शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

उलगडले मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 00:34 IST

मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.

पुणे : मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या व्यक्तीला आजारातून सावरताना करावा लागणारा त्याग, नातेसंबंध, घराचे घरपण टिकविण्याची कसरत, समाजाचा दृष्टिकोन यांसह विविध आव्हाने पेलताना आलेल्या अनुभवांतून मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य उलगडत गेले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त त्रिमिती ट्रस्टच्या वतीने ‘काळजी घेण्याचे विविध पैलू’ या विषयावर आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोरुग्ण व्यक्तींच्या नातेवाइकांनी म्हणजे काळजीवाहकांनी (केअरगिव्हर्स) त्यांचे अनुभव कथन केले. या संवादात ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे, मानसतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे सहभागी झाले होते.मानसतज्ज्ञ डॉ. संजोत देशपांडे यांनी सर्वांशी संवाद साधला. या कार्यक्रमापूर्वी ‘मळभ’ ही एकांकिका सादर करण्यात आली. यामध्ये मनोरुग्ण व त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाइकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला.संवादामध्ये सुभाष चतुर यांनी त्यांचा मुलगा अजयला सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. तसेच, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना समाजाकडून मिळणाºया दुजाभावावरही नाराजी व्यक्त केली. डॉ. कांचन खरे यांनी मानसिक आजार असलेल्या पतीला सांभाळण्या बरोबरच मुलाला चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी केलेल्या कसरतीचे अनुभव सांगितले. त्यांच्या अनुभवांवर बोलताना डॉ. वाटवे म्हणाले की, काळजीवाहकांना अशा परिस्थितीत स्वत: मानसिक आरोग्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. ही तारेवरची कसरत करताना स्वत:साठी वेळ द्यायला हवा.मानसिक रुग्णांचा सांभाळ करताना अनेकवेळा नातेवाइकांना नैराश्य येते. पण त्यातून पुन्हा उभे राहता येते, असे डॉ. लुकतुके यांनी नमूद केले.संवेदनक्षम असणे महत्त्वाचेमानसिक आजारांच्याबाबत बुद्धीने सगळे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी संवेदनक्षम असायला हवे. कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात एकमेकांची काळजी घेणे आवश्यक असते; अन्यथा घरात रुग्ण असताना नैराश्य येते. खरे शहाणपण आपले वेडेपण लपविण्यात आहे. कुटुंब रक्ताच्या नव्हे मनाच्या नात्याने ठरायला हवे. नाती जपणे, त्यासाठी दोन पावले मागे जाणे, एकमेकांच्या जीवनाचा भाग बनविणे महत्त्वाचे आहे.- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणे