शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तरुणाई ‘किल्लेदारीच्या’ वाटेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 07:00 IST

ॠतु कोणताही असो आपल्या आवडत्या गडावर जावून त्याच्या तटावरुन सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्याचा सुख तो फिरस्ता अनुभवल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देके टू एस ट्रेकची क्रेझ कायम : राजगड, रायगड  ‘फेव्हरेट’कर्जत येथील कलावंतीण, घनगड येथील किल्ल्यांना भेटी देण्यासाठी तरुणाईची गर्दी सेल्फी घेण्याच्या प्रकारामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याचे प्रमाण कमी

पुणे : सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांची भटकंती हाडाच्या ‘भटक्या’ ला कायमच खुणावत असते. अशावेळी त्याला ऊन, वारा, पाऊस याची तमा नसते. ॠतु कोणताही असो आपल्या आवडत्या गडावर जावून त्याच्या तटावरुन सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्याचा सुख तो फिरस्ता अनुभवल्याशिवाय राहत नाही. खासकरुन तरुणाईच्या ट्रव्हल लिस्ट मध्ये गडकिल्ल्यांची क्रेझ कायम आहे. यातही राजगड, रायगड त्यांचा फेव्हरेट असून सध्या के टू एस ट्रेकला पसंती मिळत आहे. पर्यटन म्हटले की, थायलंड, मलेशिया, सिंगापूर फार तर स्वीझर्लंड अशी नावे सतत डोळ्यासमोर असतात. याकरिता विविध कंपन्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीच्या सवलती देखील देतात. मात्र चांगला चार आकडी पगार असणाºया तरुणाईला सहयाद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील गड-किल्ले साद घालताना दिसतात. दर शनिवार-रविवार या दिवशी ठरलेल्या ‘टाईमपास’ गोष्टीतून सवड काढून आता यंग ब्रिगेड गड किल्ल्यांच्या सफरीवर निघाल्याचे दृश्य पाहवयास मिळते. सोशल मीडियावर गड किल्ल्यांविषयीच्या पोस्ट वाचून, व्हिडिओ बघुन अनेकांची पावले गड कोटांच्या दिशेने पडत असल्याचे गड किल्ल्यांचे पर्यटन व पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे शरद बोडके सांगतात, हल्ली महाराष्ट्रातील कुठल्याही गडकिल्ल्यांविषयीची माहिती सोशल माध्यमांवर उपलब्ध आहे. यामुळे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ट्रेकींग किंवा आॅफबीट भटकंती करण्यास ते प्राधान्य देतात. याची काही उदाहरणे द्यायची झाल्यास राजगड, रायगड, तोरणा या किल्ल्यांवर ट्रेकिंग करण्यास तरुणाईची पसंती असते. सध्या कात्रज टू सिंहगड अर्थात के टू एस असा  ट्रेक करुन एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्यास अनेक जण तयार असतात. रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत या वेळेत चालणारा हा ट्रेक मात्र चांगलाच दमविणारा आहे. पौर्णिमेनंतर दोन दिवस मोठ्या संख्येने ट्रेकर्स के टू एस कडे धाव घेतात. कर्जत येथील कलावंतीण, घनगड येथील किल्ल्यांना भेटी देण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. इतर परंपरागत व साचेबंद अशा किल्ल्यांपेक्षा आडेवाटेवरील गडकोटांच्या ‘वाटेला’ जाण्याची इच्छा त्यांना खुणावत असते. अंधारबन कला देखील मोठ्या संख्येने पर्यटक येतात. खऱ्याखुऱ्या जंगलाचा अनुभव आणि अरण्यातील शांतता अनुभवण्यासाठी याप्रकारच्या साहसी प्रवासात यंग ब्रिगेड सहभागी होताना दिसते. विशेषत: आयटी सेक्टर, बँकिंग, मार्केटींग, क्षेत्रातील तरुणाईला शनिवार-रविवार यादिवशी नेहमीच्या सहलीपेक्षा काहीतरी भन्नाट प्रवासाची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून जंगले व गडकिल्ल्यांची निवड केली जात आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील काही भाग जैवविविधतेच्या दृष्टीने ‘संरक्षित’ केला आहे. यात अंधारबन व वासोटा येथील जंगलाचा समावेश आहे. याठिकाणी जावून निसर्ग पर्यटनाचा आगळा वेगळा आनंद घेण्याकडे युवा भटकत्यांचा आहे. चौकटसेल्फिचा नाद येतो जीवाशीनवशिके तरुण पर्यटक अल्लडपणा करतात. त्यामुळे निसर्गाची हानी तर होतेच याशिवाय त्यातील जैवविविधता धोक्यात येते. याची पर्वा त़रुण करताना दिसत नाही. अनेक जागी कचरा करतात. वातावरणातील ध्वनितरंगांच्या माध्यमातून प्राणी व पक्षी संवाद साधतात. मात्र पर्यटकांच्या गोंगाटामुळे त्यांच्यातील संवाद प्रक्रियेला अडथळा येतो. सगळ्यात महत्वाचे सेल्फी घेण्याच्या प्रकारामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याचे प्रमाण कमी होत असून ब-याचवेळा तो नाद जीवाशी येत असल्याच्या घटना घडत आहे.  - शरद बोडके, हौशी पर्यटक व पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :PuneपुणेFortगडWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिन