शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

स्पर्धापरीक्षेत ताण-तणावात मानसिक कणखरता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग अथवा इतर कोणत्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करताना ...

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग अथवा इतर कोणत्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करताना प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. एकट्या एमपीएससी परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून १५-१६ लाख विद्यार्थी अर्ज करत आहेत. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांवर मानसिक आणि आर्थिक ताण येत आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्यांने गृहीत धरूनच अभ्यास करावा. कारण, केवळ एमपीएससी अथवा यूपीएससी म्हणजे सर्वकाही नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंवा करियर म्हणून इतर पर्याय वैकल्पिक ठेवणे गरजेचे आहे, असे मत पुण्यातील स्पर्धापरीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या विविध संस्थाचालकांनी व्यक्त केले आहे.

स्वप्निल लोणकर या पुण्यातील फुरसुंगी येथील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक आहे. अभ्यास असो की आर्थिक अडचण किंवा परीक्षा पुढे ढकलली, तरी खचून न जाता मानसिक संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने ताण- तणावाच्या काळात समुपदेशन (कौन्सिलिंग) करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये, असे मत काही संस्थाचालकांनी व्यक्त केले.

---

स्पर्धापरीक्षेच्या जागा आता दर वर्षी कमी होत आहेत. जागा कमी आणि विद्यार्थी जास्त यामुळे प्रचंड स्पर्धा निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने एमपीएससी, यूपीएससी व्यतिरिक्त इतर पर्याय तयार केले पाहिजे. नैराश्य आले तर संकोच न करता चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्यावे. आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर अर्धवेळ नोकरी करूनही अभ्यास करता येऊ शकतो. त्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

- निखिल नानगुडे, खासगी संस्थाचालक

----

काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसतानाही स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी पुण्या-मुंबईकडे किंवा इतर मोठ्या शहरात येतात. वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांने तसे नियोजन करावे. अन्यथा, विनाकारण मग विद्यार्थी या चक्रव्यूहात अडकून पडतो. इतर वैकल्पिक पर्याय विद्यार्थ्यांनी निवडणे गरजेचे आहे.

- आय. पी. सिंह, खासगी संस्थाचालक

-----

स्पर्धापरीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी चांगले मित्र करायला हवेत. कारण अडचणीत, ताण-तणावाच्या वेळी आणि अभ्यास करतानाही खूप मोलाची ठरते. त्यामुळे आलेले नैराश्य देखील दूर होण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करताना फायदा होईलच. तसेच यशाची टक्केवारीही वाढेल.

- सचिन हिसवणकर, खासगी, संस्थाचालक

----

कोट

यूपीएससीप्रमाणेच एमपीएससीने देखील परीक्षांचे वेळापत्रक राबवणे गरजेचे आहे. केवळ घोषणा करून भागणार नाही. एका वर्षात पूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पाळली गेली तर विद्यार्थी यशस्वी होऊन लवकर बाहेर पडू शकतो. अन्यथा, या चक्रव्यूहात अडकून वय, पैसा, वेळ आणि शिक्षण या सर्व गोष्टी वाया जाईल.

- शिवाजी इंगवले, विद्यार्थी