शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

महाराष्ट्रात कुठेही अन्नधान्याची तूट नाही ; विश्वजीत कदम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:22 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पुणे :महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात अन्न, धान्याची तूट नसून वैद्यकीय व्यवस्था उत्तम काम करत असल्याचा विश्वास ज्याचे कृषी, सहकार, अन्न  व नागरी पुरवठा राज्य मंत्रीविश्वजीत कदम यांनी व्यक्त केला . पुण्यात त्यांनी गुरुवारी काही शिवभोजन केंद्रं व स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच मुद्द्यांवर कदम यांनी भाष्य केले. 

ते म्हणाले की, 'पुण्यातील शिवभोजन थाळीच्या केंद्रांची स्थितीसमाधानकारक आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना चांगलं जेवण उपलब्ध व्हावं हीच सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्रात कुठेही अन्न धान्याची तूट नाही. काही ठिकाणीं धान्य उपलब्ध आहे तर काही ठिकाणी होईल मात्र तुटवडा कुठेही नाही. महाराष्ट्रात वैद्यकीय सुविधा व्यवस्थित आहे, डॉक्टर, नर्सेस उत्तम काम करत आहे. थोडा त्रास होईल पण लोकांची कुठेही गैरसोय होणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. 

लॉकडाऊनबाबत १२ तारखेला आढावा घेऊ  

लॉकडाऊन वाढवण्याच्या मुद्दयावरही त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, '१२ तारखेला आढावा घेतला जाईल. त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची मते जाणून घेतली जातील. मात्र कमोडिटी स्प्रेड होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाईल. काही जिल्ह्यांमध्ये सुदैवाने एकही रुग्ण नाही. तिथे लॉकडाऊन वाढवायचा का असाही प्रश्न आहे. या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल'. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसministerमंत्री