शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

उलगडले मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 00:34 IST

मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.

पुणे : मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या व्यक्तीला आजारातून सावरताना करावा लागणारा त्याग, नातेसंबंध, घराचे घरपण टिकविण्याची कसरत, समाजाचा दृष्टिकोन यांसह विविध आव्हाने पेलताना आलेल्या अनुभवांतून मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य उलगडत गेले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त त्रिमिती ट्रस्टच्या वतीने ‘काळजी घेण्याचे विविध पैलू’ या विषयावर आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोरुग्ण व्यक्तींच्या नातेवाइकांनी म्हणजे काळजीवाहकांनी (केअरगिव्हर्स) त्यांचे अनुभव कथन केले. या संवादात ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे, मानसतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे सहभागी झाले होते.मानसतज्ज्ञ डॉ. संजोत देशपांडे यांनी सर्वांशी संवाद साधला. या कार्यक्रमापूर्वी ‘मळभ’ ही एकांकिका सादर करण्यात आली. यामध्ये मनोरुग्ण व त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाइकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला.संवादामध्ये सुभाष चतुर यांनी त्यांचा मुलगा अजयला सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. तसेच, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना समाजाकडून मिळणाºया दुजाभावावरही नाराजी व्यक्त केली. डॉ. कांचन खरे यांनी मानसिक आजार असलेल्या पतीला सांभाळण्या बरोबरच मुलाला चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी केलेल्या कसरतीचे अनुभव सांगितले. त्यांच्या अनुभवांवर बोलताना डॉ. वाटवे म्हणाले की, काळजीवाहकांना अशा परिस्थितीत स्वत: मानसिक आरोग्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. ही तारेवरची कसरत करताना स्वत:साठी वेळ द्यायला हवा.मानसिक रुग्णांचा सांभाळ करताना अनेकवेळा नातेवाइकांना नैराश्य येते. पण त्यातून पुन्हा उभे राहता येते, असे डॉ. लुकतुके यांनी नमूद केले.संवेदनक्षम असणे महत्त्वाचेमानसिक आजारांच्याबाबत बुद्धीने सगळे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी संवेदनक्षम असायला हवे. कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात एकमेकांची काळजी घेणे आवश्यक असते; अन्यथा घरात रुग्ण असताना नैराश्य येते. खरे शहाणपण आपले वेडेपण लपविण्यात आहे. कुटुंब रक्ताच्या नव्हे मनाच्या नात्याने ठरायला हवे. नाती जपणे, त्यासाठी दोन पावले मागे जाणे, एकमेकांच्या जीवनाचा भाग बनविणे महत्त्वाचे आहे.- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणे