शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अनेकांचा विश्वास बसणार नाही! शिवाजी आखाड्याच्या जागी उभारलंय ‘बालगंधर्व’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 14:54 IST

कुस्तीपटू म्हणतात, काही लाेकांच्या दबावामुळे आणि राजकारणामुळे शिवाजी आखाड्याची जागा बालगंधर्वला

उमेश जाधव

पुणे : सांस्कृतिक पुण्याचा उल्लेख करताना ‘बालगंधर्व’ हे नाव आपसूकच प्रत्येकाच्या ओठांवर येते. मात्र, याच बालगंधर्वची जागा कधीकाळी शिवाजी आखाड्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यावर आज अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. मात्र, राजकीय प्रभावामुळे शिवाजी आखाड्याची ही जागा ‘बालगंधर्व’ला देण्यात आली आणि मंगळवार पेठेत हा आखाडा दिमाखात उभा राहिला.

कुस्ती आणि पुणे यांचं अतूट नातं. पुण्यातील कुस्तीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला चौकाचौकांत तालमी आणि तेथे दिवसरात्र मेहनत घेणारे पैलवान असेच चित्र होते. महापालिकेच्या इमारतीमागे नदी पात्रात शिवाजी आखाडा होता. नियमितपणे येथे कुस्त्या होत होत्या. मात्र, दि. १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटल्यानंतर हा आखाडा वाहून गेला. त्यामुळे आजच्या ‘बालगंधर्व’ कलादालनाच्या जागी शिवाजी आखाडा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आखाडा वाहून गेल्यानंतर आता कुस्त्या कुठं घ्यायच्या? असा प्रश्न होता. मग १९६२मध्ये आखाडा भरला ‘बालगंधर्व’ला. अनेक कुस्त्या रंगल्या. तसेच, डेक्कन जिमखान्याचे तत्कालीन प्रमुख भाऊसाहेब गोखले यांनीही त्यावेळी उदार हेतूने कुस्त्यांसाठी जिमखान्याचे मैदान उपलब्ध करून दिले. पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष, आमदार नामदेवराव मते यांच्यात आखाड्याबाबत चर्चा झाली होती. सणस यांनी बालगंधर्वची जागा शिवाजी आखाड्याला देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बाबूराव सणस यांची सत्ता गेली. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. भाऊसाहेब शिरोळे १९५७मध्ये महापौर झाले. त्यानंतर शिवाजीराव ढेरे महापौर झाले भाऊसाहेब नगरसेवक होते याच काळात बालगंधर्वचे भूमिपूजन झाले. त्यावेळी पुण्यातील पैलवान, कुस्ती संघांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. मात्र, महापालिकेकडून आखाड्यासाठी जी जागा मिळेल ती घ्यावी, अशी भूमिका नामदेवराव मते यांनी घेतली. त्यावेळी बालगंधर्वजवळ यायला रस्ताही नव्हता. मंगळवार पेठेतून पायपीट करत यावे लागत होते. आज शनिवारवाड्यापासून आपण पुढे जातो तो पूल नव्हता. दरम्यान, १९६२ ते ७२ या कालावधीत ‘बालगंधर्व’, डेक्कन, भांबुर्डे (आताचे शिवाजीनगर) येथे कुस्त्या खेळवण्यात आल्या.

१९७०मध्ये महापौरांनी जुना बाजार येथे शिवाजी आखाड्याचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. दि. १ नोव्हेंबर १९७० रोजी शिवाजी आखाड्याचा कोनशिला समारंभ राज्याचे तत्कालीन क्रीडामंत्री बॅ. शेषराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला. १९७२मध्ये आखाड्याचे काम पूर्ण झाले आणि पुणेकरांना हक्काचा आखाडा मिळाला. दगडू करमरकर आणि लक्ष्मण वडार यांच्यातील उद्घाटनाच्या लढतीने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

''काही लाेकांच्या दबावामुळे आणि राजकारणामुळे शिवाजी आखाड्याची जागा बालगंधर्वला गेली. तत्कालीन आमदार, तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मते यांनी ही जागा शिवाजी आखाड्याला मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. बालगंधर्वची जागा गेल्यानंतरही नामदेवराव निराश झाले नाहीत. मिळेल ती जागा आखाड्यासाठी घ्यावी, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे मंगळवार पेठेत जागा मिळाली आणि नामदेवराव मते यांच्या निरीक्षणाखालीच सध्याचा शिवाजी आखाडा बांधण्यात आला. - गोविंदराव सोनवणे, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय तालीम संघ''

''बालगंधर्वच्या जागी शिवाजी आखाडा उभारण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता. कुस्ती क्षेत्रातील काही जाणकारांकडून दिली जाणारी माहिती चुकीची आहे. शिवाजी आखाडा महापालिकेच्या इमारतीमागे झालेल्या मेट्रो स्टेशनच्या समोर नदी पात्रात होता. त्याच्याशेजारी महापालिकेचे शिवाजी उद्यान होते. त्या उद्यानात स्वीमिंग पूल होता. त्याचे नाव करपे तलाव होते. पुरात करपे तलाव वाहून गेला होता. बालगंधर्वची जागा मातंग समाजाची वस्ती होती तेथे शिवाजी आखाड्याचा तीळमात्रही संबंध नाही. - श्रीकांत शिरोळे, काँग्रेस नेते'' 

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरartकलाWrestlingकुस्तीPoliticsराजकारण