शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

लोकमत वुमेन समीट २०१९ - दोन संघर्षशालिनींचा गौरव.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 11:56 IST

सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी.

ठळक मुद्दे‘ मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सौ ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुस-याच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरूषाचे गुण

पुणे : आदिवासी पाड्यांवरील मुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आणि बचतगटाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना सक्षम करणाऱ्या ठमाताई पवार यांना  ‘ मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ तर ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथा लेखिका सुमित्रा भावे यांना  ‘सौ ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.     ’लोकमत वुमन समीट’च्या आठव्या पर्वात लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. के.एच संचेती, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब मुजुमदार आणि लेक्सिकन स्कूलच्या संचालिका डॉ. मोनिशा शर्मा उपस्थितीत या दोन संघर्षशालिनींचा गौरव करण्यात आला.

    सत्काराला उत्तर देताना ठमाताई पवार म्हणाल्या,मी स्वत: शिकलेले नाही. वनवासी कल्याण आश्रमात भाकरी थापता थापता पीठात अक्षर काढायला शिकले. लग्नानंतर दोन मुले झाल्यावर लिहायला शिकले. आज आदिवासी पाड्यातील स्थिती पाहिली तर महिलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. घरातली कर्ती बाईच अशी असेल तर मुलांवर काय संस्कार होणार? तिच्या आरोग्यावरही परिणाम होणारच यासाठी गावातील लोकांच्या पाठीवर मायेचा हात ठेवला. गावात भजनी मंडळे सुरू केली. दिंड्या काढल्या आणि ही व्यसनाधीनता दूर करण्याचा प्रयत्न केला. आज जो समाज भरकटलेला आहे. तो मुख्य प्रवाहात यावा अशी इच्छा आहे, त्यादृष्टीनेच प्रयत्न सुरू असून, शिक्षणानेच ही गोष्ट साध्य होणार आहे.    सुमित्रा भावे यांचे मनोगत यावेळी वाचून दाखविण्यात आले. गेली जवळजवळ पस्तीस वर्षे मी चित्रपट बनवत असले तरी माझे चित्रपट ज्यांना व्यावसायिक किंवा करमणूकप्रधान म्हटले जातात त्या पठडीतील नसल्यामुळे त्यांना ग्लँमर नाही. पण तरीही लोकमत वृत्त्तसंस्थेनं माझं काम बघितलं आणि त्याचं कौतुक केलं. ही गोष्ट मला नुसती माझ्या वैयक्तिक आनंदाची वाटली नाही तर प्रगल्भ सामाजिक जाणिवेची ती खूण आहे अशी भावना त्या मनोगतातून त्यांनी मांडली. सध्याच्या काळात  ‘पेड जर्नँलिझम’ हा विषय खूप चर्चेत असतो. पण आपल्या महाराष्ट्रात स्वच्छ, सकस, संवेदनशील असं काम केलं तर पत्रकार तुमचा आदर करून तुमच्या कामाला समाजासमोर आणण्यास मदत करतात हे पुन्हा एकदा अनुभवून त्याचा अभिमान वाटला असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
    या समिटची संकल्पना  ‘लिव्ह टू लीड’ अशी आहे. पण सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी  ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी. स्त्रीने नेतृत्वात पुढाकार घ्यायला हवा असं म्हणत असताना इथे स्त्री-पुरूष यांच्यातला शारीरिक भेद अभिप्रेत नाही. कारणं तसं म्हटलं तर ते विधान एकतर्फी आणि पुरूषांवर अन्यायकारक होईल. इथं शारीरिक भेद अभिप्रेत नसून गुणवैशिष्ट्य, अभिप्रेत आहे. मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुस-याच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं म्हणजेच स्त्रीत्व! आणि निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरूषाचे गुण म्हणता येतील. या दोन्ही गुणांची बेरीज झाल्याखेरीज समाजातील विषमता जाऊन निर्भेळ न्यायाचे, स्वातंत्र्याचे, समतेचे आणि बंधुतेचे म्हणजे मैत्रीचे वातावरण तयार होणार नाही. ही बेरीज, समतोल होण्यासाठी गुणांचे मूल्य बदलत राहावे लागेल. काळाच्या गरजेनुसार गुणांचे मूल्य बदलेल असेही विचार त्यांनी मनोगतातून समोर आणले. 

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटLokmat Eventलोकमत इव्हेंटSumitra Bhaveसुमित्रा भावेVijay Dardaविजय दर्डाWomenमहिला