शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मारूती चितमपल्ली यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:46 IST

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ६ जानेवारी रोजी सातव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमांडणार विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे विविध ठराव लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन

पुणे : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ६ जानेवारी रोजी सातव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांची निवड करण्यात आली आहे. ‘हे संंमेलन विविध कार्यक्रमांनी रंगणार असून, विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे विविध ठराव मांडणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे.  उद्घाटन सत्रानंतर 'चंगळवादी वृत्ती आणि पर्यावरण' या विषयावर त्यांचे भाषण होणार आहे. त्यानंतर 'प्रदुषित नद्या आणि आपण' या विषयावर परिणिता दांडेकर बोलणार आहेत. पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण  होणार असून,  उत्तरार्धात अंकुश आरेकर व लता ऐवळे हे 'रानातल्या कविता' सादर करणार आहेत. डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रिया चित्राव यांचा 'हिरवाई' हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण होणार असून,  संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांच्या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होणार आहे. जयंत कर्णिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सकाळी १० ते ५ या वेळेत संमेलन होणार आहे. महाविद्यालयीन युवकांचा सहभाग हे संमेलनाचे वैशिष्ट्य असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.ठरावांची अमंलबजावणी होणारसाहित्य संमेलनाप्रमाणे या संमेलनात विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे ठराव मांडणार आहेत. स्वत: च्या जीवन शैलीपासून ते महाविद्यालयाच्या परिसरातील पर्यावरणाबरोबरच भोवतालच्या पर्यावरणाच्या रक्षणाविषयीचे हे ठराव सूचक-अनुमोदकासह मंजूर करण्यात येणार आहेत. या ठरावांची अमंलबजावणी होईल, असे मिलिंद जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे