शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शैक्षणिक धोरणातील बदलासह रोजगार उपलब्ध करून द्यावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 01:17 IST

तरूणांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे कट्ट्यावरून रिपोर्टिंग

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावेसामाजिक समस्यांबरोबरच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने गांभीर्याने पाहिलेले नाही. प्रत्येक वेळी नवीन आश्वासने दिली जातात. तरुणांसाठी हे करणार, ते करणार; मात्र तसे काहीच होताना प्रत्यक्ष दिसत नाही. पदवीधरांनाही नोकरी नाही. नोकरभरतीच्या १०० जागा असतील, तर त्यासाठी ५० हजार अर्ज येतात. ही चिंतनीय बाब आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. त्याबाबत कोणताही उमेदवार बोलत नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये केवळ आश्वासने दिली जातात.- सलीम हनीफ शेख, विद्यार्थीएकाच घरातील खासदार, आमदार कशासाठी?प्रत्येक राजकीय पक्षात घराणेशाही आहे. एकाच घरामध्ये आमदार, नगरसेवक, पक्षातील प्रमुख पदे दिली असल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. म्हणजेच कार्यकर्त्यांनी आयुष्यभर केवळ यांच्याच मागे फिरायचे का? निवडणुक ीमध्ये काम करण्यासाठी कार्यकर्ते पाहिजे असतात. मात्र निवडणुकीला उमेदवार म्हणून ते त्यांच्या मुला-मुलींना संधी देतात. त्यांच्या पक्षाच्या कुठल्या बैठकीला अथवा आंदोलन, उपोषणाला कधीच ते उपस्थित नसतात किंवा सहभागी होत नाहीत. काहींना तर पक्षाची विचारधाराही माहिती नसते.- जगदीश कुमावत, विद्यार्थीशैक्षणिक धोरणात गुणवत्तेस प्राधान्य हवेराजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी चालेल. मात्र त्या सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करून गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कारण ८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. परंतु राखीव कोट्यातील विद्यार्थ्याला कमी गुण असले, तरी प्रवेश मिळतो. सरकारने शैक्षणिक आरक्षण दिले पाहिजे. मात्र गुणवत्तेमध्ये तडजोड करू नये. त्यामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.- श्रद्धा अविनाश बारवकर, विद्यार्थिनीसामान्यांनाही बँकांकडून कर्ज सहज उपलब्ध व्हावेदेशातील भ्रष्टाचार कमी होणे आवश्यक आहे. तरच आपला विकास होऊ शकतो. बॅँकांना बुडवून परदेशात पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही बड्या उद्योजकांना कर्ज सहज कर्ज दिले जाते. सर्वसामान्यांना बॅँकेकडून कर्ज घ्यायचे असेल, तर सहज मिळत नाही. सरकारने रोजगारनिर्मिती करणे आवश्यक आहे. रोजगार नसल्याने अनेक तरुण नैराश्यात आहेत. अनेक गावांमध्ये आजही वीज पोहोचलेली नाही. केवळ काही मोठ्या शहरांमध्ये सुविधा आहे. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव आहे.- समीर अकबर शेख, विद्यार्थीसमस्या सोडविण्यासाठी ठोस कृती हवीदेशातील प्रत्येक निवडणुकीमध्ये विकासाबद्दल बोलण्यात येते. मात्र खरोखरच विकास झाला आहे, असे म्हणता येईल का? शहरात अनेक ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत. बेरोजगारी वाढतच आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, देशातील महिला असुरक्षित, लहान मुलींवरील वाढलेले अत्याचाराचे प्रमाण अशा प्रमुख समस्या देशभरात आहेत. त्यांना आळा घालण्यात आला पाहिजे. त्यासाठी ठोस कृती व्हावी. निवडणुका आल्या की या मुद्द्यांची आठवण होते, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते.- अक्षय दुनघव, विद्यार्थी

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान