट, वैशाली कटके, जयद्रथ सावंत, भीमराव कांबळे यांचा कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यातआला. सीताराम चव्हाण यांनी स्वागत केले. काका धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले. एस. के. पळसे यांनी आभार मानले.काँग्रेसने कधीही कामगारांना देशोधडीला लावले नाही, कामगारहिताचे कायदे काँग्रेसच्याच काळात झाले, आता मात्र केंद्र सरकारने त्या कायद्यांची मोडतोड चालवली आहे. मालकधार्जिण्या या धोरणाचा देशातील सर्व कामगार एकत्र येऊन विरोध करतील व हे सरकार खाली खेचेल असा विश्वास खुंटिया यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार