शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

#Metoo : मी टू चळवळ पुढील पिढ्यांसाठी - तनुश्री दत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 18:49 IST

तनुश्री आपली व्यथा मांडताना म्हणाली, ज्याच्यावर प्रसंग ओढावतो त्यालाच त्याची वेदना समजते. मी ज्या काळात माझ्यावर झालेल्या

पुणे - मी टू ही केवळ माझी लढाई नाही आणि पुरुष विरुद्ध महिला असा संघर्षही नाही. हे एक आव्हान असून मला न्याय मिळेल याची पूर्ण खात्री आहेच. पण, यातून पुढच्या पिढ्यांना न्याय मिळेल. आम्हाला जे भोगावे लागले तो त्रास त्यांना होऊ नये, यासाठीची ही चळवळ आहे, अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी मी टू चळवळीमागचे मर्म उलगडले. 

लोकमत विमेन समिट २०१८ मध्ये आयोजित मीटू ते वुई टू-गेदर या विषयावरील परिसंवादात तनुश्री बोलत होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, पुरुष हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या बरखा ट्रेहान यामध्ये सहभागी झाल्या होत्या. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. 

तनुश्री म्हणाली, समाजाचे स्वास्थ्य बिघडले असल्याने महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यांच्यापुढे दररोजच्या जगण्याचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे समाजातील पुढारलेल्या महिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी महिलाविरोधी मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी थोडा त्रास झाला तरी चालेल, यासाठीच मी टू ही चळवळ आहे. तनुश्री आपली व्यथा मांडताना म्हणाली, ज्याच्यावर प्रसंग ओढावतो त्यालाच त्याची वेदना समजते. मी ज्या काळात माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलले त्यावेळी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्ह्याची नोंदणी केली. यात माझा काय दोष? माझ्या पुढाकाराने समाजातील अनेक स्त्रिया बोलत्या झाल्या. त्यांना एक मानसिक आधार मिळाला. याचे समाधान वाटते. दहा वर्षांपूर्वी झालेल्या या प्रसंगात मला माझ्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. मात्र ज्या क्षेत्रात काम करते अशा बॉलिवूड मधून फार कमी प्रमाणात मला पाठिंबा मिळाला. अशी खंत तनुश्री हिने व्यक्त केली. धाडसाने पुढे येऊन पाठीशी उभे राहण्यासाठी एक प्रकारची हिंमत लागते. ती बॉलिवूड मधील फारच कमी लोकांकडे आहे. मी जे काही केले त्यामुळे समाजात नक्कीच बदल होईल अशी अपेक्षा आहे. निदान समाजातील तो पीडित घटक आपल्या वरील अन्यायाकरिता नक्कीच आवाज उठवेल असे वाटते. 

राष्ट्रीय महिला नियोजनाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी समाजातील स्त्री पुरुष विषमतेकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, आपल्याला अजून स्त्री पुरुष समानतेची पूर्णपणे जाणीव झाली आहे असे वाटत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांवरील अन्यायाविषयी समाजातून कडाडून विरोध केला जात नाही. स्त्रियांची लढाई ही काही पुरुषांच्या विरोधात नाही तर ती अन्याय विरोधात आहे. अजूनही एखादी महिला पोलीस स्टेशन मध्ये आपली तक्रार नोंदविण्यास गेली असता तिला पोलिसांकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही. 

पुरुष अधिकार संघटनेच्या बरखा तेहांन म्हणाल्या स्त्रीयांच्या बाजूने सर्व अधिकार असल्याने आता पुरुषांची गळचेपी होताना दिसत आहे. दरवेळी महिलांवर अन्याय होतो अशी ओरड केली जाते यामुळे मात्र पुरुषांना न्याय मिळविण्यासाठी आता झगडावे लागत आहे. या मी टू च्या चळवळी मध्ये काही मुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा बरखा यांनी यावेळी केला. जसे प्रत्येक पुरुष देखील राम नाही. तसेच प्रत्येक स्त्री ही देखील सीता नाही अशी टिप्पणी बरखा यांनी केली.

टॅग्स :Lokmat Women Summit 2018लोकमत विमेन समिट २०१८Metoo CampaignमीटूTanushree Duttaतनुश्री दत्ता