शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Maharashtra: रब्बीच्या पेरण्या ९१ टक्क्यांवर, हरभरा वाढला, ज्वारी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 10:34 IST

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे....

पुणे : राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही घट असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यातील रब्बीचे क्षेत्र सरासरी ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे. यंदा ४९ लाख ८ हजार २३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही पेरणी ९०.९६ टक्के आहे. गेल्या वर्षी ५४ लाख ६४ हजार ७१६ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही पेरणी ९० टक्के आहे.

यंदा हरभऱ्याच्या लागवडीत वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू व हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. राज्यात हरभऱ्याचे सरासरी लागवड क्षेत्र २१ लाख ५२ हजार १४ हेक्टर इतके आहे. रब्बी पिकांमध्ये हे क्षेत्र सर्वाधिक आहे. अवकाळी पावसाचा फायदा हरभऱ्याच्या लागवडीला झाला असून यंदा २३ लाख २० हजार ८६० हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही लागवड १०८ टक्के आहे.

हरभऱ्यानंतर ज्वारीचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. यंदा १३ लाख ७० हजार ८३० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या (१७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर) ही पेरणी ७८ टक्के तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १०९ टक्के आहे. गव्हाची पेरणी ७ लाख ९५ हजार ५४६ हेक्टरवर झाली आहे. सरासरीच्या (१० लाख ४८ हजार ८०७ हेक्टर) तुलनेत ही पेरणी ७५ टक्के व गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्के आहे.राज्यात यंदा अपुरा पाऊस झाला आहे. विहिरी, कूपनलिकांना पुरेसे पाणी नाही. धरणांमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पुरेसे आवर्तन मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या सरासरीच्या तुलनेत ९१ टक्केच झाल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा सुमारे ७० हजार हेक्टर जादा क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या.

पिके क्षेत्र टक्के (सरासरीच्या तुलनेत) गेल्या वर्षीच्या तुलनेत

ज्वारी १३७०८०--७८.१९--१०९

गहू ७९५५४६--७५.८५--८०

मका २६१९५९--१०१.४१--८१

हरभरा २३२०८६०--१०७.८५--८६

एकूण ४९०८२३८--९०.९४--९०

अवकाळी पावसामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ झाली आहे. मात्र, एकूणच परतीच्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने सरासरीच्या तुलनेत पेरण्या काहीशा कमी झाल्या आहेत.

- दिलीप झेंडे, संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड