शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:19 IST

जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला : डॉ. दत्तात्रय तापकीरईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच : डॉ. सदानंद मोरे

पुणे : ‘‘एका धर्माच्या भाषेत दुसऱ्या धर्माची भाषा व्यक्त करताना ज्या अडचणी येतात त्या समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.मराठवाडा मित्रमंडळ, डायोसिस अॉफ पुणे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि स्वच्छंद यांच्या वतीने आयोजित ‘आंतरधर्मीय सुसंवाद’ या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रा. डॉ. दत्तात्रय तापकीर, प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी, प्रा. भाऊसाहेब जाधव, डॉ. थॉमस डाबरे आदी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, की प्रत्येक धर्म हा एका विशिष्ट भाषेत सांगितलेला असतो. धर्म भाषा कितीही वेगवेगळ्या असोत, मात्र ईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच असतो. ज्या त्या भाषेत जो तो धर्म सांगताना काही एक विशिष्ट कल्पना मांडल्या जातात. एक चौकट तयार केलेली असते आणि त्या चौकटीत बोलावे लागते, मग त्यासाठी तुम्ही कुठलीही भाषा वापरू शकता. या वेळी सर्वधर्मीय एकतेचा व राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या सुमधुर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रवींद्र शाळू, आरती आठल्ये, जयंत सबनीस, अनघा धायगुडे यांचा समावेश होता. प्रा. विद्या यंदे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, ‘एक दिल के सौ तुकडे कुछ इधर कुछ उधर’ या ओळीमध्ये म्हटल्याप्रमाणे मानवता अशी तुकड्या-तुकड्यांमध्ये विभक्त झाली आहे. आपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला आहे. 

डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, राष्ट्र कार्यासाठी या देशातील एकात्मता टिकवण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आपण प्रजा अंतिम मानून राष्ट्र, सत्ता आणि सरकार प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेमध्ये असलेली विभिन्नता लक्षात घेऊन या ठिकाणी जगणे, तसे प्रयत्न करणे असे झाले, तर देशामध्ये शांती-सलोखा टिकून राहील.

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेPuneपुणे