शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन निरुपयोगीच, रात्रीचे निर्बंधही बिनकामाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांना कोरोनावरील लस सरसकट दिली जावी,” अशी मागणी राज्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांना कोरोनावरील लस सरसकट दिली जावी,” अशी मागणी राज्याचे कोरोना साथ विषयक सल्लागार डॉ. सुभाष साळूंके यांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्याबरोबरच रात्रीच्या लॉकडाऊनचाही काहीही फायदा होत नाही, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.

“लोकांनी निर्बंध न पाळल्यामुळे कोरोना पसरत आहे. मास्क घालणे, सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे या निर्बंधांची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण आढळल्याच्या प्रसंगाला मंगळवारी (दि. ९) एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. साळुंखे ‘लोकमत’शी बोलत होते.

कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धतीत काही बदल झालेला नाही, असे निरिक्षण डॉ. साळुंखे यांनी नोंदवले. ते म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांमुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळे शाळा-महाविद्यालये आणखी जास्त काळ बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही पण लोकांनी नियम पाळले तरच परिस्थीती बदलेल, आता ‘कोरोना’सह जगण्याची सवय करायला पाहिजे. डॉ. साळुंखे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -

चौकट

वाढत्या रुग्णसंख्येविषयी

-दीड ते दोन महिन्यांपूर्वी लोकांनी कोरोना गेला अशी समजूत करून घेतली आणि तसे वागायला सुरुवात केली. अर्थात हे आर्थिक कारणांसाठी असले तरीही नियम पाळले गेले नाहीत. निवडणुका झाल्या, शाळा-महाविद्यालये सुरू झाली पण कोरोना विषाणू गेलेला नव्हता.

-सुरुवातीला वाटत होते की हे म्युटेशन आहे का? पण तसे काही गंभीर म्युटेशन नसल्याचे स्पष्ट झालं. आत्ताचा जो स्ट्रेन आहे ते २८ हजारावे म्यूटेशन आहे. पण व्हायरसची तीव्रता आणि प्रसार होण्याची क्षमता ही बदललेली नाहीये हे लक्षात आले. अर्थात सध्या लोक घरात देखील विलगीकरण नीट करत नाहीत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब ‘पॉझिटिव्ह’ होत आहे.

चौकट

चाचण्या वाढवा

सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा खासगी डॉक्टरांकडून लोकांना ट्रॅक करून चाचण्या वाढवणे गरजेचे आहे. आता पूर्ण लॉकडाऊनला कोणाचीच सहमती असणार नाही. पण लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शक्य असेल तर लग्नकार्ये पुढे ढकला. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा विचार काही महिने तरी करू नका. जिथे लोक एकत्र येतात त्यावर निर्बंध असले पाहिजेत. रात्रीच्या संचारबंदीचा फार फायदा होणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले तसे कोविडचा एंडगेम नाही, तो पँन्डेमिक न राहता एन्डेमिक म्हणून राहील.

चौकट

प्रत्येकाला टोचा लस

लसीकरण झाले म्हणजे निश्चित व्हाल असे नाही तर त्यानंतरही नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या देशात ३० कोटी लोकांचे लसीकरण करावेच लागेल तरच त्याचा फायदा होईल. लसीकरणासोबतच कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून केंद्रीय आरोग्य संचालकांकडे मी आग्रह करतो आहे की आता सगळ्यांनाच लसीकरणाची परवानगी देणे आवश्यक आहे. आपल्याकडे वय वर्षे १८ च्या आत लसीकरणाची परवानगी नाही. पण त्यावरील सर्वांचे लसीकरण येत्या महिनाभरात होणे गरजेचे आहे.