शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिवाजी सावंत यांचे लेखन येणार ई-पुस्तकांच्या स्वरुपात; ‘कॉन्टिनेन्टल’ची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:46 IST

प्रसिद्ध दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क लवाद न्यायाधिकरणाने कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला दिले आहे.

ठळक मुद्देकॉन्टिनेन्टल प्रकाशनाने कायदेशीररित्या दिलेला लढा यशस्वी मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क पुन्हा कॅन्टिनेन्टल प्रकाशनाकडे

पुणे : प्रसिद्ध दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क लवाद न्यायाधिकरणाने कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला दिले आहे. त्यामुळे ही तीनही पुस्तके लवकरच वेगळ्या स्वरुपात वाचकांसमोर आणली जाणार आहेत. तसेच वारसदारांशी संवाद साधून शिवाजी सावंत यांचे लेखन ई-पुस्तकांच्या स्वरुपात आणण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संचालक ॠतूपर्ण कुलकर्णी व अमृता कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.साहित्यासारख्या संवेदनशील क्षेत्रात नैतिकता व कायदा बाजूला ठेवून मेहता पब्लिशिंग हाऊसने शिवाजी सावंत यांच्या तीन पुस्तकांच्या प्रकाशनाचे अधिकार मिळविण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने कायदेशीररित्या दिलेला लढा यशस्वी झाला. त्यामुळे मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क पुन्हा कॅन्टिनेन्टल प्रकाशनाकडे आले. यावर ॠतूपर्ण व अमृता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका सांगितली. या प्रसंगी उत्कर्ष प्रकाशनाचे संस्थापक संचालक सु. वा. जोशी, प्रकाशनाच्या संपादिका अंजली जोशी आदी उपस्थित होते.ॠतुपर्ण जोशी म्हणाले, लेखकाच्या मृत्यूनंतर पुढे ६० वर्ष पूर्वीच्या प्रकाशकांना पुस्तकाचे प्रकाशन करता येते. परंतु, शिवाजी सावंत यांच्या वारसदारांची दिशाभूल करून मेहता प्रकाशनाने प्रकाशनाचे हक्क स्वत: कडे घेतले. दरम्यानच्या काळात पायरेडेट पुस्तके बाजारात आली होती. मात्र, हा ऐतिहासिक ठेवा कायदेशीररित्या पुन्हा आमच्याकडे आला याचा आनंद आहे.अमृता कुलकर्णी म्हणाल्या, कॉन्टिनेन्टलने २०१२पासून या पुस्तकांच्या आवृत्या प्रकाशित केल्या नव्हत्या. पुढील वर्षी मोठा टाईप आणि दर्जेदार कागदावर वेगळ्या स्वरुपात या तीनही पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. त्याचप्रमाणे या प्रकरणातून दुसऱ्याच्या बागेतील फुले उपटून आपल्या बागेत लावून; आपली बाग सुशोभीत करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच प्रकाशनाने केला, अशी टीका प्रकाशकांकडून केली जात असल्याचेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणे