शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

#Metoo : मी टू चळवळ पुढील पिढ्यांसाठी - तनुश्री दत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 18:49 IST

तनुश्री आपली व्यथा मांडताना म्हणाली, ज्याच्यावर प्रसंग ओढावतो त्यालाच त्याची वेदना समजते. मी ज्या काळात माझ्यावर झालेल्या

पुणे - मी टू ही केवळ माझी लढाई नाही आणि पुरुष विरुद्ध महिला असा संघर्षही नाही. हे एक आव्हान असून मला न्याय मिळेल याची पूर्ण खात्री आहेच. पण, यातून पुढच्या पिढ्यांना न्याय मिळेल. आम्हाला जे भोगावे लागले तो त्रास त्यांना होऊ नये, यासाठीची ही चळवळ आहे, अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी मी टू चळवळीमागचे मर्म उलगडले. 

लोकमत विमेन समिट २०१८ मध्ये आयोजित मीटू ते वुई टू-गेदर या विषयावरील परिसंवादात तनुश्री बोलत होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, पुरुष हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या बरखा ट्रेहान यामध्ये सहभागी झाल्या होत्या. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. 

तनुश्री म्हणाली, समाजाचे स्वास्थ्य बिघडले असल्याने महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यांच्यापुढे दररोजच्या जगण्याचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे समाजातील पुढारलेल्या महिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी महिलाविरोधी मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी थोडा त्रास झाला तरी चालेल, यासाठीच मी टू ही चळवळ आहे. तनुश्री आपली व्यथा मांडताना म्हणाली, ज्याच्यावर प्रसंग ओढावतो त्यालाच त्याची वेदना समजते. मी ज्या काळात माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलले त्यावेळी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्ह्याची नोंदणी केली. यात माझा काय दोष? माझ्या पुढाकाराने समाजातील अनेक स्त्रिया बोलत्या झाल्या. त्यांना एक मानसिक आधार मिळाला. याचे समाधान वाटते. दहा वर्षांपूर्वी झालेल्या या प्रसंगात मला माझ्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. मात्र ज्या क्षेत्रात काम करते अशा बॉलिवूड मधून फार कमी प्रमाणात मला पाठिंबा मिळाला. अशी खंत तनुश्री हिने व्यक्त केली. धाडसाने पुढे येऊन पाठीशी उभे राहण्यासाठी एक प्रकारची हिंमत लागते. ती बॉलिवूड मधील फारच कमी लोकांकडे आहे. मी जे काही केले त्यामुळे समाजात नक्कीच बदल होईल अशी अपेक्षा आहे. निदान समाजातील तो पीडित घटक आपल्या वरील अन्यायाकरिता नक्कीच आवाज उठवेल असे वाटते. 

राष्ट्रीय महिला नियोजनाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी समाजातील स्त्री पुरुष विषमतेकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, आपल्याला अजून स्त्री पुरुष समानतेची पूर्णपणे जाणीव झाली आहे असे वाटत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांवरील अन्यायाविषयी समाजातून कडाडून विरोध केला जात नाही. स्त्रियांची लढाई ही काही पुरुषांच्या विरोधात नाही तर ती अन्याय विरोधात आहे. अजूनही एखादी महिला पोलीस स्टेशन मध्ये आपली तक्रार नोंदविण्यास गेली असता तिला पोलिसांकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही. 

पुरुष अधिकार संघटनेच्या बरखा तेहांन म्हणाल्या स्त्रीयांच्या बाजूने सर्व अधिकार असल्याने आता पुरुषांची गळचेपी होताना दिसत आहे. दरवेळी महिलांवर अन्याय होतो अशी ओरड केली जाते यामुळे मात्र पुरुषांना न्याय मिळविण्यासाठी आता झगडावे लागत आहे. या मी टू च्या चळवळी मध्ये काही मुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा बरखा यांनी यावेळी केला. जसे प्रत्येक पुरुष देखील राम नाही. तसेच प्रत्येक स्त्री ही देखील सीता नाही अशी टिप्पणी बरखा यांनी केली.

टॅग्स :Lokmat Women Summit 2018लोकमत विमेन समिट २०१८Metoo CampaignमीटूTanushree Duttaतनुश्री दत्ता