शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

Maharashtra: केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक, मराठवाड्यात बिकट स्थिती

By नितीन चौधरी | Updated: April 13, 2024 18:08 IST

सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे...

पुणे : राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होत चालली असून सबंध राज्यात आता केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विभागात आजपर्यंत तब्बल १ हजारांहून अधिक टँकरद्वारे टंचाईग्रस्तांना पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात २२ जिल्ह्यांत एकूण दोन हजारांहून अधिक टँकर सुरू झाले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ९ टक्क्यांनी पाणीसाठा घटला आहे.

एप्रिलच्या मध्यावर राज्यात पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ ३३.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमधील उपयुक्त साठा १३ हजार ६८९ दशलक्ष घनमीटर असून एकूण साठा २० हजार ६१४ दशलक्ष घनमीटर इतका शिल्लक राहिला आहे. गेल्या याच दिवशी राज्यात ४२.१९ टक्के पाणीसाठा होता. सर्वाधिक भीषण स्थिती मराठवाडा विभागात असून येथे केवळ १७टक्केच पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातील महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर पातळीवर पोचली असून धरणात केवळ १६ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात ३३.८८ टक्के तर सिद्धेश्वर धरणात ३९ टक्के साठा आहे.

पुणे विभागतही गंभीर स्थिती

राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या पुणे विभागातही पाण्याची स्थिती गंभीरच आहे. येथे एकूण क्षमतेच्या केवळ ३१.७२ टक्के साठा शिल्लक राहिला आहे. विभागातील सर्व धरणांत मिळून ४ हजार ८२२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त तर ७ हजार २९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विभागातील सर्वांत मोठ्या असलेल्या कोयना प्रकल्पात क्षमतेच्या ४२.२४ टक्के पाणीसाठा आहे. तर उजनी धरणात शुन्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनीतील साठा सध्या उणे स्थितीत आहे. कोकण विबागात तुलनेने राज्यात सर्वाधिक ४७ टक्के साठा असला तरी उपयुक्त साठा केवळ १ हजार ७४८ दशलक्ष घनमीटर इतकाच आहे. तर एकूण साठा १ हजार ९१३ दशलक्ष घनमीटर आहे. विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात अनुक्रमे ४४.३९ व ४६.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक विभागात ३४.८७ टक्के पाणीसाठा आहे.

राज्यात २ हजार टँकरद्वारे पुरवठा

पाण्याची स्थिती गंभीर बनत चालल्याने राज्यात आजमितीस सुमारे २ हजार ९३ टँकरद्वारे २२ जिल्ह्यांतील १ हजार ६६५ गावे व ४ हजार वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची सर्वात जास्त झळ मराठवाडा विभागाला बसली असून येथे १ हजार ६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल नाशिक विभागात ४८१ तर पुणे विभागात ४२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वात कमी २ टँकर नागपूर विभागात सुरू असून अमरावतीत ४० तर मुंबईत विभागात ८४ टँकर सुरू आहेत.

राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती (टक्क्यांत)

नागपूर ४४.४९अमरावती ४६.६४

संभाजीनगर १७.०५नाशिक ३४.८७

पुणे ३१.७२मुंबई ४७.२१

एकूण ३३.८१

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरण