शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीसाठी जुळवाजुळव, बँकेनेही साखरेचे मूल्यांकन केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:30 IST

राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटल मागे तब्बल ५०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेने ही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे.

सोमेश्वरनगर - राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटल मागे तब्बल ५०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेने ही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागण्याची चिन्हे आहेत.या वर्षी राज्यातील सहकारी साखर कारखानदारी सुरू होण्यासाठी राज्य सरकारने १ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. साखर कारखाने सुरु होताना साखरेला ३ हजार ५०० ते ३ हजार ६०० च्या आसपास दर होत. त्यामुळे राज्य बँक साखरेचे ही चांगले मूल्यांकन करत होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर तब्बल पाचशे रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे बँकेनेही साखरेचे मूल्यांकन क्विंटल मागे ४०० रुपयांनी कमी केले.राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचे ही बंपर उत्पादन होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने साखरेचे दर उतरले असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. सध्या राज्य बँक साखर कारखान्याना एका क्विंटल साखरेवर ८५ टक्के प्रमाणे २६३५ रुपये उचल देत आहे.यामधून टनामागे ७५० रुपये उत्पादन खर्च वजा केला असता ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांच्या हातात केवळ १८८५ रुपये उरत आहेत. तर दुसरीकडे, या वर्षीचा एफआरपी २६४२ रुपयांच्या आसपास असल्याने ऊसउत्पादकांना द्यायची रक्कम व उपादन खर्च वजा जाता कारखानदारांच्या हातात उरणारी रक्कम याचा हिशेब केला असता एफआरपी भागविण्यासाठी कारखानदारांना ७५७ रुपये कमी पडत असल्याने आता ऊसउत्पादकांची एफआरपी कशी भागावणार, या चिंतेत कारखानदार सापडेल आहेत. त्यामुळे बँकेचे मूल्यांकन कमी असूनही कारखानदारांनी पदरचे ७५७ रुपये टाकून २६४२ रुपये एफआरपी सभासदांना अदा केली आहे. मात्र, यासाठी कारखानदारांना इतर खर्चात काटकसर करून एफआरपी भागवावी लागली आहे.केंद्र सरकारने पोत्यामागे ५०० रुपये अनुदान दिले तर साखर निर्यातीसाठी साखर कारखाने पुढे येतील, असे मत कारखानदारांनी व्यक्त केले आहे. तर, बाहेरची साखर थांबविण्यासाठी आयात शुल्क ७५ टक्क्यांवर करण्यासाठी आज दिल्लीत बैठक सुरू असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. पुढील हंगामात तर साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याने साखर कारखाने १ आॅक्टोबरला सुरू करावेत, अशी मागणी कारखानदार करत आहेत.साखरेचे दर१३ नोव्हेंबर - ३५००१६ नोव्हेंबर - ३४८०२३ नोव्हेंबर - ३४१०७ डिसेंबर - ३२६०२१ डिसेंबर - ३१००५ जानेवारी - ३०७०४पाचशे रुपयांनी साखर खाली आल्याने साखर कारखाने चिंताग्रस्त झाले आहे. एफआरपी कशी भागावणार या मन:स्थितीत सापडले आहेत. साखरेच्या मांडलेल्या निविदांना व्यापारी वगार्तून मागणी होत नाही. त्यामुळे अनेक कारखाने ३ हजाराने साखरेची विक्री करत आहेत. तर दुसरीकडे, ३२०० रुपयांच्या आत साखर विकायची नाही अशी साखर संघाने सक्त ताकीद दिली असताना ही अजून साखरेचे दर अजून पडतील. या भीतीने साखर कारखाने ३ हजारांनी साखर विकत आहेत. तसेच सध्या साखर निर्यात बंद असून भारतात ३ हजार साखरेला दर असून निर्यातीला २४०० रुपये दर आहे.

टॅग्स :Puneपुणे