शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Lokmat Impact : पीएम सूर्यघर योजना तगणार; वीज नियामक आयोगाचा घरगुती ग्राहकांना दिलासा

By नितीन चौधरी | Updated: March 30, 2025 18:21 IST

- ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, महावितरणला यानिमित्ताने जोरदार दणका दिला

पुणे : केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेला घरघर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरणला राज्य वीज नियामक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. केवळ सकाळी सौर वीज वापरल्यासच अतिरिक्त तयार झालेली वीज परतावा गृहीत धरला जाईल, हा महावितरणचा प्रस्ताव आयोगाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे सौर वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ग्राहकांना टीओडी मीटर पद्धत लागू राहणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. ‘लोकमतने या विषयाचा पाठपुरावा केला होता.

पंतप्रधान सूर्यघर योजनेत सौर यंत्रणा बसवलेल्या ग्राहकांच्या घरात दिवसभर तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये द्यावी लागते. ग्राहकाने दिवसरात्र वापरलेली वीज सौर यंत्रणेतून तयार केलेल्या युनिटमधून वजा करून उर्वरित युनिटचे पैसे भरावे लागतात. तयार केलेली वीज वापरलेल्या विजेपेक्षा जास्त असल्यास तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतात. आर्थिक वर्ष संपेपर्यंत या शिल्लक युनिटचा वापर ग्राहक करू शकतो. वर्षअखेर अतिरिक्त युनिटच्या बदल्यात महावितरण ग्राहकाला पैसे देते. ही यंत्रणा सुरळीत राबविण्यासाठी नेटमीटर बसविण्यात येतात. आजवर घरगुती ग्राहकांना देण्यात आलेले हे नेटमीटर स्मार्ट मीटर नव्हते. महावितरणकडून या सर्व ग्राहकांना स्मार्ट नेटमीटर अर्थात टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर बसविण्यात येणार आहेत. हीच मेख महावितरणने मारली होती. परिणामी ग्राहकांना मोठा फटका बसणार होता.

महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिलेल्या प्रस्तावात रुफटाॅप रेग्युलेशन्स २०१९ नुसार टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा अर्थात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या काळात सौर यंत्रणेतून तयार झालेल्या विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात (ऑफ पीक) तयार झालेली वीज म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही असे नमूद केले होते. त्यामुळे योजनेच्या आधीच्या नियमानुसार त्या युनिटची भरपाई (दिवसभरात एकूण वापरलेल्या युनिटमधून वजाबाकी) होणार नाही. मुळातच सौर यंत्रणेमधून वीज दिवसाच तयार होते. तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत असतो. त्यामुळे त्याला आता या टीओडी मीटरमुळे भरपाई मिळणार नव्हती. आपल्या व्यवसाय धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच महावितरणकडून टीओडी मीटरच्या माध्यमातून या योजनेच्या मुळावर घाला घालण्याचे काम होणार होते.

याबाबत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मोहीम राबवत महावितरणचा हा डाव हाणून पाडण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज दरवाढ प्रस्तावावर आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सुनावणींमध्ये हरकती नोंदविल्या. ‘लोकमत’नेही या वृत्ताला सविस्तर प्रसिद्धी देत हा प्रश्न लावून धरला होता. घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर किंवा स्मार्ट नेटमीटर लावले तरी टीओडी मीटरप्रमाणे बिल लावू नये व सध्याचीच पद्धत चालू ठेवावी, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वीज नियामक आयोगाने शुक्रवारी (दि. २८) घोषित केलेल्या पंचवार्षिक वीज दरवाढ प्रस्तावात घरगुती सोलर ग्राहकांना टीओडी पद्धत लागू होणार नाही व त्यांच्यासाठी आजवरची पद्धतच लागू राहील, अशी स्पष्ट तरतूद केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, महावितरणला यानिमित्ताने जोरदार दणका दिला आहे.

वीज नियामक आयोगाने महावितरणचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे ही योजना आता तग धरू शकेल. अन्यथा केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला नख लागले असते. या निर्णयाबाबत आयोगाचे मनापासून आभार  - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकार