शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आदर्श वसाहत म्हणून म्हाळुंगे विकसित करू - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:22 IST

म्हाळुंगे गावातील पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते बांधणी आणि गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून, म्हाळुंगे परिसर आदर्श वसाहत म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.

पुणे - म्हाळुंगे गावातील पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते बांधणी आणि गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून, म्हाळुंगे परिसर आदर्श वसाहत म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने म्हाळुंगे ग्राम पंचायत सक्षमीकरण योजनेंतर्गत घन कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी वितरण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सरपंच मयूर भांडे उपस्थित होते. या वेळी गिरीश बापट यांच्या हस्ते पाच घंटागाड्या ग्रामपंचायतीला देण्यात आल्या.बापट म्हणाले की, म्हाळुंगेच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत. त्याचबरोबर हिंजवडी आयटीपार्कजवळच आहे. यामुळे गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी इमारती बांधण्यात येत आहेत. याठिकाणी होणाऱ्या बांधकामावरील शुल्कातून म्हाळुंगे गावाची विविध कामे हाती घ्यावी व यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, म्हाळुंगे गावाच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे आता कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करावी.म्हाळुंगे-नांदे-चांदे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनपीएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत असलेल्या म्हाळुंगे-नांदे-चांदे या रस्त्याच्या कामाचे; तसेच सुधारणेसंबंधी कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. याच भागात हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाºया रस्त्यावर चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी गिरीश बापट यांनी केली.हिंजवडीआयटी इंडस्ट्रिज असोसिएशन पदाधिकाºयांशी चर्चाहिंजवडी आयटी पार्क परिसरात विविध आयटी कंपन्या कार्यरत आहेत. येथील उद्योजकांना उच्च दर्जाच्या सोईसुविधा मिळाव्यात, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी आयटी इंडस्ट्रिज असोसिएशन आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या नियमित बैठकीमध्ये येथील उद्योजकांना येणाºया अडचणींचे निराकरण करण्यात येते. या बैठकीत आयटी पार्क परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, पोलीस स्टेशन उभारणी, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा, परिसरात काम करणाºयांसाठी चांगल्या दर्जाची वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजविणे इत्यादी कामे त्वरित करण्याबाबत गिरीश बापट यांनी यंत्रणांना निर्देश दिले.घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी उपलब्ध करून देण्यामागचा हेतू स्पष्ट करून, म्हाळुंगे गाव व आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी पीएमआरडीए विविध योजना राबविणार आहे.- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटnewsबातम्या