शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

नकार पचविण्याची मानसिकता हरवतेय!

By admin | Updated: April 9, 2017 04:35 IST

तंत्रज्ञानाच्या युगात संवाद कमी होत असतानाच युवा पिढीतील नकार पचविण्याची मानसिकता संपत चालली असल्याचे वाकडमधील तरुणीवर झालेल्या जीवघेण्या

- अनिल पवळ, पिंपरी

तंत्रज्ञानाच्या युगात संवाद कमी होत असतानाच युवा पिढीतील नकार पचविण्याची मानसिकता संपत चालली असल्याचे वाकडमधील तरुणीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावरून पुन्हा अधोरेखित झाले आहे. ही विकृत मानसिकता शहरातील तरुणींच्या जिवावर बेतू लागल्याने तरुणींनी निर्धोकपणे वावरायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयटी हब म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात मल्टिनॅशनल कंपन्या आणि महाविद्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या कंपन्यांमधील कर्मचारी प्रामुख्याने युवा वर्ग असल्याचे पाहायला मिळते. या आयटी कंपन्या पंचतारांकित असल्याने येथील वातावरणही मोकळे-ढाकळे आणि मैत्रिपूर्ण असते. आधुनिक मानसिकता आणि उच्च शिक्षण यामुळे येथील तरुणींचा पेहराव आणि राहणीमानही आधुनिकतेकडे झुकणारे असणारे आहे. मात्र, या खुल्या आणि मैत्रिपूर्ण वर्तनामुळे विकृत मानसिकता असणाऱ्या तरुणांकडून चुकीची समजूत करुन घेतली जाते आणि यातून एकतर्फी पे्रमाचा तरुणींच्या ससेमिरा मागे लागतो. तोच शहरातील तरुणींच्या जिवावर बेतल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरुन पाहायला मिळाले आहे. आकुर्डी येथील एका नामांकित महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योत्स्ना बागुल हिची भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. त्यानंतर तळवडे येथील सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारी अंतरा दास, हिंजवडी येथील रसिला ओपी या सर्व तरुणी अशा एकतर्फी प्रेमाच्या विकृतीलाच बळी पडल्या आहेत. अश्विनीवरही अशीच वेळ आली होती. चिखली येथील तरुणीला अशाच एका माथेफिरूने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्याला सामोरे जावे लागले. या प्रकरणात मुलीला त्या तरुणाकडून सहा महिन्यांपासून त्रास दिला जात होता. तिने ही बाब कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी अथवा पोलिसांना सांगणे आवश्यक होते. मात्र, तिने हा त्रास कोणालाच सांगितला नव्हता. तिच्या वडिलांच्या मते, घरातील वातावरण अगदी ‘फ्री’ होते. तिने हा प्रॉब्लेम सांगायला हवा होता. मात्र, समुपदेशकांच्या मते, केवळ मोकळे वातावरण असून चालत नाही; पालकांचा पाल्यांशी किती ‘सुसंवाद’ आहे, पालक त्यांना किती वेळ देतात, यावरून आपल्या अडचणी सांगायच्या की नाही हे मुली ठरवत असतात. सध्याच्या तरुणाईमध्ये ‘इगो’ हा घटक महत्त्वाचा आणि अतिपरिणामकारक ठरत आहे. एखाद्या मुलीने नकार दिला, की या तरुणांचा इगो दुखावला जातो. तो इतक्या थराला जातो, की समोरच्या व्यक्तीचा जीव घेण्याइतपत त्यांची मन:स्थिती विकृत होऊन बसते. काही पालकांकडून हवी ती मागणी हवी तेव्हा पाल्यांना पुरविली जाते. ही सवयही अशा विकृतीला खतपाणी घालत असल्याचे मनोविकार तज्ज्ञांचे मत आहे. सध्याच्या मुली मुलांशी फ्रँ कली बोलतात. याचा वेगळाच अर्थ काही तरुणांकडून काढला जातो. शिवाय एखाद्या तरुणीने होकार अथवा नकार देणे हे काही तरुणांसाठी प्रतिष्ठेचे होऊन बसले आहे. त्यांना नकार दिला तर त्यांचा अहंकार दुखावला जातो. आपल्याला नकार देणारी ही कोण, असे म्हणत या विकृतांकडून मुलीला संपवण्याचाच प्रयत्न केला जातो. - आरती बोडरे, तरुणी सध्याच्या युवा पिढीची मानसिकता तयार करण्यात सोशल मीडिया हा घटक महत्त्वाचा ठरत आहे. आपल्या फोटोला लाईक्स मिळत नसतील तर मी कोणालाच आवडत नाही, असा समज या तरुणांकडून करून घेतला जातो. त्यातूनही अशा विकृत मानसिकतेला खतपाणी मिळते. शिवाय मित्रांना गर्लफ्रेंड आहे, पण मला नाही; याचा न्यूनगंड बाळगून तो गर्लफे्रंड शोधू लागतो. अशातच आवडणाऱ्या एखाद्या मुलीने नकार दिला तर तो टोकाचे पाऊल उचलतो. - रणजित सफाले, तरुण बऱ्याचदा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई-वडील दोघेही नोकरी करीत असतात. त्यांच्या पाल्याचा प्रत्येक गोष्टीचा हट्ट पुरविला जातो. येथूनच नकार न पचण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. तसेच यातून एकलकोंडेपणाची अवस्था निर्माण होऊन समाजात कसे वावरायचे, एखाद्या घटनेवर कसे रिअ‍ॅक्ट व्हायचे, याबाबत अशा पाल्यांच्या मनात गोंधळ निर्माण होत असतो. यातून दुसऱ्याला अथवा स्वत:ला संपवण्यासारखे टोकाचे निर्णय घेतले जातात. याशिवाय आपल्या शिक्षण व्यवस्थेत केवळ पुस्तकी गुणांना किंमत दिली जाते. मात्र अनुभवाच्या जोरावर त्या मुलाचा व्यक्तिमत्त्व विकास कसा घडेल, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. - डॉ. किशोर गुजर, मनोविकृती चिकित्सक घरातील वातावरण मोकळे आहे. आमच्या मुलींना मोकळीक असते, असे केवळ म्हणून चालत नाही. मुलींना आपण किती वेळ देतो, त्यांच्याशी आपला कितपत आणि कसा संवाद आहे, हे महत्त्वाचे असते. शिवाय मुली मॉडर्न राहतात म्हणून त्रास होत आहे. त्यामुळे राहणीमानात बदल कर, असे सुचविणे म्हणजे आपल्या मुलींचे खच्चीकरण करण्याजोगे असते. त्यापेक्षा मुलींशी पालकांचा सुसंवाद असेल, तर मुलीला येणाऱ्या अडचणी तिच्याकडून लगेच समजतील आणि त्यावर मार्ग काढणेही पालकांना सोपे जाऊ शकते.- डॉ. साधना एलकुंचवार, समुपदेशक