शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महाराष्ट्रात कुठेही अन्नधान्याची तूट नाही ; विश्वजीत कदम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:22 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पुणे :महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात अन्न, धान्याची तूट नसून वैद्यकीय व्यवस्था उत्तम काम करत असल्याचा विश्वास ज्याचे कृषी, सहकार, अन्न  व नागरी पुरवठा राज्य मंत्रीविश्वजीत कदम यांनी व्यक्त केला . पुण्यात त्यांनी गुरुवारी काही शिवभोजन केंद्रं व स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता सर्वांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच मुद्द्यांवर कदम यांनी भाष्य केले. 

ते म्हणाले की, 'पुण्यातील शिवभोजन थाळीच्या केंद्रांची स्थितीसमाधानकारक आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना चांगलं जेवण उपलब्ध व्हावं हीच सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्रात कुठेही अन्न धान्याची तूट नाही. काही ठिकाणीं धान्य उपलब्ध आहे तर काही ठिकाणी होईल मात्र तुटवडा कुठेही नाही. महाराष्ट्रात वैद्यकीय सुविधा व्यवस्थित आहे, डॉक्टर, नर्सेस उत्तम काम करत आहे. थोडा त्रास होईल पण लोकांची कुठेही गैरसोय होणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. 

लॉकडाऊनबाबत १२ तारखेला आढावा घेऊ  

लॉकडाऊन वाढवण्याच्या मुद्दयावरही त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, '१२ तारखेला आढावा घेतला जाईल. त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची मते जाणून घेतली जातील. मात्र कमोडिटी स्प्रेड होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाईल. काही जिल्ह्यांमध्ये सुदैवाने एकही रुग्ण नाही. तिथे लॉकडाऊन वाढवायचा का असाही प्रश्न आहे. या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल'. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसministerमंत्री