शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा महाविकास आघाडीतील समावेश, काँग्रेससाठी राजकीय गोची करणारा ठरणार

By राजू इनामदार | Updated: August 8, 2025 17:11 IST

विचारधारेचा प्रश्न : सांगताही येत नाही, सहनही होत नाही

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाविकास आघाडीतील समावेश काँग्रेससाठी राजकीय गोची करणारा ठरणार आहे. त्यामुळेच या विषयावर काँग्रेसकडून अद्याप कसलेही भाष्य करण्यात आलेले नाही व वरिष्ठांनी अन्य कोणाला बोलूही दिलेले नाही. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मात्र या समावेशाला जवळपास हिरवा कंदील दाखवला आहे.

राज्य सरकारने हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची केल्यानंतर त्याच्या विरोधात मनसेने पहिला आवाज उठवला. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानेही हिंदीसक्तीचा विरोध केला. त्यानंतरच तब्बल २० वर्षे दुरावलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने सक्तीसंबधीचे दोन्ही अध्यादेश रद्द केल्यानंतर मनसे-शिवसेना यांनी एकत्रितपणे मराठी विजय मेळावा घेतला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. काँग्रेसने मात्र या मेळाव्यापासून अंतर राखणेच पसंत केले.

काँग्रेसमधील काही ज्येष्ठांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रादेशिक आहेत. मनसेही प्रादेशिकच आहे. काँग्रेस मात्र राष्ट्रीय पक्ष आहे. स्थानिक राजकीय फायदा लक्षात घेऊन काँग्रेसने काही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम देशात होऊ शकतो. बिहार विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. तिथे काँग्रेसला चांगले यश मिळणे अपेक्षित आहे. असे असताना मुंबईमधील बिहारी नागरिकांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या, प्रसंगी त्यांना धाकदपटशा करणाऱ्या मनसेबरोबर राजकीय संधान बांधणे काँग्रेसला महागात पडू शकते. त्याचा बिहारमधील मतांवर थेट परिणाम होईलच, शिवाय पक्षाच्या राष्ट्रीय राजकीय प्रतिमेसाठीही ते हानिकारक ठरू शकते, असे पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.

त्यामुळेच पक्षाने या विषयावर मौन बाळगले आहे. महाविकास आघाडीत राज्यस्तरावर काँग्रेस हा प्रमुख घटक पक्ष आहे. त्याला डावलून काही निर्णय घेणे आघाडीच्या एकीकरणाच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. त्यावर तोडगा म्हणून मनसे-शिवसेना युती व फक्त शिवसेना महाविकास आघाडीत अशी काही राजकीय तडजोड करण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. राज्यात काँग्रेससाठी चांगले वातावरण नाही. बहुसंख्य मोठ्या शहरांमध्ये काँग्रेसची वाताहत झाली आहे. मनसेच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्या तर पक्षाचे पानिपत होऊ शकते, अशी राजकीय स्थिती असल्याचे स्थानिक नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणले आहे.

त्यामुळेच काँग्रेसची सध्याची स्थिती सांगताही येत नाही व सहनही होत नाही, अशी झाली आहे. त्यातूनच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना या युतीवर सध्या काहीही बोलायचे नाही, अशी तंबी दिली असल्याची माहिती काही नेत्यांनी दिली. मनसेपासून ठरावीक अंतरावर राहायचे, असे त्यांना बजावले असल्याचे समजते. केंद्रीय नेतेच याबाबतीत काय तो निर्णय घेतील व राज्याला कळवतील, तोपर्यंत मनसेचा विषय बंदच ठेवायचा, असे त्यांना सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024