शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

लॉकडाऊन निरुपयोगीच, रात्रीचे निर्बंधही बिनकामाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांना कोरोनावरील लस सरसकट दिली जावी,” अशी मागणी राज्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांना कोरोनावरील लस सरसकट दिली जावी,” अशी मागणी राज्याचे कोरोना साथ विषयक सल्लागार डॉ. सुभाष साळूंके यांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्याबरोबरच रात्रीच्या लॉकडाऊनचाही काहीही फायदा होत नाही, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.

“लोकांनी निर्बंध न पाळल्यामुळे कोरोना पसरत आहे. मास्क घालणे, सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे या निर्बंधांची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण आढळल्याच्या प्रसंगाला मंगळवारी (दि. ९) एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. साळुंखे ‘लोकमत’शी बोलत होते.

कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धतीत काही बदल झालेला नाही, असे निरिक्षण डॉ. साळुंखे यांनी नोंदवले. ते म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांमुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळे शाळा-महाविद्यालये आणखी जास्त काळ बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही पण लोकांनी नियम पाळले तरच परिस्थीती बदलेल, आता ‘कोरोना’सह जगण्याची सवय करायला पाहिजे. डॉ. साळुंखे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -

चौकट

वाढत्या रुग्णसंख्येविषयी

-दीड ते दोन महिन्यांपूर्वी लोकांनी कोरोना गेला अशी समजूत करून घेतली आणि तसे वागायला सुरुवात केली. अर्थात हे आर्थिक कारणांसाठी असले तरीही नियम पाळले गेले नाहीत. निवडणुका झाल्या, शाळा-महाविद्यालये सुरू झाली पण कोरोना विषाणू गेलेला नव्हता.

-सुरुवातीला वाटत होते की हे म्युटेशन आहे का? पण तसे काही गंभीर म्युटेशन नसल्याचे स्पष्ट झालं. आत्ताचा जो स्ट्रेन आहे ते २८ हजारावे म्यूटेशन आहे. पण व्हायरसची तीव्रता आणि प्रसार होण्याची क्षमता ही बदललेली नाहीये हे लक्षात आले. अर्थात सध्या लोक घरात देखील विलगीकरण नीट करत नाहीत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब ‘पॉझिटिव्ह’ होत आहे.

चौकट

चाचण्या वाढवा

सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा खासगी डॉक्टरांकडून लोकांना ट्रॅक करून चाचण्या वाढवणे गरजेचे आहे. आता पूर्ण लॉकडाऊनला कोणाचीच सहमती असणार नाही. पण लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शक्य असेल तर लग्नकार्ये पुढे ढकला. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा विचार काही महिने तरी करू नका. जिथे लोक एकत्र येतात त्यावर निर्बंध असले पाहिजेत. रात्रीच्या संचारबंदीचा फार फायदा होणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले तसे कोविडचा एंडगेम नाही, तो पँन्डेमिक न राहता एन्डेमिक म्हणून राहील.

चौकट

प्रत्येकाला टोचा लस

लसीकरण झाले म्हणजे निश्चित व्हाल असे नाही तर त्यानंतरही नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या देशात ३० कोटी लोकांचे लसीकरण करावेच लागेल तरच त्याचा फायदा होईल. लसीकरणासोबतच कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून केंद्रीय आरोग्य संचालकांकडे मी आग्रह करतो आहे की आता सगळ्यांनाच लसीकरणाची परवानगी देणे आवश्यक आहे. आपल्याकडे वय वर्षे १८ च्या आत लसीकरणाची परवानगी नाही. पण त्यावरील सर्वांचे लसीकरण येत्या महिनाभरात होणे गरजेचे आहे.