शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

बुधवारी महाराष्ट्र बंद; एसटी सज्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 04:25 IST

भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकावर प्रथमोपचार सेवा द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे.

मुंबई  - भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकावर प्रथमोपचार सेवा द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे. बंदमुळे फेºया रद्द झाल्यास आरक्षित तिकिटांचा परतावा देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश राज्यातील सर्व विभागांना देण्यात आले आहेत.भीमा कोरेगाव घटनेमुळे मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत राज्यभरात १८७ एसटी बसचे नुकसान झाले. मराठवाडा, विदर्भ या भागात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती महामंडळाने दिली.मंगळवारी संघटनांकडून ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या काळात एसटी प्रशासनाने स्थानक-आगारातील गर्दी पाहून बस चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. विभागीय पातळीवर सर्व माहिती निंयत्रण कक्षासह वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांना ‘मेल’ करा, अशा सूचना महामंडळाने परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.आंदोलनकर्त्यांचा भावना व्यक्त करण्याचा हक्क आम्हाला जरी मान्य आहे. तथापि त्या व्यक्त करताना सर्वसामान्यांच्या एसटी सेवेला ‘लक्ष्य’ करणे योग्य नाही. याच त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. एसटीचे आर्थिक नुकसानही होते. परिणामी आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक रास्तारोको या माध्यमातून एसटीला लक्ष्य करुन त्याची मोडतोड करु नये, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले.प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवलेप्रवाशांपेक्षा महामंडळाला आपल्या बसची अधिक काळजी असल्याची घटना मंगळवारी घडली. पुण्याहून मुंबईकडे आलेल्या एसटीच्या शिवनेरीच्या चालकाने खारघरला पोहोचल्यावर बस पुढे जाणार नाही, येथेच उतरुन घ्या, असे सांगितले. बहुतेक प्रवासी उतरून गेले; मात्र काही प्रवाशांनी आक्षेप घेतला. एसटीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना फोन केले; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांनी वाद घातल्यानंतर शिवनेरी चालक बस घेऊन वाशी महामार्गापर्यंत सोडण्यास तयार झाला. परिणामी मुंबईपर्यंतचे प्रवासी भाडे अदा करणाºया प्रवाशांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. हार्बर मार्ग बंद असल्यामुळे प्रवाशांना ठाणे मार्गे मुंबई गाठावे लागले.आज शाळा सुरू; स्कूल बस बंद!च्भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मुंबईत उमटू लागल्याने मंगळवारी बहुतेक शाळांनी सुरक्षेच्या कारणास्तव दुपारीच विद्यार्थ्यांना घरी सोडले. दरम्यान, बुधवारी विविध संघटना व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतरही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा बंद ठेवण्यास नकार दिला आहे. बुधवारी तणावाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागणार आहे.च्याबाबत पालकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार जिल्ह्यातील शाळा सुरू राहणार असल्याची माहिती दिली. तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणत्याही प्रकारची सुट्टी जाहीर केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील सद्यस्थिती पाहता शाळेतील मुलांची सुरक्षितता आणि बसचे रक्षण करण्यासाठी सकाळच्या सत्रात स्कूल बस धावणार नाही. बुधवारी सकाळची परिस्थिती पाहून दुपारच्या सत्रातील स्कूलबस बाबत निर्णय घेण्यात येईल. वैयक्तिक विद्यार्थी वाहतूक करणाºयांनी परिस्थिती पाहून वाहतूकीबाबत निर्णय घ्यावा, अशी माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे