शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Maharashtra: दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार

By नितीन चौधरी | Updated: March 4, 2024 18:21 IST

मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे...

पुणे : गेल्या दोन महिन्यांत राज्यात तब्बल पावणेसहा लाख नवमतदारांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख मतदारांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. याच काळात सुमारे १ लाख ८७ हजार नावे वगळण्यासाठी अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत १ लाख नावे वगळण्यात आली आहेत. मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने निवडणूक कार्यालयांना निर्धारित वेळेत अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात, राज्याला मतदार नोंदणी, नावे वगळणे आणि नाव-पत्ता बदलासाठी एकूण १४ लाख ७१ हजार लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील सर्व प्रकारांमधील ९ लाख ८४ हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात नवमतदारांची संख्या ५ लाख ७३ हजार ८९१ असून १ लाख ४ हजार ६४४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ९५ हजार ३९५ नवमतदारांनी ठाणे जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी ७१ हजार ५२२ मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, तर ९१ हजार ६९३ नवमतदारांनी पुणे जिल्ह्यात अर्ज केले आहेत. त्यापैकी ६२ हजार ३१८ मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, तर अजूनही २२ हजार ६१२ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.

नावे वगळण्यासाठी राज्यभरातून १ लाख ८७ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार ६४४ नावे वगळण्यात आली आहेत, तर ५७ हजार ६९६ अर्जांवर कार्यवाही पूर्ण करून ही नावेही वगळण्यात येणार आहेत, तर नाव, पत्ता, मतदान केंद्रांत बदल करण्यासाठी ४ लाख ६२ हजार ७ मतदारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३ लाख ५ हजार ९९९ मतदारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, मतदार अर्ज मतदार यादीत समाविष्ट केले जातील. त्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला पुन्हा सात दिवस लागतात, त्यामुळे नामांकन दाखल करण्याआधी एक आठवडा सर्व अर्जांवर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानMaharashtraमहाराष्ट्र