शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

EVM लावण्यासाठी जास्ती जास्त ३८४ उमेदवार; उमेदवार वाढल्यास काय करावे? संभ्रम कायम

By नितीन चौधरी | Updated: March 22, 2024 18:57 IST

किमान ३८४ उमेदवार असले तरी मतदान घेण्यासाठी मोठी तारांबळ उडेल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे...

पुणे : मराठा आरक्षण आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर एका मतदारसंघात शेकडो उमेदवार रिंगणात असण्याशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदारसंघात जास्तीत जास्त ३८४ उमेदवारांसाठी २४ ईव्हीएम उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहिल्यास निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी की ईव्हीएमवरच घ्यावी याबाबत अद्यापही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश आलेले नाहीत. किमान ३८४ उमेदवार असले तरी मतदान घेण्यासाठी मोठी तारांबळ उडेल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावातून २ उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ३८४ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक यंत्रणा याबाबत सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी अशी परिस्थिती उद्भवलेली नाही. त्यामुळे उमेदवार वाढल्यास आयोगाला संबंधित मतदारसंघात जादा ईव्हीएम यंत्रांची व्यवस्था करावी लागणार आहे. ही निवडणूक सार्वत्रिक असल्याने सर्वच राज्यांमध्ये ईव्हीएमची आवश्यकता भासेल. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये निवडणूक संपली, अशा ठिकाणांहून ही यंत्रे आणावी लागणार आहेत.

किमान ३८४ उमेदवार असल्यास २४ यंत्रे लावण्यासाठी त्या तुलनेत कंट्रोल युनिट लावावे लागणार आहेत. आयोगाच्या निर्देशांनुसार व्हीव्हीपॅट यंत्रांचीही सोय करावी लागणार आहे. मात्र, सध्याचे निवडण्यात आलेले मतदान केंद्र हे बहुतांशी शाळांमध्येच असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रे ठेवण्यासाठी टेबलची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र खोलीत जागा शिल्लक राहील का, असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. याबाबत अद्याप कोणतेही नियोजन नसल्याचे अनेक अधिकारी खासगीत मान्य करत आहेत. त्यामुळे उमेदवार वाढल्यास यंत्रणा कशी उभी करावी, याबाबत संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांच्या मते उमेदवारांच्या संख्येबाबतचे अंतिम चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे त्याविषयी आताच सांगणे कठीण आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. ही निवडणूक ईव्हीएमवरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ३८४ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतपत्रिकेचा वापर होईल का, या प्रश्नावर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले आहे.

ईव्हीएम यंत्रांद्वारे मतदान घेण्यास सुरुवात होण्यापूर्वी मतदान पत्रिका छापल्या जात होत्या. त्यामुळे त्यासाठी उमेदवारांची मर्यादा नव्हती. ईव्हीएम आल्यानंतर उमेदवारांची संख्या कमी राहावी यासाठी डिपॉझिट आणि अनुमोदकांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत कोणत्याही मतदारसंघात ३८४ पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले नसल्याचे निवडणूक यंत्रणेतील जाणकार अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निवडणूक लढविण्यासाठी एका उमेदवाराला २५ हजार रुपयांची अनामत अर्थात डिपॉझिटची रक्कम भरावी लागते. मागासवर्गीय उमेदवारांना ही मर्यादा १२ हजार ५०० रुपये इतकी आहे. त्यासाठी किमान १० अनुमोदक असावे लागतात. या अटी पूर्ण करणाऱ्यांना निवडणूक लढविता येते. त्यानुसार मराठा समाजाने केलेल्या घोषणेनुसार ३८४ पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीला उभे राहिल्यास निवडणूक आयोग काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड