शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

उलगडले मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 00:34 IST

मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.

पुणे : मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या व्यक्तीला आजारातून सावरताना करावा लागणारा त्याग, नातेसंबंध, घराचे घरपण टिकविण्याची कसरत, समाजाचा दृष्टिकोन यांसह विविध आव्हाने पेलताना आलेल्या अनुभवांतून मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य उलगडत गेले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त त्रिमिती ट्रस्टच्या वतीने ‘काळजी घेण्याचे विविध पैलू’ या विषयावर आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोरुग्ण व्यक्तींच्या नातेवाइकांनी म्हणजे काळजीवाहकांनी (केअरगिव्हर्स) त्यांचे अनुभव कथन केले. या संवादात ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे, मानसतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे सहभागी झाले होते.मानसतज्ज्ञ डॉ. संजोत देशपांडे यांनी सर्वांशी संवाद साधला. या कार्यक्रमापूर्वी ‘मळभ’ ही एकांकिका सादर करण्यात आली. यामध्ये मनोरुग्ण व त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाइकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला.संवादामध्ये सुभाष चतुर यांनी त्यांचा मुलगा अजयला सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. तसेच, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना समाजाकडून मिळणाºया दुजाभावावरही नाराजी व्यक्त केली. डॉ. कांचन खरे यांनी मानसिक आजार असलेल्या पतीला सांभाळण्या बरोबरच मुलाला चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी केलेल्या कसरतीचे अनुभव सांगितले. त्यांच्या अनुभवांवर बोलताना डॉ. वाटवे म्हणाले की, काळजीवाहकांना अशा परिस्थितीत स्वत: मानसिक आरोग्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. ही तारेवरची कसरत करताना स्वत:साठी वेळ द्यायला हवा.मानसिक रुग्णांचा सांभाळ करताना अनेकवेळा नातेवाइकांना नैराश्य येते. पण त्यातून पुन्हा उभे राहता येते, असे डॉ. लुकतुके यांनी नमूद केले.संवेदनक्षम असणे महत्त्वाचेमानसिक आजारांच्याबाबत बुद्धीने सगळे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी संवेदनक्षम असायला हवे. कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात एकमेकांची काळजी घेणे आवश्यक असते; अन्यथा घरात रुग्ण असताना नैराश्य येते. खरे शहाणपण आपले वेडेपण लपविण्यात आहे. कुटुंब रक्ताच्या नव्हे मनाच्या नात्याने ठरायला हवे. नाती जपणे, त्यासाठी दोन पावले मागे जाणे, एकमेकांच्या जीवनाचा भाग बनविणे महत्त्वाचे आहे.- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणे