शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Maharashtra: दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार

By नितीन चौधरी | Updated: March 4, 2024 18:21 IST

मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे...

पुणे : गेल्या दोन महिन्यांत राज्यात तब्बल पावणेसहा लाख नवमतदारांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख मतदारांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. याच काळात सुमारे १ लाख ८७ हजार नावे वगळण्यासाठी अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत १ लाख नावे वगळण्यात आली आहेत. मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने निवडणूक कार्यालयांना निर्धारित वेळेत अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात, राज्याला मतदार नोंदणी, नावे वगळणे आणि नाव-पत्ता बदलासाठी एकूण १४ लाख ७१ हजार लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील सर्व प्रकारांमधील ९ लाख ८४ हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात नवमतदारांची संख्या ५ लाख ७३ हजार ८९१ असून १ लाख ४ हजार ६४४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ९५ हजार ३९५ नवमतदारांनी ठाणे जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी ७१ हजार ५२२ मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, तर ९१ हजार ६९३ नवमतदारांनी पुणे जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी ६२ हजार ३१८ मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, तर अजूनही २२ हजार ६१२ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.

नावे वगळण्यासाठी राज्यभरातून १ लाख ८७ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार ६४४ नावे वगळण्यात आली आहेत, तर ५७ हजार ६९६ अर्जांवर कार्यवाही पूर्ण करून ही नावेही वगळण्यात येणार आहेत, तर नाव, पत्ता, मतदान केंद्रांत बदल करण्यासाठी ४ लाख ६२ हजार ७ मतदारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३ लाख ५ हजार ९९९ मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, मतदार अर्ज मतदार यादीत समाविष्ट केले जातील. त्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला पुन्हा सात दिवस लागतात, त्यामुळे नामांकन दाखल करण्याआधी एक आठवडा सर्व अर्जांवर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानMaharashtraमहाराष्ट्र