शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

एफआरपीसाठी जुळवाजुळव, बँकेनेही साखरेचे मूल्यांकन केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:30 IST

राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटल मागे तब्बल ५०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेने ही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे.

सोमेश्वरनगर - राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटल मागे तब्बल ५०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेने ही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागण्याची चिन्हे आहेत.या वर्षी राज्यातील सहकारी साखर कारखानदारी सुरू होण्यासाठी राज्य सरकारने १ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. साखर कारखाने सुरु होताना साखरेला ३ हजार ५०० ते ३ हजार ६०० च्या आसपास दर होत. त्यामुळे राज्य बँक साखरेचे ही चांगले मूल्यांकन करत होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर तब्बल पाचशे रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे बँकेनेही साखरेचे मूल्यांकन क्विंटल मागे ४०० रुपयांनी कमी केले.राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचे ही बंपर उत्पादन होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने साखरेचे दर उतरले असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. सध्या राज्य बँक साखर कारखान्याना एका क्विंटल साखरेवर ८५ टक्के प्रमाणे २६३५ रुपये उचल देत आहे.यामधून टनामागे ७५० रुपये उत्पादन खर्च वजा केला असता ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांच्या हातात केवळ १८८५ रुपये उरत आहेत. तर दुसरीकडे, या वर्षीचा एफआरपी २६४२ रुपयांच्या आसपास असल्याने ऊसउत्पादकांना द्यायची रक्कम व उपादन खर्च वजा जाता कारखानदारांच्या हातात उरणारी रक्कम याचा हिशेब केला असता एफआरपी भागविण्यासाठी कारखानदारांना ७५७ रुपये कमी पडत असल्याने आता ऊसउत्पादकांची एफआरपी कशी भागावणार, या चिंतेत कारखानदार सापडेल आहेत. त्यामुळे बँकेचे मूल्यांकन कमी असूनही कारखानदारांनी पदरचे ७५७ रुपये टाकून २६४२ रुपये एफआरपी सभासदांना अदा केली आहे. मात्र, यासाठी कारखानदारांना इतर खर्चात काटकसर करून एफआरपी भागवावी लागली आहे.केंद्र सरकारने पोत्यामागे ५०० रुपये अनुदान दिले तर साखर निर्यातीसाठी साखर कारखाने पुढे येतील, असे मत कारखानदारांनी व्यक्त केले आहे. तर, बाहेरची साखर थांबविण्यासाठी आयात शुल्क ७५ टक्क्यांवर करण्यासाठी आज दिल्लीत बैठक सुरू असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. पुढील हंगामात तर साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याने साखर कारखाने १ आॅक्टोबरला सुरू करावेत, अशी मागणी कारखानदार करत आहेत.साखरेचे दर१३ नोव्हेंबर - ३५००१६ नोव्हेंबर - ३४८०२३ नोव्हेंबर - ३४१०७ डिसेंबर - ३२६०२१ डिसेंबर - ३१००५ जानेवारी - ३०७०४पाचशे रुपयांनी साखर खाली आल्याने साखर कारखाने चिंताग्रस्त झाले आहे. एफआरपी कशी भागावणार या मन:स्थितीत सापडले आहेत. साखरेच्या मांडलेल्या निविदांना व्यापारी वगार्तून मागणी होत नाही. त्यामुळे अनेक कारखाने ३ हजाराने साखरेची विक्री करत आहेत. तर दुसरीकडे, ३२०० रुपयांच्या आत साखर विकायची नाही अशी साखर संघाने सक्त ताकीद दिली असताना ही अजून साखरेचे दर अजून पडतील. या भीतीने साखर कारखाने ३ हजारांनी साखर विकत आहेत. तसेच सध्या साखर निर्यात बंद असून भारतात ३ हजार साखरेला दर असून निर्यातीला २४०० रुपये दर आहे.

टॅग्स :Puneपुणे