शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांबरोबर बैैठक घेणार - संग्राम थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:30 IST

गेल्या १५ वर्षांपासून नीरा-देवघर धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूआहे. मात्र, यापुढील काळात मुख्यमंत्र्यांबरोबर धरणग्रस्तांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.

भोर - गेल्या १५ वर्षांपासून नीरा-देवघर धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूआहे. मात्र, यापुढील काळात मुख्यमंत्र्यांबरोबर धरणग्रस्तांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास संस्थेच्या वतीने नीरा-देवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी धरणग्रस्तांचे पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देऊन आमदार थोपटे यांनी पाठिंबा दिला, त्या वेळी ते बोलत होते.या वेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे, जि.प सदस्य विठ्ठल आवाळे, कॉ. ज्ञानोबा घोणे, हनुमंत शिरवले, प्रकाश साळेकर, ज्ञानोबा दिघे, मारुती कंक, अंकुश कंक, नामदेव पोळ व धरणग्रस्त सहभागी झाले होते. यापूर्वी आंदोलकांना जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, कुलदीप कोंडे, विठ्ठल करंजे, मानसिंग धुमाळ, केदार देशपांडे, सुधीर कोठावळे, कृष्णाजी शिनगारे यांनी पाठिंबा दिला आहे. या वेळी थोपटे यांनी यापुढील काळात धरणग्रस्त संघटनांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन केले.दरम्यान, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे यांनी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेला लेखी पत्र दिल. मात्र, संघटनेला ते मान्य नसून जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे व मार्गदर्शक हनुमंत शिरवले यांनी सांगितले.८५० खातेदारांचे पुनर्वसन अद्याप बाकीनीरा-देवघर धरणात सुमारे ४ हजार एकर जमीन पाण्यात गेली आहे. शेतकºयांची धरणात गेलेल्या खातेदारांची संकलन यादी १,४५० खातेदारांची असून, आतापर्यंत १५ वर्षांत फक्त ६०० खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले. ८५० खातेदारांचे (६० टक्के) पुनर्वसन अद्याप बाकी आहे. यामुळे धरणग्रस्तांची परवड सुरू आहे.धरणग्रस्त संघटनेतील वाद मिटवावानीरा-देवघर धरणग्रस्त संघटनेत दोन गट पडले असून त्याचा गैरफायदा सरकारी अधिकारी धरणग्रस्तांच्या प्रस्तावात त्रटी काढून घेत आहेत. त्यामुळे अंतर्गत वाद मिटवून एकत्रित काम करा. जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील सरकारी अधिकाºयांमुळे अनेक वर्षे पुनर्वसन रखडले असून, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या