शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Maharashtra Election 2019: 'सत्तेचा गैरवापर अन् राज्य 50 वर्षे मागे जात आहे; नेतृत्व बदलण्याची भूमिका घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 19:48 IST

जुन्नर विधानसभा मतदारसंघ 2019 - शेतीच्या भागात आपण अनेक कष्ट घेतो परंतु त्याला योग्य भाव देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची दिसत नाही. देशात महागाई ही शेतकऱ्यांमुळे झाल्याचे राज्यकर्ते सांगतात

जुन्नर - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचाराला वेग आलेला आहे. आज देशाची आणि राज्याची सूत्र आपण ज्यांच्या हाती दिली त्यांच्याकडून आपले राज्य अनेक क्षेत्रात मागे पडत आहेत त्यामुळे आता नेतृत्व बदलण्याची भूमिका आपण घ्यायला हवी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नर येथील जाहीर सभेत केले.

आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कानाकोपऱ्यात जाण्याचा मला योग आलाय. मला आनंद होतोय की प्रचाराची सुरुवात शिवनेरीच्या पायथ्याशी होतोय. सामान्यांसाठी ज्याने राज्य स्थापन केले त्यांच्या जन्मभूमीत पहिली सभा होतेय असेही शरद पवार म्हणाले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, या भागातील अनेक माणसांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम अतुल बेनके करतील असा विश्वास आहेच शिवाय मला खात्री आहे की, सुविद्य इंजिनिअरकडून या विभागाचा चेहरा बदलण्याचे काम नक्कीच होईल असा विश्वासही पवार यांनी अतुल बेनके यांचे कौतुक करताना व्यक्त केला.

तसेच शेतीच्या भागात आपण अनेक कष्ट घेतो परंतु त्याला योग्य भाव देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची दिसत नाही. देशात महागाई ही शेतकऱ्यांमुळे झाल्याचे राज्यकर्ते सांगतात. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झालाय. आजवर १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही पवारांनी केला. शेतीप्रमाणे उद्योगधंदा ही महत्त्वाचा आहे. आजचे राज्यकर्ते हे कारखानदारी कमी करायच्या मागे लागल्याचे दिसतंय. केवळ नाशिक जिल्ह्यात जवळपास १६ हजार तरुण बेरोजगार झाले आहेत. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, राज्याची दुय्यम राजधानी आणि मुख्यमंत्री साहेबांचे नागपूर शहर गुन्हेगारीचे केंद्र झाले आहे. मात्र याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाही. सत्तेचा गैरवापर आजचे सरकार करत आहे. यातून राज्याला पाच- पन्नास वर्षे मागे घेऊन जाण्याचे काम होत आहे असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस