शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

‘मृत्युंजय’कारांचे स्मृतिदालन, नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 00:47 IST

जन्मगावी साकारणार : नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद

पुणे : ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मगावी आजरा (जि. कोल्हापूर) येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने स्मृतिदालन उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.

‘मृत्युंजय’कार सावंत हे काही काळ शॉर्टहँडचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलमध्ये कार्यरत होते. त्यांची आणि आजरा परिसरातील अन्य नामवंतांची स्मृती अत्यंत अभिनव स्वरूपात जपली जावी, यासाठी निर्धार प्रतिष्ठानचे समीर देशपांडे आणि पुणे येथील मृत्युंजय प्रतिष्ठानचे डॉ. सागर देशपांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. सावंत यांच्यासारख्या एका प्रतिभावंत साहित्यिकाच्या जन्मगावी हे स्मृतिदालन होत असल्याबद्दल त्यांची पत्नी मृणालिनी सावंत आणि कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’ अशा महाकादंबऱ्या लिहून मराठी साहित्यविश्वात आपल्या विलक्षण प्रतिभेमुळे पदार्पणातच ख्यातकीर्त झालेल्या सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या साहित्यकृतीची १९९० मध्ये साहित्याच्या ‘नोबेल’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्कारासह देशभरातील अनेक नामवंत संस्थांनी पुरस्कार देऊन सावंत यांना सन्मानित केलेहोते.

कराड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असताना १८ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचे गोव्यात अकाली निधन झाले. आचार्य अत्रे यांच्यापासून ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत लक्षावधी साहित्यप्रेमींनी गौरविलेल्या ‘मृत्युंजय’कारांची स्मृती त्यांच्या जन्मगावी कायमस्वरूपी जतन व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते.सुमारे २५० आसनक्षमता असणार१ कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जिल्हा परिषदेने सादर केलेल्या या स्मृतिदालनाच्या प्रस्तावाचे कौतुक केले आणि तातडीने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जि. परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली आहे.२ सुमारे २५० आसनक्षमतेचे सभागृह आणि सावंत यांचा जीवनप्रवास विशद करणारी छायाचित्रे, पुस्तके, सन्मानचिन्हे अशा स्वरूपात हे स्मृतिदालन साकारले जाणार आहे. या स्मृतिदालनासाठी सर्वतोपरी सहयोग देण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबीयांनी दिले असल्याचे डॉ. सागर देशपांडे यांनी सांगितले.‘व्यावसायिकांसाठी २१ महत्त्वाचे कायदे’ पुस्तकाचे प्रकाशनपुणे : व्यावसायिकांना कायद्याची माहिती व्हावी, यासाठी सल्लागार हेमंत देशपांडे यांनी ‘व्यावसायिकांसाठी २१ महत्त्वाचे कायदे’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. मराठा चेंबर येथे या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रशेखर चितळे, अ‍ॅड. गौरी भावे, अमर देशमुख, नंदकुमार देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. चंद्रशेखर चितळे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात नफ्याचे प्रमाण कमी होत चालले आहे, अशावेळी कायद्याच्या माहिती अभावी होणारा दंड, नुकसान टाळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अ‍ॅड. गौरी भावे म्हणाल्या, आपल्या समस्येविषयी कोणत्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, याबाबत व्यावसायिकांना पुस्तकातून नक्कीच मार्गदर्शन मिळेल.

टॅग्स :Puneपुणे