शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra: रब्बीच्या पेरण्या ९१ टक्क्यांवर, हरभरा वाढला, ज्वारी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 10:34 IST

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे....

पुणे : राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यातील रब्बीचे क्षेत्र सरासरी ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे. यंदा ४९ लाख ८ हजार २३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही पेरणी ९०.९६ टक्के आहे. गेल्या वर्षी ५४ लाख ६४ हजार ७१६ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही पेरणी ९० टक्के आहे.

यंदा हरभऱ्याच्या लागवडीत वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू व हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. राज्यात हरभऱ्याचे सरासरी लागवड क्षेत्र २१ लाख ५२ हजार १४ हेक्टर इतके आहे. रब्बी पिकांमध्ये हे क्षेत्र सर्वाधिक आहे. अवकाळी पावसाचा फायदा हरभऱ्याच्या लागवडीला झाला असून यंदा २३ लाख २० हजार ८६० हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही लागवड १०८ टक्के आहे.

हरभऱ्यानंतर ज्वारीचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. यंदा १३ लाख ७० हजार ८३० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या (१७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर) ही पेरणी ७८ टक्के तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १०९ टक्के आहे. गव्हाची पेरणी ७ लाख ९५ हजार ५४६ हेक्टरवर झाली आहे. सरासरीच्या (१० लाख ४८ हजार ८०७ हेक्टर) तुलनेत ही पेरणी ७५ टक्के व गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्के आहे.राज्यात यंदा अपुरा पाऊस झाला आहे. विहिरी, कूपनलिकांना पुरेसे पाणी नाही. धरणांमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पुरेसे आवर्तन मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या सरासरीच्या तुलनेत ९१ टक्केच झाल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा सुमारे ७० हजार हेक्टर जादा क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या.

पिके क्षेत्र टक्के (सरासरीच्या तुलनेत) गेल्या वर्षीच्या तुलनेत

ज्वारी १३७०८०--७८.१९--१०९

गहू ७९५५४६--७५.८५--८०

मका २६१९५९--१०१.४१--८१

हरभरा २३२०८६०--१०७.८५--८६

एकूण ४९०८२३८--९०.९४--९०

अवकाळी पावसामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ झाली आहे. मात्र, एकूणच परतीच्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने सरासरीच्या तुलनेत पेरण्या काहीशा कमी झाल्या आहेत.

- दिलीप झेंडे, संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड