शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

Maratha Reservation : सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही!- उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 10:24 IST

Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना करणार आमंत्रित

पुणे - मराठा आरक्षणावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.  सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही, असे विधान उदयनराजे भोसले यांनी केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या सरकारनं त्यांच्याकडे आणि त्यांनी यांच्याकडे बोटे दाखवायची. अशी किती वर्ष टोलवाटोलवी करणार? आता एकमेकांकडे बोटे दाखवणे बंद करा. उद्या धमाका झाल्यास त्यास कोण जबाबदार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही मग इतकी वर्ष हा प्रश्न का सुटला नाही?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असंही  उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं. 

उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. यावेळी ते म्हणाले की, आंदोलनाला दिशा देण्यासाठी ही परिषद असेल. तिथे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असेल. मात्र ही दिशा हिंसक नसावी. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी नसणार आहे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माफक अपेक्षा आहे ते जर वेळेत मिळाले असते तर लोकांना जीव द्यावे लागले नसते अशी टीकाही त्यांनी केली.

उदयनराजे भोसले यांनी मांडलेले मुद्दे

उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना करणार आमंत्रित 

- पुढची 30 वर्ष मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करुन टाका

- दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही

- उद्या जर धमाका झाला तर जबाबदार कोण? टोलवाटोलवी करणारे का?

- आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, अन्यथा भडका उडेल!

- आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना मिळतं काय? दरोडा, खुनाच्या केसेस

- ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्याची जाणीव प्रत्येक प्रतिनिधींना असायला हवी

- प्रत्येक लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा

- मराठा मोर्चे थांबले पाहिजेच म्हणता, मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आजचे मोर्चे

- अध्यादेश वैगरे काहीही कामाचे नाही

- मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांची जीव गेले नसते

- मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, जगभरातील मीडियाने दखल घेतली

- खासदार उदयनराजे समन्वय समितीसोबत चर्चा करणार

- कायदा सुव्यवस्था हातात न घेण्याचं आवाहन

- आरक्षण न देण्यामागे इच्छाशक्ती, राजकारण कारण

- कुणाचाही विरोध नसताना आरक्षण का नाही?

- इतकी वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित का ठेवला? 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा