शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेत आवडतोय पुण्याच्या पेरूचा गोडवा; राज्यातील फळांना परराज्यात चांगला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 09:35 IST

राज्यात जे पिकते त्याला बाहेरील राज्यात चांगला दर मिळतो हे आता शेतकऱ्यांना चांगलेच उमगलेय

- नितीन चौधरी

पुणे : दोन वर्षांपूर्वी पेरूचे उत्पादन सुरू झाले. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत माल पाठवायचो. त्याला वाहतूक खर्च लागायचा. सरासरी दर किलोला ३० रुपयांपर्यंत मिळायचा. त्यातून खर्च वजा जाता एकरी दोन लाख रुपये मिळायचे. आता शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत पेरू विकतो. प्रतिकिलो दर १० रुपये जादा मिळतात. त्यातून एकरी दीड लाख रुपये अधिकचे उत्पन्न मिळते. शिरूर तालुक्यातील पिंपळसुट्टीचे शेतकरी ऋषिकेश शितोळे यांचा हा अनुभव. राज्यात जे पिकते त्याला बाहेरील राज्यात चांगला दर मिळतो हे आता शेतकऱ्यांना चांगलेच उमगले आहे.

राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असून, त्यामार्फत शेतमालाला चांगला दर मिळत आहे. यातीलच एक शिरूर येथील आदर्श ॲग्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० शेतकरी सभासद असलेली ही कंपनी पेरूचे तामिळनाडू, केरळ व दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री करते. छत्तीसगडमध्ये वाढलेल्या तैवान पिंक व व्हीएनआर या दोन जाती सध्या राज्यातील शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणल्या आहेत. या गटातील ८५ शेतकऱ्यांनी या दोन जातींची लागवड केली असून, तैवान पिंक जातीचे १५० एकर, तर व्हीएनआर जातीचे ५० क्षेत्र आहे. या दोन्ही जातींच्या पेरू गोडीला कमी आहेत. त्यामुळे त्याची विक्री राज्यात अपेक्षेनुसार होत नाही. त्यामुळे या तिन्ही राज्यांत त्याची विक्री केली जाते. येथे सध्या ५० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. राज्यात हाच दर केवळ ३२ ते ३५ रुपये किलो इतका आहे. त्यामुळे खर्च वजा जाता शेतकऱ्यांना प्रतिकिलो किमान १५ रुपये जादा दर मिळत आहे. त्यामुळे एकरी दीड ते दोन लाखांचा नफा मिळत आहे.

खात्रीशीर विक्री

याबाबत कंपनीचे प्रमुख विकास नागवडे म्हणाले, ‘सुरुवातीला चेन्नईला स्ट्रॉबेरी पाठवली होती. मात्र, व्यापाऱ्याने १०० रुपये किलो दर सांगून हातात केवळ ७० रुपये दिले हा अनुभव गाठीशी होता. महाराष्ट्रात पेरूचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, मागणी नाही. त्यासाठी चेन्नई, दिल्ली बाजारपेठांचा अभ्यास केला. तेथील मागणीनुसार पेरू पाठविण्यास सुरुवात केली. तेथे बिजाक या स्टार्टअप कंपनीने विक्रीसाठी मदत केली. त्यासाठी ते एक टक्का कमिशन घेतात. मात्र, पैशांची हमी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. तामिळनाडू व केरळमध्ये वर्षभर माल पाठविता येतो. दिल्ली बाजारपेठेत सहा महिने माल जातो. तेथे उत्तर प्रदेश, छत्तीसगडच्या मालाची स्पर्धा असते.’

किसान रेलचा फायदा

हा माल सांगोल्याहून किसान रेलमार्फत पाठविला जातो. शेतकरी थेट पाठवित असल्याने किलोमागे दीड रुपये भाडे कमी लागते. कमी वेळेत माल बाजारात पोहोचल्याने चांगला दर मिळतो. सध्या कंपनीमार्फत तामिळनाडूतील कोईमतूर व केरळमधील पल्लकड येथे कांदा पाठविला जात आहे. त्याला चांगला दर मिळत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड