शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन

By admin | Updated: November 30, 2015 01:45 IST

संतसाहित्य हे ज्ञानाचे आणि लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन आहे. साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे.

पिंपरी : संतसाहित्य हे ज्ञानाचे आणि लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन आहे. साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. समाजात जे जे काही घडते ते साहित्यातून अभिव्यक्त होत असते. तो आरसा नितळ असावा, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.२४ वे विभागीय साहित्य संमेलन भोसरी येथे १ व २ डिसेंबरला होत आहे. त्या निमित्ताने संमेलनाध्यक्ष देखणे यांची प्रकट मुलाखत घेतली. कीर्तनकार, प्रवचनकार, चिंतनशील वक्ते, तत्त्वज्ञ, बहुरूपी, भारुडाचे प्रयोग करणारे भारुडकार, लोकसाहित्य, लोककला, संत साहित्याचे गाढे अभ्यासक अशा अनेक भूमिका वठविणारे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. रामचंद्र देखणे होत. संतवाङ्मय, लेखन, संशोधन आणि आविष्कार असे योगदान त्यांनी दिले आहे. साहित्याविषयीची त्यांची भूमिका, सध्याचे सहिष्णूतेच्या नावावर पिटला जाणारा डांगोरा, मराठी भाषेच्या संवर्धन विकासाविषयी केलेली चिंता, साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक पद्धती यावर भाष्य केले. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपली भावना काय? संतसाहित्य, ललित, लोककला, लोकजीवन, सांस्कृतिक, वैचारिक, प्रबोधनात्मक, चिंतनशील परंपरेचा हा गौरव आहे. पस्तीस वर्षांच्या सेवेचा हा बहुमान आहे. एकीकडे संतसाहित्याचा प्रभाव, ज्ञानोबा-तुकोबा आणि दुसरीकडे श्रमिकांची भूमी असे या भूमीस महत्त्व आहे. संत आणि श्रमसंस्कृती अशा दोन संस्कृतींच्या काठावरती मी उभा आहे. मागे वळून पाहताना काय वाटते?१९७२ च्या दुष्काळाच्या कालखंडात मी पुण्यात शिकायला होतो. त्या वेळी डब्याबरोबरच विदारक अशा दुष्काळाबाबत माहिती देणारी पत्रे घरातून येत असत. दुष्काळ एवढा भयानक होता की, जीवदया मंडळात आपली गुरे-ढोरे देण्यापलीकडे पर्याय उरला नव्हता. वडिलांनी आपली गुरे तालुक्याच्या गावात नेऊन सोडली. वडील घरी आले. मात्र, त्यांना झोप लागली नाही. पहाटे तीनच्या सुमारास कोणीतरी घराच्या दारावर थाप दिल्यासारखे झाले. दरवाजा उघडला, तर आमची गाय समोर उभी होती. अकरा किलोमीटर चालून ती घरी आली होती. दुष्काळात मी काय जड झाले की काय, असा प्रश्न ती आमच्या कुटुंबाला करीत असावी. याच जाणिवेतून पहिली कथा जन्माला आली. तिचे नाव म्हणजे जित्राब. पुढे लिहायला लागलो. ग्रामीण जीवन, बोधकथा, गुराख्यांचे जीवन, अज्ञात शिवराचा शोध , हरवलेले गावपण यावर कथा लिहल्या. ललित आणि संतसाहित्य असा वारसा घरात होता. त्यामुळे गुरे वळण्याबरोबरच औतकाठी करणे, गावजत्रात सहभागी होणे, लळितात भाग घेणे, जत्रेच्या तमाशात गण सादर करणे असे समृद्ध ग्रामीण जीवन अनुभवले. लोककलेतील कलाकार किंवा मौखिक साहित्य परंपरेला साहित्याचा किंवा साहित्यिकांचा दर्जा मिळालेला नाही. संतसाहित्य हे ज्ञानाचे आणि लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन आहे. संत आणि लोकसाहित्यांची सेवा करता आली ही गोष्ट मी भाग्याची समजतो. ज्याने वैश्विक जाणिवा दिल्या, तो संत साहित्याचा प्रवाह आहे. सामाजिक असहिष्णूतेचा डांगोरा पिटणे योग्य वाटते का? विवेकाची दृष्टी देणारा साहित्यिक असतो. जगातील सर्वांगसुंदर साहित्य हे वेदनेतून जन्माला आले. वेदना, संवेदना, सहवेदना ही साहित्यनिर्मितीच्या घरातील भावंडे आहेत. सामूहिक जीवन जगण्यासाठी जरी आवश्यक असणाऱ्या जीवनमूल्यांना जागविणे हे साहित्याचे प्रयोजन असले, तरी सामाजिक सहिष्णूता टिकविणे हेही साहित्याचे प्रयोजनच आहे. त्यामुळे साहित्यिक हा सहिष्णूता टिकविणारा घटक आहे, विघटन करणारा किंवा असहिष्णूता वाढविणारा नव्हे. दुभंगलेल्यांना अभंग करण्याचे काम साहित्याने केले आहे. साहित्यिकांनी अतिरेक करणे टाळावे. भाषा संवर्धनासाठी प्रयत्न होताहेत का?साहित्य हे मनोरंजन आणि प्रबोधनासाठी निर्माण झालेले आहे. सर्वत्र मराठीचा वापर व्हायला हवा. भाषा टिकली, तर संस्कृती टिकणार आहे. संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच आहे. नाणेघाटात सापडलेल्या शिलालेखावरून २२०० वर्षांपासून मराठी भाषा अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली आहे. बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. त्यामुळे त्या भाषेला अभिजात दर्जा का मिळू नये? साहित्य संमेलन हे साहित्य विश्वाचा प्रमुख सोहळा आहे. त्या सोहळ्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया नसावी.(प्रतिनिधी)