शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह-इन रिलेशन महिलांसाठी घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:10 IST

(लेखिका सामाजिक विषयाच्या प्राध्यापक आहेत) अलीकडे लिव्ह इन रिलेशन विषयावर जरा जास्तच भर दिला जातोय आणि लेखांमधून त्याचा प्रसार ...

(लेखिका सामाजिक विषयाच्या प्राध्यापक आहेत)

अलीकडे लिव्ह इन रिलेशन विषयावर जरा जास्तच भर दिला जातोय आणि लेखांमधून त्याचा प्रसार केला जातोय की काय? अशी परिस्थिती आहे. पण या नात्याविषयी अनेक प्रश्न उभे राहतात. या नात्यात आपण काय? आलो, याविषयी बहुतेक सगळ्यांनी लग्नाचा अनुभव चांगला नाही, असे कारण सांगितले. आता कोणतीही दोन माणसं चोवीस तास एकत्र आली की त्यांचे गुण अवगुण एकमेकांना सहन करणचं भाग असतं. मग फरक काय?

घटस्फोट न घेता एकमेकांबरोबर राहणारे ही आहेत. हे कसलं नातं. दुसऱ्या स्त्री वर किंवा पुरुषावर अन्याय करणारे हे कसलं नातं. या नात्यात फसलेल्या व्यक्तीही आहेत. परंतु ती उदाहरणे डावलून केवळ चांगली उदाहरणे दिली जातात. या नात्यातल्या व्यक्तींचा तरी एकमेकांवर विश्वास आहे का, की परस्परांवर संशय आणि नात्यात असुरक्षितता वाटते. काय? असतं लग्नाची बायको म्हटली की हक्काने विचारू शकते. हिला तेही अधिकार नाहीत. उद्या बरोबर राहणाऱ्याने फसवले, दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले तर ही दादही मागू शकणार नाही. अशा नात्यात फसून अक्षरशः रस्त्यावर आलेल्या स्त्रिया आहेत. त्यांना केवळ पेन्शन मिळत असल्याने त्यांची आयुष्य सावरली गेलीत. त्यांचा मोठा विश्वासघात झाला. त्याचं काय? एका विशिष्ट वर्गात या नात्याचं काही वाटत नाही परंतु बाकी वेळी आपलं नाव या व्यक्ती प्रसिद्ध करू देत नाहीत. या नात्यात काही वर्षे राहून नंतर दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करतात. यात स्त्रीचं आयुष्य अधांतरी होतं

कुणी कुणाच्या पैशात वाटा मागू नये किंवा हक्क सांगू नये यासाठी हा आटापिटा. काही नात्यात तर पुरुषाची आर्थिक परिस्थिती बिकट म्हणून पैशासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असलेल्या स्त्रीशी नातं जोडलयं.

या नात्यात सहचर पाहिजे म्हणून वर्तमानपत्रात जाहिराती येतात. तेव्हा त्यात आर्थिक व्यवहार वेगळे ठेवले जातील, असे स्पष्ट लिहिले जाते. पण एखाद्याला अचानक मोठं आजारपण निघालं तर काय? आणि असं करणं म्हणजे स्त्रीचा वापर करणं नाही काय? बरं कुटुंबातल्या इतर व्यक्ती हे नातं स्वीकारतीलच असं नाही विशेषतः पुरुषांकडून म्हणजे बाईची फरपट. त्यातच पुरुषाचे अकाली निधन झाले तर पुन्हा ती एकटी पडते. कारण कायदा तिला कुठलेच अधिकार देत नाही.