शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला : फिरोझ बख्त अहमद; स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:53 IST

मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला तरीही, त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली. हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला, अशी खंत पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देमहाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीत आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमौलाना अबुल कलाम आझाद यांचे पूर्ण नाव आणि उच्चार नीट लक्षात ठेवले जात नाहीत : बख्त

पुणे : मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्षेत्राचा पाया रचला. तरीही, त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली. हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला, अशी खंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भावाचे नातू, पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’आयोजित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. आबेदा इनामदार, लतिफ  मगदूम उपस्थित होते. अभ्यासक सलीम चिश्ती, अनिता बेलापूरकर, मुमताझ सय्यद, रिझवाना शेख आदी उपस्थित होते.बख्त म्हणाले, आझाद यांनीच भारतरत्न निवड समितीवर असल्याने त्याचा स्वीकार करणे अनुचित समजून  हा पुरस्कार नाकारला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर ३० वर्षांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि कोलकात्याला त्यांच्या घरी पाठवून देण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पूर्ण नाव आणि उच्चार नीट लक्षात ठेवले जात नाहीत. त्यांच्यावरील लिखाण, त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याची व्यवस्था जनतेला माहिती करण्यात हेळसांड झाली, अशी उदाहरणेही त्यांनी दिली.

टॅग्स :P A Inamdarपी ए इनामदारPuneपुणे