शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

EVM लावण्यासाठी जास्ती जास्त ३८४ उमेदवार; उमेदवार वाढल्यास काय करावे? संभ्रम कायम

By नितीन चौधरी | Updated: March 22, 2024 18:57 IST

किमान ३८४ उमेदवार असले तरी मतदान घेण्यासाठी मोठी तारांबळ उडेल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे...

पुणे : मराठा आरक्षण आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर एका मतदारसंघात शेकडो उमेदवार रिंगणात असण्याशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदारसंघात जास्तीत जास्त ३८४ उमेदवारांसाठी २४ ईव्हीएम उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहिल्यास निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी की ईव्हीएमवरच घ्यावी याबाबत अद्यापही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश आलेले नाहीत. किमान ३८४ उमेदवार असले तरी मतदान घेण्यासाठी मोठी तारांबळ उडेल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावातून २ उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ३८४ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक यंत्रणा याबाबत सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी अशी परिस्थिती उद्भवलेली नाही. त्यामुळे उमेदवार वाढल्यास आयोगाला संबंधित मतदारसंघात जादा ईव्हीएम यंत्रांची व्यवस्था करावी लागणार आहे. ही निवडणूक सार्वत्रिक असल्याने सर्वच राज्यांमध्ये ईव्हीएमची आवश्यकता भासेल. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये निवडणूक संपली, अशा ठिकाणांहून ही यंत्रे आणावी लागणार आहेत.

किमान ३८४ उमेदवार असल्यास २४ यंत्रे लावण्यासाठी त्या तुलनेत कंट्रोल युनिट लावावे लागणार आहेत. आयोगाच्या निर्देशांनुसार व्हीव्हीपॅट यंत्रांचीही सोय करावी लागणार आहे. मात्र, सध्याचे निवडण्यात आलेले मतदान केंद्र हे बहुतांशी शाळांमध्येच असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रे ठेवण्यासाठी टेबलची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र खोलीत जागा शिल्लक राहील का, असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. याबाबत अद्याप कोणतेही नियोजन नसल्याचे अनेक अधिकारी खासगीत मान्य करत आहेत. त्यामुळे उमेदवार वाढल्यास यंत्रणा कशी उभी करावी, याबाबत संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांच्या मते उमेदवारांच्या संख्येबाबतचे अंतिम चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे त्याविषयी आताच सांगणे कठीण आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. ही निवडणूक ईव्हीएमवरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ३८४ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतपत्रिकेचा वापर होईल का, या प्रश्नावर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले आहे.

ईव्हीएम यंत्रांद्वारे मतदान घेण्यास सुरुवात होण्यापूर्वी मतदान पत्रिका छापल्या जात होत्या. त्यामुळे त्यासाठी उमेदवारांची मर्यादा नव्हती. ईव्हीएम आल्यानंतर उमेदवारांची संख्या कमी राहावी यासाठी डिपॉझिट आणि अनुमोदकांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत कोणत्याही मतदारसंघात ३८४ पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले नसल्याचे निवडणूक यंत्रणेतील जाणकार अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निवडणूक लढविण्यासाठी एका उमेदवाराला २५ हजार रुपयांची अनामत अर्थात डिपॉझिटची रक्कम भरावी लागते. मागासवर्गीय उमेदवारांना ही मर्यादा १२ हजार ५०० रुपये इतकी आहे. त्यासाठी किमान १० अनुमोदक असावे लागतात. या अटी पूर्ण करणाऱ्यांना निवडणूक लढविता येते. त्यानुसार मराठा समाजाने केलेल्या घोषणेनुसार ३८४ पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीला उभे राहिल्यास निवडणूक आयोग काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड