शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

मराठी शाळा टिकल्या तरच साहित्य टिकेल : डॉ. अनिल अवचट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 14:31 IST

आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती केविलवाणी झालेली आहे.

ठळक मुद्दे आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे संमेलनाध्यक्षांचे महासंमेलन

पुणे : आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती केविलवाणी झालेली आहे. मराठी शाळा कशा टिकवायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी शाळा जगल्या तरच भविष्यातील वाचक निर्माण होईल. वाचकच नसेल तर मराठी साहित्यही लिहिले होणार नाही. आताच पुस्तकांचा खप कमी होतो आहे, अशी पुस्तक विक्रेत्यांची तक्रार आहे. मराठी भाषेला चांगले दिवस दाखवून अत्रेचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान आणि विनोद विद्यापीठातर्फे आचार्य अत्रे स्मृती अर्ध शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संमेलन अध्यक्षांचे महासंमेलनात अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अनिल अवचट, मराठवाडा विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील प्रतिमा परदेशी, विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद लुलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.बाबुराव कानडे म्हणाले, ‘सरकारवर नियंत्रण ठेवणारी शक्ती नसल्याने आता अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाहीये. बोलके साहित्यिक खूप असतात, अत्रे कर्ते होते. बोलते आणि कर्ते साहित्यिक एकत्र आल्याशिवाय अभिजात दर्जा मिळणार नाही.’कांबळे म्हणाले, ‘सामाजिक बहिष्कृततेचे जीणे हा सामाजिक द्वेष. दलित, पददलितांनी हा द्वेष हजारो वर्षे सहन केला. संत ज्ञानेश्वरही यातून सुटले नाहीत. त्यांनी घेतलेली संजीवन समाधी ही मी आत्महत्याच मानतो. सामाजिक दाहकतेचे विष त्यांना प्यावे लागले. त्यांनी ही खंत व्यक्त केली असती, बहिष्काराबाबत एखादे वाक्य लिहिले असते तरी मराठी वाड्मयाचे रुपडे पालटले असते. अत्रेंच्या काळातील लोक विवेकी होते. आजची मराठी मानसिकता ही खुरट्या झुडुपासारखी आहे.’लुलेकर म्हणाले, ‘गांधीजी गेल्यानंतरही त्यांच्या प्रतिमेला गोळ्या घातल्या जातात, ही विकृती आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आपल्याला सावध रहायला हवे. आता प्रत्येक जातीचे अहंकार जागे झाले आहेत. त्यामुळे काहीच बोलण्याची सोय राहिलेली नाही. पूर्वी वैचारिक लेखनाने राजकीय, सामाजिक नेतृत्व केले. आज वैचारिक लेखनच मराठी साहित्यात होत नाही. नव्याने इतिहास घडल्याशिवाय सांस्कृतिक परिवर्तन घडणार नाही.’प्रतिमा परदेशी म्हणाल्या, ‘मराठी साहित्यात कायमच दुजाभाव होत आला आहे. साहित्य संस्थांमध्ये सारस्वतांचे राजकारण घडत आहे. सर्जनशील साहित्याची निर्मिती हा पहिला प्रवाह, तर शिक्षण मिळू न शकलेल्या स्त्रिया, बहुजन समाज यांनी लिहिलेले साहित्य हा दुसरा प्रवाह आहे. अत्रेंची विचारांवर, ध्येयावर निष्ठा होती. अत्रेंच्या पद्धतीने आज विचार केला तर नक्की बदल घडेल.’ 

टॅग्स :PuneपुणेAnil Avchatअनिल अवचटmarathiमराठी