शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Maharashtra election 2019 :माझे अश्रू सांगण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी युती कशी टिकेल हे पाहावं 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 1:39 PM

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले असून ठाकरे यांनी माझे अश्रू सांगण्यापेक्षा युती कशी टिकेल हे उद्धव ठाकरे यांनी पाहावं अशी बोचरी टीका केली आहे.

पुणे : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले असून ठाकरे यांनी माझे अश्रू सांगण्यापेक्षा युती कशी टिकेल हे उद्धव ठाकरे यांनी पाहावं अशी बोचरी टीका केली आहे.

मंगळवारी झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले होते की, “अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. ते पाणी पाहून मला मगरीचे अश्रूच आठवले. तुमच्याकडे जेव्हा माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा. काय बोलला होतात ते विसरु नका.” आता त्यावर पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे. 

पवार म्हणाले की, ' 5 वर्ष शिवसेना सरकारमध्ये होती. त्यांनी फक्त पोकळ आश्वासन  दिली. राज्यात  बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, त्याच उत्तर त्यांनी द्यावे.  पीक विमा का मिळाले नाहीत असा सवालही त्यांनी विचारला.  मी कसा आहे ते लोकांना माहिती आहे. माझे अश्रू मगरीचे आहेत की कशाचे हे तपासायचं काम उध्दव ठाकरे कधीपासून करायला लागले असंही ते म्हणाले. 

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

- शिवसेना पाच वर्ष झोपली होती का ? आता दहा रूपयांत जेवण आणि कर्जमाफीच्या घोषणा करताय इतके दिवस सत्तेत असताना झोपले होते का ?

- ही देशाची निवडणूक नाही. राज्याची निवडणूक आहे. 370 चा मुद्दा आता राज्यात नाही. 

-  हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे मी कायम सांगतोय.  आता कांद्याला पैसे मिळायला लागले तर लगेच निर्यात बंदी केली. 

- भाजपच्या विरोधात मतविभाजनाचा फटका बसू नये म्हणून कोथरूडमध्ये मनसेला पाठिंबा.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना