शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांबरोबर बैैठक घेणार - संग्राम थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:30 IST

गेल्या १५ वर्षांपासून नीरा-देवघर धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूआहे. मात्र, यापुढील काळात मुख्यमंत्र्यांबरोबर धरणग्रस्तांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.

भोर - गेल्या १५ वर्षांपासून नीरा-देवघर धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूआहे. मात्र, यापुढील काळात मुख्यमंत्र्यांबरोबर धरणग्रस्तांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास संस्थेच्या वतीने नीरा-देवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी धरणग्रस्तांचे पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देऊन आमदार थोपटे यांनी पाठिंबा दिला, त्या वेळी ते बोलत होते.या वेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे, जि.प सदस्य विठ्ठल आवाळे, कॉ. ज्ञानोबा घोणे, हनुमंत शिरवले, प्रकाश साळेकर, ज्ञानोबा दिघे, मारुती कंक, अंकुश कंक, नामदेव पोळ व धरणग्रस्त सहभागी झाले होते. यापूर्वी आंदोलकांना जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, कुलदीप कोंडे, विठ्ठल करंजे, मानसिंग धुमाळ, केदार देशपांडे, सुधीर कोठावळे, कृष्णाजी शिनगारे यांनी पाठिंबा दिला आहे. या वेळी थोपटे यांनी यापुढील काळात धरणग्रस्त संघटनांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन केले.दरम्यान, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे यांनी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेला लेखी पत्र दिल. मात्र, संघटनेला ते मान्य नसून जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे व मार्गदर्शक हनुमंत शिरवले यांनी सांगितले.८५० खातेदारांचे पुनर्वसन अद्याप बाकीनीरा-देवघर धरणात सुमारे ४ हजार एकर जमीन पाण्यात गेली आहे. शेतकºयांची धरणात गेलेल्या खातेदारांची संकलन यादी १,४५० खातेदारांची असून, आतापर्यंत १५ वर्षांत फक्त ६०० खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले. ८५० खातेदारांचे (६० टक्के) पुनर्वसन अद्याप बाकी आहे. यामुळे धरणग्रस्तांची परवड सुरू आहे.धरणग्रस्त संघटनेतील वाद मिटवावानीरा-देवघर धरणग्रस्त संघटनेत दोन गट पडले असून त्याचा गैरफायदा सरकारी अधिकारी धरणग्रस्तांच्या प्रस्तावात त्रटी काढून घेत आहेत. त्यामुळे अंतर्गत वाद मिटवून एकत्रित काम करा. जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील सरकारी अधिकाºयांमुळे अनेक वर्षे पुनर्वसन रखडले असून, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या