शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्यांनीच आधुनिक भारताचे समर्थपणे नेतृत्व केले : डॉ. सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:11 IST

पुणे : गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी लोकमान्यांनी देशाचे राजकीय नेतृत्व केले. जे-जे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात होते, त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी ...

पुणे : गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी लोकमान्यांनी देशाचे राजकीय नेतृत्व केले. जे-जे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात होते, त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. देशात असा एकही प्रांत नव्हता जिथे लोकमान्यांचे अनुयायी नव्हते. लोकमान्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वगुणामुळे देशातील, समाजातील एक एक घटक त्यांच्या पाठीशी उभा राहत गेला. निष्काम कर्मयोगामुळे लोकमान्यांची कीर्ती देशभरात पोहोचली आणि आपोआपच लोकमान्य देशाचे नेते बनले. त्यांनीच आधुनिक भारताचे समर्थपणे नेतृत्व केले, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४६ व्या ज्ञानसत्राचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाने झाले. ‘लोकमान्यांचा निष्काम नेतृत्वयोग' या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. प्रथमच कोरोना संकटामुळे हे ज्ञानसत्र ऑनलाइन होत आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते. या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, वसंत व्याखानमालेचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, खजिनदार रामचंद्र जोशी, सचिव डॉ. मंदार बेडेकर आदी ऑनलाइन उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, लोकमान्य टिळकांचे नेतृत्व हे जात, धर्म, समूहापुरते मर्यादित नव्हते. सत्तेची लालसा मनात न बाळगता निष्काम कर्मयोगाचे उदिष्ट्ये घेऊन ते सर्वसामान्यांत मिसळत गेले. त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. लोकमान्यांनी देश स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया घातला. सभा आणि दौऱ्यातून लोकजागृती केली. गणेशोत्सव, शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणले. दुष्काळात लोकमान्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. म्हणून ते खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाचे पहिले नेते ठरले. डॉ. मंदार बेडेकर यांनी प्रास्ताविक केले.