शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा टिकल्या तरच साहित्य टिकेल : डॉ. अनिल अवचट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 14:31 IST

आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती केविलवाणी झालेली आहे.

ठळक मुद्दे आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे संमेलनाध्यक्षांचे महासंमेलन

पुणे : आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती केविलवाणी झालेली आहे. मराठी शाळा कशा टिकवायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी शाळा जगल्या तरच भविष्यातील वाचक निर्माण होईल. वाचकच नसेल तर मराठी साहित्यही लिहिले होणार नाही. आताच पुस्तकांचा खप कमी होतो आहे, अशी पुस्तक विक्रेत्यांची तक्रार आहे. मराठी भाषेला चांगले दिवस दाखवून अत्रेचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान आणि विनोद विद्यापीठातर्फे आचार्य अत्रे स्मृती अर्ध शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संमेलन अध्यक्षांचे महासंमेलनात अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अनिल अवचट, मराठवाडा विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील प्रतिमा परदेशी, विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद लुलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.बाबुराव कानडे म्हणाले, ‘सरकारवर नियंत्रण ठेवणारी शक्ती नसल्याने आता अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाहीये. बोलके साहित्यिक खूप असतात, अत्रे कर्ते होते. बोलते आणि कर्ते साहित्यिक एकत्र आल्याशिवाय अभिजात दर्जा मिळणार नाही.’कांबळे म्हणाले, ‘सामाजिक बहिष्कृततेचे जीणे हा सामाजिक द्वेष. दलित, पददलितांनी हा द्वेष हजारो वर्षे सहन केला. संत ज्ञानेश्वरही यातून सुटले नाहीत. त्यांनी घेतलेली संजीवन समाधी ही मी आत्महत्याच मानतो. सामाजिक दाहकतेचे विष त्यांना प्यावे लागले. त्यांनी ही खंत व्यक्त केली असती, बहिष्काराबाबत एखादे वाक्य लिहिले असते तरी मराठी वाड्मयाचे रुपडे पालटले असते. अत्रेंच्या काळातील लोक विवेकी होते. आजची मराठी मानसिकता ही खुरट्या झुडुपासारखी आहे.’लुलेकर म्हणाले, ‘गांधीजी गेल्यानंतरही त्यांच्या प्रतिमेला गोळ्या घातल्या जातात, ही विकृती आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आपल्याला सावध रहायला हवे. आता प्रत्येक जातीचे अहंकार जागे झाले आहेत. त्यामुळे काहीच बोलण्याची सोय राहिलेली नाही. पूर्वी वैचारिक लेखनाने राजकीय, सामाजिक नेतृत्व केले. आज वैचारिक लेखनच मराठी साहित्यात होत नाही. नव्याने इतिहास घडल्याशिवाय सांस्कृतिक परिवर्तन घडणार नाही.’प्रतिमा परदेशी म्हणाल्या, ‘मराठी साहित्यात कायमच दुजाभाव होत आला आहे. साहित्य संस्थांमध्ये सारस्वतांचे राजकारण घडत आहे. सर्जनशील साहित्याची निर्मिती हा पहिला प्रवाह, तर शिक्षण मिळू न शकलेल्या स्त्रिया, बहुजन समाज यांनी लिहिलेले साहित्य हा दुसरा प्रवाह आहे. अत्रेंची विचारांवर, ध्येयावर निष्ठा होती. अत्रेंच्या पद्धतीने आज विचार केला तर नक्की बदल घडेल.’ 

टॅग्स :PuneपुणेAnil Avchatअनिल अवचटmarathiमराठी