शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra: दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार

By नितीन चौधरी | Updated: March 4, 2024 18:21 IST

मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे...

पुणे : गेल्या दोन महिन्यांत राज्यात तब्बल पावणेसहा लाख नवमतदारांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख मतदारांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. याच काळात सुमारे १ लाख ८७ हजार नावे वगळण्यासाठी अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत १ लाख नावे वगळण्यात आली आहेत. मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने निवडणूक कार्यालयांना निर्धारित वेळेत अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात, राज्याला मतदार नोंदणी, नावे वगळणे आणि नाव-पत्ता बदलासाठी एकूण १४ लाख ७१ हजार लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील सर्व प्रकारांमधील ९ लाख ८४ हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात नवमतदारांची संख्या ५ लाख ७३ हजार ८९१ असून १ लाख ४ हजार ६४४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ९५ हजार ३९५ नवमतदारांनी ठाणे जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी ७१ हजार ५२२ मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, तर ९१ हजार ६९३ नवमतदारांनी पुणे जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी ६२ हजार ३१८ मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, तर अजूनही २२ हजार ६१२ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.

नावे वगळण्यासाठी राज्यभरातून १ लाख ८७ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार ६४४ नावे वगळण्यात आली आहेत, तर ५७ हजार ६९६ अर्जांवर कार्यवाही पूर्ण करून ही नावेही वगळण्यात येणार आहेत, तर नाव, पत्ता, मतदान केंद्रांत बदल करण्यासाठी ४ लाख ६२ हजार ७ मतदारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३ लाख ५ हजार ९९९ मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, मतदार अर्ज मतदार यादीत समाविष्ट केले जातील. त्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला पुन्हा सात दिवस लागतात, त्यामुळे नामांकन दाखल करण्याआधी एक आठवडा सर्व अर्जांवर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानMaharashtraमहाराष्ट्र