शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

भिडे गुरुजींच्या तोंडून मनुवाद पेरला जातोय : डॉ. श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 21:24 IST

कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन जातीयवादी षड्यंत्र पेरले जात आहे..

ठळक मुद्देनामदेव ढसाळ पँथर साहित्य रत्न पुरस्कार

पुणे : पँथर चळवळ म्हणजे सत्याचा आणि आशेचा किरण आहे. पँथर आज तुकड्यांमध्ये विखुरलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन एकीकडे जातीयवादी षड्यंत्र पेरले जात आहे, तर दुसरीकडे भिडे गुरूजींच्या तोंडून मनुवाद पेरला जात आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकसंध राहण्याची गरज आहे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.फुले-शाहू- आंबेडकर विचार मंचतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त सबनीस यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ‍ॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते पद्मश्री नामदेव ढसाळ पँथर साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रवींद्र माळवदकर, नगरसेविका लता राजगुरू, पँथर नेते यशवंत नडगम आणि पँथर नेते प्रकाश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. सबनीस म्हणाले, ‘सामाजिक जीवनात टोकाची विषमता आणि गरिबी पाहून नामदेव ढसाळांना नेहमी वेदना व्हायच्या. त्यामुळे त्यांची भाषा काहीवेळा खूप टोकाची वाटायची. त्यांचे साहित्य हे केवळ साहित्य विश्वापुरते मर्यादित न राहता  आर्थिक आणि राजकीय क्षेत्रही त्यांच्या साहित्याने पादाक्रांत केले. त्यांची कविता चौकटबद्ध रसिकतेला उद्ध्वस्त करणारी होती. नामदेव ढसाळ हे पँथर चळवळीचे प्रेरणास्थान होते.’ ‘नामदेव ढसाळ हे महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेतील प्रगल्भ आणि विद्रोही वास्तववादी कवी होते. त्यांच्या कवितेत केवळ विद्रोह नव्हता, तर क्रांतीची बिजे होती. ढसाळांच्या कवितेची भाषा सडेतोड होती; मात्र त्याला गौतम बुद्ध आणि आंबेडकरांच्या विचारांचा पाया होता. नामदेव ढसाळांची कविता ही युगप्रवर्तक ठरली’, असेही सबनीस म्हणाले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि दादासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी