शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

उलगडले मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 00:34 IST

मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.

पुणे : मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या व्यक्तीला आजारातून सावरताना करावा लागणारा त्याग, नातेसंबंध, घराचे घरपण टिकविण्याची कसरत, समाजाचा दृष्टिकोन यांसह विविध आव्हाने पेलताना आलेल्या अनुभवांतून मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य उलगडत गेले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त त्रिमिती ट्रस्टच्या वतीने ‘काळजी घेण्याचे विविध पैलू’ या विषयावर आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोरुग्ण व्यक्तींच्या नातेवाइकांनी म्हणजे काळजीवाहकांनी (केअरगिव्हर्स) त्यांचे अनुभव कथन केले. या संवादात ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे, मानसतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे सहभागी झाले होते.मानसतज्ज्ञ डॉ. संजोत देशपांडे यांनी सर्वांशी संवाद साधला. या कार्यक्रमापूर्वी ‘मळभ’ ही एकांकिका सादर करण्यात आली. यामध्ये मनोरुग्ण व त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाइकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला.संवादामध्ये सुभाष चतुर यांनी त्यांचा मुलगा अजयला सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. तसेच, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना समाजाकडून मिळणाºया दुजाभावावरही नाराजी व्यक्त केली. डॉ. कांचन खरे यांनी मानसिक आजार असलेल्या पतीला सांभाळण्या बरोबरच मुलाला चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी केलेल्या कसरतीचे अनुभव सांगितले. त्यांच्या अनुभवांवर बोलताना डॉ. वाटवे म्हणाले की, काळजीवाहकांना अशा परिस्थितीत स्वत: मानसिक आरोग्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. ही तारेवरची कसरत करताना स्वत:साठी वेळ द्यायला हवा.मानसिक रुग्णांचा सांभाळ करताना अनेकवेळा नातेवाइकांना नैराश्य येते. पण त्यातून पुन्हा उभे राहता येते, असे डॉ. लुकतुके यांनी नमूद केले.संवेदनक्षम असणे महत्त्वाचेमानसिक आजारांच्याबाबत बुद्धीने सगळे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी संवेदनक्षम असायला हवे. कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात एकमेकांची काळजी घेणे आवश्यक असते; अन्यथा घरात रुग्ण असताना नैराश्य येते. खरे शहाणपण आपले वेडेपण लपविण्यात आहे. कुटुंब रक्ताच्या नव्हे मनाच्या नात्याने ठरायला हवे. नाती जपणे, त्यासाठी दोन पावले मागे जाणे, एकमेकांच्या जीवनाचा भाग बनविणे महत्त्वाचे आहे.- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणे