शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला : फिरोझ बख्त अहमद; स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:53 IST

मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला तरीही, त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली. हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला, अशी खंत पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देमहाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीत आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमौलाना अबुल कलाम आझाद यांचे पूर्ण नाव आणि उच्चार नीट लक्षात ठेवले जात नाहीत : बख्त

पुणे : मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्षेत्राचा पाया रचला. तरीही, त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली. हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला, अशी खंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भावाचे नातू, पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’आयोजित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. आबेदा इनामदार, लतिफ  मगदूम उपस्थित होते. अभ्यासक सलीम चिश्ती, अनिता बेलापूरकर, मुमताझ सय्यद, रिझवाना शेख आदी उपस्थित होते.बख्त म्हणाले, आझाद यांनीच भारतरत्न निवड समितीवर असल्याने त्याचा स्वीकार करणे अनुचित समजून  हा पुरस्कार नाकारला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर ३० वर्षांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि कोलकात्याला त्यांच्या घरी पाठवून देण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पूर्ण नाव आणि उच्चार नीट लक्षात ठेवले जात नाहीत. त्यांच्यावरील लिखाण, त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याची व्यवस्था जनतेला माहिती करण्यात हेळसांड झाली, अशी उदाहरणेही त्यांनी दिली.

टॅग्स :P A Inamdarपी ए इनामदारPuneपुणे