शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

नादच खुळा! बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; आंदोलनासाठी 'भाऊ' चढले 'टॉवर'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 10:31 IST

बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील घटना

उंडवडी कडेपठार: बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत आणि रस्त्यावरील अतिक्रमणाच्या संदर्भात तसेच इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य अनिल गवळी यांनी आज सकाळी गावातील बीएसएनएलच्या टाॅवरवरती चढून आंदोलनाला सुरवात केली आहे..

गवळी म्हणाले,गायरान क्षेत्रावर झालेले अतिक्रमण तसेच गावठाण रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत गवळी यांनी वारंवार तक्रारी अर्ज केले होते.त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये ठराव होऊनही अद्यापही अतिक्रमणे काढली गेली नाहीत. ग्रामपंचायत बऱ्हाणपूर येथील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत,घरकुल योजनेमध्ये घरे पुर्ण झालेली आहेत असे दाखवून शासनाची ग्रामपंचायतीने फसवणुक केली असल्याचा आरोप देखील गवळी यांनी केला आहे.त्याच बरोबर अतिक्रमण करणाऱ्यांना हाताशी धरून माझेवर खोटे गुन्हे दाखल करून स्वत: केलेला भ्रष्टाचार दाबत आहे.

ग्रामपंचायतीच्या अंतर्गत निष्काळजीपणे झालेल्या कामामुळे १० वर्षापुर्वी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार देखील दाबण्यात आलेला आहे.आणि मी वारंवार तक्रारी करीत असल्यामुळे ग्रामसेवक आणि सरपंच विनाकारणाने खोटे गुन्हे दाखल केलेल्या सर्व गुन्हयांची पुन्हा चौकशी करण्यात यावी.

एका ठिकाणी रस्ते मंजूर असताना ते रस्ते त्याठिकाणी न करता दुसऱ्याच ठिकाणी केलेले आहे.शासकीय काम पुर्ण झाल्यानंतर शासकीय फलक लावणे बंधनकारक असताना कोणत्याही कामाचे शासकीय फलक त्याठिकाणी लावण्यात आलेले नाहीत.शासनाकडूनमिळालेले ग्रंथालय,भांडी, लाऊडस्पीकर व इतर वस्तु वारंवार चोरीला गेले असून त्याबाबत विचारणा केली असता त्याबाबत ग्रामपंचायतसुध्दा तक्रार देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत.गेली १० वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सर्व कारभारची चौकशी करण्यात यावी.

या सर्व मागण्यांकरीता अनिल भानुदास गवळी यांनी आज सकाळी गावातील टाॅवरवर चढून आदोलनाला सुरवात केली आहे.या माहितीसाठी गटविकास अधिकारी राहूल काळभोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Baramatiबारामतीgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन