शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बुधवारी महाराष्ट्र बंद; एसटी सज्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 04:25 IST

भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकावर प्रथमोपचार सेवा द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे.

मुंबई  - भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकावर प्रथमोपचार सेवा द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे. बंदमुळे फेºया रद्द झाल्यास आरक्षित तिकिटांचा परतावा देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश राज्यातील सर्व विभागांना देण्यात आले आहेत.भीमा कोरेगाव घटनेमुळे मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत राज्यभरात १८७ एसटी बसचे नुकसान झाले. मराठवाडा, विदर्भ या भागात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती महामंडळाने दिली.मंगळवारी संघटनांकडून ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या काळात एसटी प्रशासनाने स्थानक-आगारातील गर्दी पाहून बस चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. विभागीय पातळीवर सर्व माहिती निंयत्रण कक्षासह वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांना ‘मेल’ करा, अशा सूचना महामंडळाने परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.आंदोलनकर्त्यांचा भावना व्यक्त करण्याचा हक्क आम्हाला जरी मान्य आहे. तथापि त्या व्यक्त करताना सर्वसामान्यांच्या एसटी सेवेला ‘लक्ष्य’ करणे योग्य नाही. याच त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. एसटीचे आर्थिक नुकसानही होते. परिणामी आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक रास्तारोको या माध्यमातून एसटीला लक्ष्य करुन त्याची मोडतोड करु नये, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले.प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवलेप्रवाशांपेक्षा महामंडळाला आपल्या बसची अधिक काळजी असल्याची घटना मंगळवारी घडली. पुण्याहून मुंबईकडे आलेल्या एसटीच्या शिवनेरीच्या चालकाने खारघरला पोहोचल्यावर बस पुढे जाणार नाही, येथेच उतरुन घ्या, असे सांगितले. बहुतेक प्रवासी उतरून गेले; मात्र काही प्रवाशांनी आक्षेप घेतला. एसटीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना फोन केले; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांनी वाद घातल्यानंतर शिवनेरी चालक बस घेऊन वाशी महामार्गापर्यंत सोडण्यास तयार झाला. परिणामी मुंबईपर्यंतचे प्रवासी भाडे अदा करणाºया प्रवाशांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. हार्बर मार्ग बंद असल्यामुळे प्रवाशांना ठाणे मार्गे मुंबई गाठावे लागले.आज शाळा सुरू; स्कूल बस बंद!च्भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मुंबईत उमटू लागल्याने मंगळवारी बहुतेक शाळांनी सुरक्षेच्या कारणास्तव दुपारीच विद्यार्थ्यांना घरी सोडले. दरम्यान, बुधवारी विविध संघटना व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतरही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा बंद ठेवण्यास नकार दिला आहे. बुधवारी तणावाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागणार आहे.च्याबाबत पालकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार जिल्ह्यातील शाळा सुरू राहणार असल्याची माहिती दिली. तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणत्याही प्रकारची सुट्टी जाहीर केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील सद्यस्थिती पाहता शाळेतील मुलांची सुरक्षितता आणि बसचे रक्षण करण्यासाठी सकाळच्या सत्रात स्कूल बस धावणार नाही. बुधवारी सकाळची परिस्थिती पाहून दुपारच्या सत्रातील स्कूलबस बाबत निर्णय घेण्यात येईल. वैयक्तिक विद्यार्थी वाहतूक करणाºयांनी परिस्थिती पाहून वाहतूकीबाबत निर्णय घ्यावा, अशी माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे