शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

लोकमान्यांनीच आधुनिक भारताचे समर्थपणे नेतृत्व केले : डॉ. सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:11 IST

पुणे : गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी लोकमान्यांनी देशाचे राजकीय नेतृत्व केले. जे-जे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात होते, त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी ...

पुणे : गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी लोकमान्यांनी देशाचे राजकीय नेतृत्व केले. जे-जे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात होते, त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. देशात असा एकही प्रांत नव्हता जिथे लोकमान्यांचे अनुयायी नव्हते. लोकमान्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वगुणामुळे देशातील, समाजातील एक एक घटक त्यांच्या पाठीशी उभा राहत गेला. निष्काम कर्मयोगामुळे लोकमान्यांची कीर्ती देशभरात पोहोचली आणि आपोआपच लोकमान्य देशाचे नेते बनले. त्यांनीच आधुनिक भारताचे समर्थपणे नेतृत्व केले, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४६ व्या ज्ञानसत्राचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाने झाले. ‘लोकमान्यांचा निष्काम नेतृत्वयोग' या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. प्रथमच कोरोना संकटामुळे हे ज्ञानसत्र ऑनलाइन होत आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते. या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, वसंत व्याखानमालेचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, खजिनदार रामचंद्र जोशी, सचिव डॉ. मंदार बेडेकर आदी ऑनलाइन उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, लोकमान्य टिळकांचे नेतृत्व हे जात, धर्म, समूहापुरते मर्यादित नव्हते. सत्तेची लालसा मनात न बाळगता निष्काम कर्मयोगाचे उदिष्ट्ये घेऊन ते सर्वसामान्यांत मिसळत गेले. त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. लोकमान्यांनी देश स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया घातला. सभा आणि दौऱ्यातून लोकजागृती केली. गणेशोत्सव, शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणले. दुष्काळात लोकमान्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. म्हणून ते खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाचे पहिले नेते ठरले. डॉ. मंदार बेडेकर यांनी प्रास्ताविक केले.