शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

Maharashtra Election 2019 : स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा : योगी आदित्यनाथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 19:03 IST

 राजकारण करताना विचारधारा नसली तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते.

ठळक मुद्देशिवसेना व भाजपा यांची मुल्यनिती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीतपाच वर्षानंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण

लोणावळा : स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरिता लोणावळा शहरात आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना मार्गदर्शन करताना स्वार्थी राजकारणावर टिका केली.

   यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, प्रचारप्रमुख रविंद्र भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, लोणावळा शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल इंगूळकर, रिप‍ाईच्या महिलाध्यक्षा यमुना साळवे, बिंद्रा गणात्रा, शौकत शेख, भरत हारपुडे, मोतीराम मराठे, देविदास कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

योगी म्हणाले,  राजकारणात कार्यकर्ते अनेक व तिकीट एक असते, त्यांच्यामध्ये तिकीट मिळविण्याकरिता निकोप स्पर्धा असते. मात्र संधीसाधू व्यक्ती ह्या राजकारणात स्वार्थासाठी पक्ष बदलतात त्यांना उद्या कोणी काही लालच दाखविल्यास ते महाराष्ट्राच्या विरोधात देखिल उभे होतील अशा स्वार्थी व संधीसाधू राजकारण्यांना घरी बसवावे. राजकारण हे स्वार्थाचे नसावे ते परमार्थ, आदर्श, मुल्यावर आधारित असावे. सत्ता राष्ट्राला समर्पित असल्यास विकास कसा होतो हे मागील पाच वर्षात देशाने पाहिले आहे. मागील 70 वर्ष देशाचे विभाजन करणारे काँग्रेस पक्षाने लादलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द करत देशाला एक भारत श्रेष्ठ भारत बनविले. महिला सशक्तीकरणाकरिता तिहेरी तलाक विरुध्द कायदा करत मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून दिला. बाळा भेगडे यांनी 1400 कोटी रुपयांचा निधी आणत मावळात विकास केला. त्यांची योग्यता व क्षमता पाहून त्यांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. भेगडे यांनी मावळ तालुक्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेहले आहे.

     राजकारण करताना विचारधारा नसली तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते. सिध्दांतहिन राजकारण म्हणजे मृत्युचा फंदा असल्याने संधीसाधू मंडळींना सत्तेपासून दूर ठेवा. शिवसेना व भाजपा यांची मुल्यनिती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून एकत्र राजकारण करतात. ह्या निवडणुकीत देखिल ह्या मुल्यांची जपणूक केली जाणार आहे. भाजपा शिवसेना रिपाईच्या सरकारने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजकारणाला आळा घालण्याचे काम केले आहे. पाच वर्षापुर्वी देशात व राज्यात आतंकवाद व दहशतवाद माजला होता, आज पाच वर्षानंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले.

     राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनोगतात मावळात केलेल्या विकासकामांचा पाडा वाचून दाखवत काय विकास केला म्हणणार्‍यांनी समोर येऊन बसावे असे आवाहन विरोधकांना केले. मी शिवरायांचा मावळा आहे, राजकारण निष्ठेने करतो, फसवा फसवी माझ्या रक्तात नाही, मावळातील जाधववाडी येथिल जमिनीचा प्रश्न, पवना धरण बाधितांचा जमिनीचा प्रश्ना, रिंगरोड, कार्ला व नवलाख उंब्रे एमआयडीसीचा विषय ही अनेक वर्षाची रखडलेली कामे मार्गी लावली. शेतकर्‍यांची जमिन शेतकर्‍यांना परत देण्याची भावना असावी लागते, ती आमच्याकडे होती म्हणून विषय मार्गी लागले. पवना जलवाहिनीचे राजकारण नाही केले तर शहिदांच्या वारसांना नोकर्‍या दिल्या, 179 शेतकर्‍यांवर दाखल झालेले गंभिर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले. भविष्यात देखिल शेतकर्‍य‍ांवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द यावेळी मावळवासीयांना दिला.    नगराध्यक्षा सुरेखा जाधव, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी त्यांच्या भाषणांमध्ये सुनिल शेळके यांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी व्यासपिठावर आलेल्या माकडाचे उदाहरण देत वाघमारे म्हणाले माकडाला निष्ठा कळते पण एका ताटात खाणार्‍यांना निष्ठा कळत नाही. मावळात उड्या मारणार्‍या ह्या माकडाला थांबविण्याचे आवाहन भाजपाप्रमाणे शिवसैनिक व भिमसैनिकांनी स्विकारले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाElectionनिवडणूकPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथmaval-acमावळ