शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

भिडे गुरुजींच्या तोंडून मनुवाद पेरला जातोय : डॉ. श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 21:24 IST

कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन जातीयवादी षड्यंत्र पेरले जात आहे..

ठळक मुद्देनामदेव ढसाळ पँथर साहित्य रत्न पुरस्कार

पुणे : पँथर चळवळ म्हणजे सत्याचा आणि आशेचा किरण आहे. पँथर आज तुकड्यांमध्ये विखुरलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन एकीकडे जातीयवादी षड्यंत्र पेरले जात आहे, तर दुसरीकडे भिडे गुरूजींच्या तोंडून मनुवाद पेरला जात आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकसंध राहण्याची गरज आहे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.फुले-शाहू- आंबेडकर विचार मंचतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त सबनीस यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ‍ॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते पद्मश्री नामदेव ढसाळ पँथर साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रवींद्र माळवदकर, नगरसेविका लता राजगुरू, पँथर नेते यशवंत नडगम आणि पँथर नेते प्रकाश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. सबनीस म्हणाले, ‘सामाजिक जीवनात टोकाची विषमता आणि गरिबी पाहून नामदेव ढसाळांना नेहमी वेदना व्हायच्या. त्यामुळे त्यांची भाषा काहीवेळा खूप टोकाची वाटायची. त्यांचे साहित्य हे केवळ साहित्य विश्वापुरते मर्यादित न राहता  आर्थिक आणि राजकीय क्षेत्रही त्यांच्या साहित्याने पादाक्रांत केले. त्यांची कविता चौकटबद्ध रसिकतेला उद्ध्वस्त करणारी होती. नामदेव ढसाळ हे पँथर चळवळीचे प्रेरणास्थान होते.’ ‘नामदेव ढसाळ हे महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेतील प्रगल्भ आणि विद्रोही वास्तववादी कवी होते. त्यांच्या कवितेत केवळ विद्रोह नव्हता, तर क्रांतीची बिजे होती. ढसाळांच्या कवितेची भाषा सडेतोड होती; मात्र त्याला गौतम बुद्ध आणि आंबेडकरांच्या विचारांचा पाया होता. नामदेव ढसाळांची कविता ही युगप्रवर्तक ठरली’, असेही सबनीस म्हणाले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि दादासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी