शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

एमसीव्हीसी बंदच्या निर्णयाचा अनुदानित,विना अनुदानितला फटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:12 IST

पुणे: केंद्र शासनाने उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रमाचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य शासनाने केवळ शासकीय संस्थांमधील अभ्यासक्रम बंद ...

पुणे: केंद्र शासनाने उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रमाचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य शासनाने केवळ शासकीय संस्थांमधील अभ्यासक्रम बंद करण्याचे जाहीर केले. मात्र, त्याचा परिणाम अनुदानित व विना अनिदानित संस्थांच्या प्रवेशावर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पुणे विभागातील २१० आणि पुणे जिल्ह्यातील ८५ संस्थांना त्याचा फटका बसू शकतो.

पुणे विभागाच्या व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण कायालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे,सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये इयत्ता अकरावीत विविध संस्थांमध्ये १५हजार १७७ विद्यार्थी उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रमास (एमसीव्हीसी)प्रवेश घेतात. मात्र ,राज्य शासनाने शासकीय संस्थांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम बंद करून त्यांचे आयटीआयमध्ये विलिनिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, एकीकडे व्यावसाय अभ्यासक्रमाचा आग्रह धरला जात असताना एमसीव्हीसी अभ्यासक्रम बंद करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीपासूनच व्यावसाय अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन स्वत:चा व्यावसाय सुरू करावा किंवा रोजगार करावा, या उद्देशाने केंद्र शासनाने एमसीव्हीसी अभ्यासक्रम सुरू केले. मात्र, या अभ्यासक्रमासाठी केंद्राने केवळ वेतन अनुदान दिले. पायाभूत सुविधा किंवा मशनरी घरेदीसाठी निधी दिला नाही. त्यामुळे राज्य शासनाने या अभ्यासक्रमांचे समायोजन आयटीआयमध्ये करण्याचा निर्णय घेतला. २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील आकडेवारीनुसार विभागातील ५४० विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अद्याप अनुदानित व विना अनुदानित संस्थांमधील एमसीव्हीसी अभ्यासक्रम बंद झालेला नाही, असेही व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालायातील अधिका-यांनी सांगितले.

-------------------------------------

जिल्ह्याची २०१९-२०२० शैक्षणिक वर्षातील आकडेवारी

जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रम शासकीय संस्था : १

एकूण प्रवेश क्षमता ९,४००

अनुदानित संस्था : ८५, संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी : ५०७२

विना अनुदानित संस्था : ११ संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी : ६६०

----------------------------------------------

एमसीव्हीसीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक ज्ञान मिळते.काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही.एमसीव्हीसीच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टींची माहिती अकरावी-बारावीतच मिळते. तसेच त्याचा व्यावहारात उपयोग करता होेतो.त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम पाचवीपासून असणे गरजेचे आहे.

- प्रदीप मोहित, माजी विद्यार्थी,एमसीव्हीसी

----------------------------------

एमसीव्हीसीमुळे प्रात्यक्षिक ज्ञान मिळते. त्यामुळे तात्काळ व्यावसाय करता येतात.तसेच पुढील शिक्षणही घेता येते.अकरावी-बारावी ऐवजी शालेय शिक्षणापासून एमसीव्हीचा अंतर्भाव करावा.

नितीन वाबळे, माजी विद्यार्थी ,एमसीव्हीसी

-----------------------------------

एमसीव्हीसी बंद केल्याने शिक्षकांच्या रोजगावर व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणाम होणार नाही,याबाबत शासनाने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. एमसीव्हीसी बंद निर्णामुळे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होऊ नये.

- प्रा.नंदकुमार निकम, सह सचिव, सी.टी.बोरा.महाविद्यालय,