शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:19 IST

जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला : डॉ. दत्तात्रय तापकीरईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच : डॉ. सदानंद मोरे

पुणे : ‘‘एका धर्माच्या भाषेत दुसऱ्या धर्माची भाषा व्यक्त करताना ज्या अडचणी येतात त्या समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.मराठवाडा मित्रमंडळ, डायोसिस अॉफ पुणे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि स्वच्छंद यांच्या वतीने आयोजित ‘आंतरधर्मीय सुसंवाद’ या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रा. डॉ. दत्तात्रय तापकीर, प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी, प्रा. भाऊसाहेब जाधव, डॉ. थॉमस डाबरे आदी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, की प्रत्येक धर्म हा एका विशिष्ट भाषेत सांगितलेला असतो. धर्म भाषा कितीही वेगवेगळ्या असोत, मात्र ईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच असतो. ज्या त्या भाषेत जो तो धर्म सांगताना काही एक विशिष्ट कल्पना मांडल्या जातात. एक चौकट तयार केलेली असते आणि त्या चौकटीत बोलावे लागते, मग त्यासाठी तुम्ही कुठलीही भाषा वापरू शकता. या वेळी सर्वधर्मीय एकतेचा व राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या सुमधुर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रवींद्र शाळू, आरती आठल्ये, जयंत सबनीस, अनघा धायगुडे यांचा समावेश होता. प्रा. विद्या यंदे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, ‘एक दिल के सौ तुकडे कुछ इधर कुछ उधर’ या ओळीमध्ये म्हटल्याप्रमाणे मानवता अशी तुकड्या-तुकड्यांमध्ये विभक्त झाली आहे. आपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला आहे. 

डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, राष्ट्र कार्यासाठी या देशातील एकात्मता टिकवण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आपण प्रजा अंतिम मानून राष्ट्र, सत्ता आणि सरकार प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेमध्ये असलेली विभिन्नता लक्षात घेऊन या ठिकाणी जगणे, तसे प्रयत्न करणे असे झाले, तर देशामध्ये शांती-सलोखा टिकून राहील.

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेPuneपुणे