शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

समस्यांवर वेड्यांचा जिवंत देखावा

By admin | Updated: September 24, 2015 02:52 IST

दौंड रेल्वे कुरकुंभ मोरीजवळील झुंज मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकीतून शहरातील समस्यांवर प्रकाश टाकणारा आणि विकासकामांचा बोजवारा उडालेल्या परिस्थितीतून

दौंड : दौंड रेल्वे कुरकुंभ मोरीजवळील झुंज मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकीतून शहरातील समस्यांवर प्रकाश टाकणारा आणि विकासकामांचा बोजवारा उडालेल्या परिस्थितीतून काल्पनिक मनोरुग्णालय उभारून या रुग्णालयात काल्पनिक वेड्यांचा जिवंत देखावा सादर केला आहे. सुमारे १५ स्थानिक कलावंतांनी या देखाव्यांतून दौंड शहरातील समस्या मांडल्या आहेत. दरम्यान, हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शहरातील रखडलेल्या रेल्वे कुरकुंभ मोरीतून दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा सामना करूनच या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी भाविकांना जावे लागत असल्याने, या काल्पनिक मनोरुग्णालयातील देखाव्याची वस्तुस्थिती भाविकांच्या नजरेस येत आहे. परिणामी तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या झुंज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा सर्वसामान्य नागरिकांतून गौरव केला जात आहे. या मनोरुग्णात एकूण १६ वॉर्ड दाखविण्यात आले आहेत, तर रुग्णालयाच्या बाहेर लोकोशेड हनुमान सेवा प्रतिष्ठानची रुग्णवाहिका उभी केली आहे. दौंडमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज कधी होणार? आयटीआय आणि क्रीडा संकुल कधी होणार?, कुरकुंभ मोरीतील गटारीच्या घाण पाण्याची समस्या केव्हा संपणार आणि तिसऱ्या मोरीचे काम कधी सुरू होणार?, ज्येष्ठ नागरिकांच्या उद्यानाचे काय?, रेल्वे क्वॉटर्स, पोलीस वसाहतीची दुरवस्था, दौंड-पुणे लोकल केव्हा सुरू होणार?, पुरुष आणि महिलांसाठी जागोजागी स्वच्छतागृह कधी होणार?, शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि रस्त्याला फुटपाथ, पथदिवे केव्हा बसविणार?, रस्त्यांची दुरवस्था आणि त्यातून होणारे अपघात?, सुशिक्षित, बेरोजगार मुलांचा रोजगारीचा प्रश्न? स्त्रीभ्रूणहत्या यासह अन्य काही समस्यांनी काल्पनिक वेडे झालेले युवक वरील सर्व समस्या घेऊन या रुग्णालयात दाखल झालेले आहेत. या रुग्णालयात ज्या वेळेस भाविक येतात, त्या वेळेस प्रत्येक समस्येची परिस्थिती आणि वेडा रुग्ण यांची सांगड जोडली गेलेली आहे. या देखाव्याची संकल्पना अजय कांबळे यांची असून ,मंडळाचे अध्यक्ष राजेश मंथने, उपाध्यक्ष भीमराव त्रिभुवन आहेत. या रुग्णालयातील जिवंत देखाव्यात महेंद्र राजगुरू, नीलेश रंधवे, सागर त्रिभुवन, गौतम त्रिभुवन, ऋषिकेश चिकाटे, सिद्धांत कांबळे, व्यंकटेश बालन, अमोल आरेणकर, प्रदीप कांबळे, उमेश पाळ, सोनू त्रिभुवन, विठ्ठल पोळ, चेतन आहेर, बबलू पोळ, सागर गरड हे तरुण सहभागी झाले आहेत. याकामी झुंज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)