शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सामान्यांच्या ‘उडान’ला लॅँडिंग मिळेना, परवडणारी विमानसेवा अजूनही दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:13 IST

पुणे : सामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ‘उडान’ (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) ही विमानसेवा जाहीर केली.

श्रीकिशन काळे पुणे : सामान्य नागरिकांना विमानसेवेचा लाभ मिळावा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये ‘उडान’ (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) ही विमानसेवा जाहीर केली. परंतु मुंबईमध्ये या सामान्य नागरिकांसाठीच्या ‘उडान’ला लॅँडिंगसाठी जागाच उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे सामान्यांचे कमी दरात ‘उडान’ करण्याचे स्वप्न अजून तरी स्वप्नच राहिले आहे. पुणे-नाशिक-मुंबई या मार्गासाठी विमान उपलब्ध असूनही, त्याला भरारी घेता येत नाही.सामान्य नागरिकांनी विमानात बसावे, या सेवेत वाढ व्हावी, रोजगार वाढावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘उडान’ या सेवेचे उद्घाटन एप्रिल २०१७मध्ये केले होते. ‘उडान’ म्हणजे ‘उडे देश का आम नागरिक’ अशी त्याची व्याख्या करण्यात आली आहे. देशात सुरुवातीला ४३ ठिकाणी ही सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात आली. त्यातील काही ठिकाणी ही सेवा सुरू झाली आहे. परंतु, महाराष्टÑात मात्र नांदेड सोडलेतर इतर ठिकाणचे ‘उडान’ अद्याप झालेले नाही.राज्यातील पुणे, नाशिक (ओझर), जळगाव, कोल्हापूर, सोलापूर येथे ही सेवा सुरू करण्यासाठी एअर डेक्कन या कंपनीला अधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु, येथून ‘उडान’ करणाºया विमानांना मुंबईत लॅँडिंग करण्यासाठीचे ‘स्लॉट’ म्हणजेच जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे ‘उडान’ अद्याप ‘हवेत’च आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी एअर डेक्कन कंपनीला ३० सप्टेंबर २०१७पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु ती संपली आहे.दरम्यान, ही सेवा त्वरित सुरू करावी यासाठी, विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथील एअरपोर्ट आॅथॉरिटीचे जनरल मॅनेजर प्रदीप कुमार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मुंबईत लॅँडिंगसाठी ‘स्लॉट’ उपलब्ध होत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे लॅँडिंगसाठी जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत सामान्यांचे ‘उडान’ अधांतरीच राहणार आहे.>‘मुंबई-नाशिक-पुणे’ ही सेवा तरी सुरू करावीमुंबई-नाशिक (ओझर)-पुणे या मार्गावर आता सेवा सुरू करता येऊ शकते. त्यासाठी १८ प्रवासी क्षमता असणारे एम २८ हे विमानउपलब्ध आहे. परंतु, ही सेवादेखील सुरू करण्यात आलेली नाही. ही सेवा तरी त्वरित सुरू व्हावी, अशी मागणी विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमधील महानगरपालिकेच्या निवडणुकी वेळी येथील सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी विमानसेवेचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही, असेही वंडेकर यांनी सांगितले.>सवलतीमध्येमिळणार तिकीटसामान्य नागरिकांसाठी ‘रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम’ (आरसीएस) अंतर्गत तिकीटदरात सवलत मिळणार आहे. ‘उडान’च्या सेवेसाठी प्रथम येणाºया ५० टक्के प्रवाशांना ही सवलत मिळेल. उदाहरणार्थ- शंभर प्रवासी क्षमता असणाºया विमानात ५० प्रथम येणाºया प्रवाशांना सवलतीत तिकीट मिळेल.>गुजरातमध्ये सुरू; महाराष्टÑात का नाही ?गुजरात राज्यामध्ये भावनगर-अहमदाबाद, दिऊ-अहमदाबाद, जामनगर-अहमदाबाद, मिठापूर (द्वारका)-अहमदाबाद, मुंद्रा-अहमदाबाद या सेवा आॅगस्ट महिन्यातच सुरू झाल्या आहेत. परंतु, महाराष्टÑात मात्र मुदत संपूनही या सेवा सुरू झालेल्या नाहीत, असे धैर्यशील वडेकर यांनी सांगितले.>आरसीएमअंतर्गतविमानसेवा दरमार्ग तिकीट दरमुंबई-नाशिक-पुणे १,४२०मुंबई-कोल्हापूर १,९२०मुंबई-जळगाव २,२५०मुंबई-सोलापूर २,०८०

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळ