शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

दक्षिणेत आवडतोय पुण्याच्या पेरूचा गोडवा; राज्यातील फळांना परराज्यात चांगला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 09:35 IST

राज्यात जे पिकते त्याला बाहेरील राज्यात चांगला दर मिळतो हे आता शेतकऱ्यांना चांगलेच उमगलेय

- नितीन चौधरी

पुणे : दोन वर्षांपूर्वी पेरूचे उत्पादन सुरू झाले. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत माल पाठवायचो. त्याला वाहतूक खर्च लागायचा. सरासरी दर किलोला ३० रुपयांपर्यंत मिळायचा. त्यातून खर्च वजा जाता एकरी दोन लाख रुपये मिळायचे. आता शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत पेरू विकतो. प्रतिकिलो दर १० रुपये जादा मिळतात. त्यातून एकरी दीड लाख रुपये अधिकचे उत्पन्न मिळते. शिरूर तालुक्यातील पिंपळसुट्टीचे शेतकरी ऋषिकेश शितोळे यांचा हा अनुभव. राज्यात जे पिकते त्याला बाहेरील राज्यात चांगला दर मिळतो हे आता शेतकऱ्यांना चांगलेच उमगले आहे.

राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असून, त्यामार्फत शेतमालाला चांगला दर मिळत आहे. यातीलच एक शिरूर येथील आदर्श ॲग्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० शेतकरी सभासद असलेली ही कंपनी पेरूचे तामिळनाडू, केरळ व दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री करते. छत्तीसगडमध्ये वाढलेल्या तैवान पिंक व व्हीएनआर या दोन जाती सध्या राज्यातील शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणल्या आहेत. या गटातील ८५ शेतकऱ्यांनी या दोन जातींची लागवड केली असून, तैवान पिंक जातीचे १५० एकर, तर व्हीएनआर जातीचे ५० क्षेत्र आहे. या दोन्ही जातींच्या पेरू गोडीला कमी आहेत. त्यामुळे त्याची विक्री राज्यात अपेक्षेनुसार होत नाही. त्यामुळे या तिन्ही राज्यांत त्याची विक्री केली जाते. येथे सध्या ५० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. राज्यात हाच दर केवळ ३२ ते ३५ रुपये किलो इतका आहे. त्यामुळे खर्च वजा जाता शेतकऱ्यांना प्रतिकिलो किमान १५ रुपये जादा दर मिळत आहे. त्यामुळे एकरी दीड ते दोन लाखांचा नफा मिळत आहे.

खात्रीशीर विक्री

याबाबत कंपनीचे प्रमुख विकास नागवडे म्हणाले, ‘सुरुवातीला चेन्नईला स्ट्रॉबेरी पाठवली होती. मात्र, व्यापाऱ्याने १०० रुपये किलो दर सांगून हातात केवळ ७० रुपये दिले हा अनुभव गाठीशी होता. महाराष्ट्रात पेरूचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, मागणी नाही. त्यासाठी चेन्नई, दिल्ली बाजारपेठांचा अभ्यास केला. तेथील मागणीनुसार पेरू पाठविण्यास सुरुवात केली. तेथे बिजाक या स्टार्टअप कंपनीने विक्रीसाठी मदत केली. त्यासाठी ते एक टक्का कमिशन घेतात. मात्र, पैशांची हमी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. तामिळनाडू व केरळमध्ये वर्षभर माल पाठविता येतो. दिल्ली बाजारपेठेत सहा महिने माल जातो. तेथे उत्तर प्रदेश, छत्तीसगडच्या मालाची स्पर्धा असते.’

किसान रेलचा फायदा

हा माल सांगोल्याहून किसान रेलमार्फत पाठविला जातो. शेतकरी थेट पाठवित असल्याने किलोमागे दीड रुपये भाडे कमी लागते. कमी वेळेत माल बाजारात पोहोचल्याने चांगला दर मिळतो. सध्या कंपनीमार्फत तामिळनाडूतील कोईमतूर व केरळमधील पल्लकड येथे कांदा पाठविला जात आहे. त्याला चांगला दर मिळत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड