शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

महाराष्ट्रात कुठेही अन्नधान्याची तूट नाही ; विश्वजीत कदम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:22 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पुणे :महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात अन्न, धान्याची तूट नसून वैद्यकीय व्यवस्था उत्तम काम करत असल्याचा विश्वास ज्याचे कृषी, सहकार, अन्न  व नागरी पुरवठा राज्य मंत्रीविश्वजीत कदम यांनी व्यक्त केला . पुण्यात त्यांनी गुरुवारी काही शिवभोजन केंद्रं व स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच मुद्द्यांवर कदम यांनी भाष्य केले. 

ते म्हणाले की, 'पुण्यातील शिवभोजन थाळीच्या केंद्रांची स्थितीसमाधानकारक आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना चांगलं जेवण उपलब्ध व्हावं हीच सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्रात कुठेही अन्न धान्याची तूट नाही. काही ठिकाणीं धान्य उपलब्ध आहे तर काही ठिकाणी होईल मात्र तुटवडा कुठेही नाही. महाराष्ट्रात वैद्यकीय सुविधा व्यवस्थित आहे, डॉक्टर, नर्सेस उत्तम काम करत आहे. थोडा त्रास होईल पण लोकांची कुठेही गैरसोय होणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. 

लॉकडाऊनबाबत १२ तारखेला आढावा घेऊ  

लॉकडाऊन वाढवण्याच्या मुद्दयावरही त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, '१२ तारखेला आढावा घेतला जाईल. त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची मते जाणून घेतली जातील. मात्र कमोडिटी स्प्रेड होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाईल. काही जिल्ह्यांमध्ये सुदैवाने एकही रुग्ण नाही. तिथे लॉकडाऊन वाढवायचा का असाही प्रश्न आहे. या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल'. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसministerमंत्री