शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

मराठी भाषा संत परंपरेमुळे समृध्द झाली - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 16:48 IST

हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीला देता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली.

पुणे : संतांचे विचार कालसापेक्ष आहेत, काळाच्या कसोटीवर ते विचार योग्य ठरतात असे केवळ म्हणून चालणार नाही. त्या त्या काळाचा अनुभव, सत्य, विचार, वास्तविकता याच्या आधारावर संत साहित्याचे पुन्हा पुन्हा लिखाण होणे आवश्यक आहे. त्याव्दारे हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीला देता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली.

श्री गंधर्व वेद प्रकाशनतर्फे संत निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायपर्यंतच्या संत परंपरेची ओळख करून देणा-या १३ चरित्र ग्रंथांचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कीर्तन-प्रवचनकार चैतन्यमहाराज देगलूरकर, पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ग्रंथाचे संपादक डॉ सदानंद मोरे आणि अभय टिळक, प्रकाश खाडिलकर, दीपक खाडिलकर आदी उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या विचारांवर संत साहित्याचा पगडा आहे. मराठी भाषा समृध्द झाली ती संत परंपरेमुळे. ज्ञानोबारायांनी त्याची सुरूवात केली. बदललेल्या काळातही संत साहित्याचा विचार महत्त्वाचा आहे. नव्या पिढीवर या साहित्याचा प्रभाव पडावा यासाठी त्या पिढीला विचार कळेल अशा भाषेत ते साहित्य लिहले गेले पाहिजे. संतांनी अध्यात्म आणि भौतिक जीवन यांचे सांगड घातली. संत साहित्यामुळे आमचा विचार, संस्कृती, भाषा अनेक आक्रमणांनंतरही जिवंत राहिली.’’

 चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे.  तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

औसेकर महाराज म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला पाचशे वर्षांची संत परंपरा आहे, त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्याचे काम केले. या संतांची चरित्रे आजच्या नव्या दृष्टिकोनातून लिहिण्याची गरज होती. अनेक नवे जुने प्रख्यात लेखकांचा यामध्ये समावेश आहे. राज्याचा सामाजिक पोत घडविण्यात संतांचे फार मोठे योगदान आहे.’’अभय टिळक यांनी सुत्रसंचालन केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस