शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
3
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
4
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
5
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
6
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
7
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
8
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
9
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
10
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
11
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
12
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
13
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
14
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
15
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
16
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
17
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
18
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
19
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
20
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी सावंत यांचे लेखन येणार ई-पुस्तकांच्या स्वरुपात; ‘कॉन्टिनेन्टल’ची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:46 IST

प्रसिद्ध दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क लवाद न्यायाधिकरणाने कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला दिले आहे.

ठळक मुद्देकॉन्टिनेन्टल प्रकाशनाने कायदेशीररित्या दिलेला लढा यशस्वी मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क पुन्हा कॅन्टिनेन्टल प्रकाशनाकडे

पुणे : प्रसिद्ध दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क लवाद न्यायाधिकरणाने कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला दिले आहे. त्यामुळे ही तीनही पुस्तके लवकरच वेगळ्या स्वरुपात वाचकांसमोर आणली जाणार आहेत. तसेच वारसदारांशी संवाद साधून शिवाजी सावंत यांचे लेखन ई-पुस्तकांच्या स्वरुपात आणण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संचालक ॠतूपर्ण कुलकर्णी व अमृता कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.साहित्यासारख्या संवेदनशील क्षेत्रात नैतिकता व कायदा बाजूला ठेवून मेहता पब्लिशिंग हाऊसने शिवाजी सावंत यांच्या तीन पुस्तकांच्या प्रकाशनाचे अधिकार मिळविण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने कायदेशीररित्या दिलेला लढा यशस्वी झाला. त्यामुळे मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क पुन्हा कॅन्टिनेन्टल प्रकाशनाकडे आले. यावर ॠतूपर्ण व अमृता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका सांगितली. या प्रसंगी उत्कर्ष प्रकाशनाचे संस्थापक संचालक सु. वा. जोशी, प्रकाशनाच्या संपादिका अंजली जोशी आदी उपस्थित होते.ॠतुपर्ण जोशी म्हणाले, लेखकाच्या मृत्यूनंतर पुढे ६० वर्ष पूर्वीच्या प्रकाशकांना पुस्तकाचे प्रकाशन करता येते. परंतु, शिवाजी सावंत यांच्या वारसदारांची दिशाभूल करून मेहता प्रकाशनाने प्रकाशनाचे हक्क स्वत: कडे घेतले. दरम्यानच्या काळात पायरेडेट पुस्तके बाजारात आली होती. मात्र, हा ऐतिहासिक ठेवा कायदेशीररित्या पुन्हा आमच्याकडे आला याचा आनंद आहे.अमृता कुलकर्णी म्हणाल्या, कॉन्टिनेन्टलने २०१२पासून या पुस्तकांच्या आवृत्या प्रकाशित केल्या नव्हत्या. पुढील वर्षी मोठा टाईप आणि दर्जेदार कागदावर वेगळ्या स्वरुपात या तीनही पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. त्याचप्रमाणे या प्रकरणातून दुसऱ्याच्या बागेतील फुले उपटून आपल्या बागेत लावून; आपली बाग सुशोभीत करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच प्रकाशनाने केला, अशी टीका प्रकाशकांकडून केली जात असल्याचेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणे