शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Maharashtra Rain: राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट; अमरावतीला रेड अलर्ट

By श्रीकिशन काळे | Updated: September 15, 2023 20:10 IST

येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे...

पुणे : राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि.१६) व रविवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, अमरावती जिल्ह्यात रेड अलर्ट सांगितला आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून मात्र राज्यातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर राज्यात किमान काही भागातील दुष्काळाच्या सदृश्य स्थितीवर दिलासा मिळू शकणार आहे.

देशातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्यप्रदेश व लगतच्या भागावर आहे. येथून एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत जात आहे. त्यामुळे उत्तर मराठवाडा, उत्तर पश्चिम विदर्भ महाराष्ट्र येथे दोन दिवस पावसाची तीव्रता वाढणार आहे. पश्चिमी वाऱ्याची तीव्रता जास्त असल्यामुळे राज्यात कोकण, गोवा, घाट माथ्यावर मुसळधारचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण गोव्यात, १६ व १७ सप्टेंबरला तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. पुढील पाच दिवस राज्यात आकाश ढगाळ राहणार आहे. तसेच पुणे व परिसरात पुढील सात दिवस ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज देण्यात आला आहे. तर १६ व १७ सप्टेंबर रोजी घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे.

रेड अलर्ट : अमरावती

ऑरेंज अलर्ट : नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, वर्धा, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अकोला

राज्यातील पाऊस (मिमी)जळगाव : ६

महाबळेश्वर : १कोल्हापूर : ०.३

नाशिक : ०.४छत्रपती संभाजीनगर : ५

अकाेला : ०.६अमरावती : १४

बुलढाणा : ०१गोंदिया : १३

नागपूर : १५

राज्यात उद्या (दि.१६) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४,५ दिवस तीव्र पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.- के. एस. होसळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती