शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

साहित्यिकांमध्ये भाषिक सौहार्द निर्माण व्हावा - डॉ. अशोक कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:59 IST

अनुवादाची स्थिती फारशी चांगली नाही

शाळेत असल्यापासूनच महामहोपाध्याय पोतदार, गो. प. नेने, पंढरीनाथ डांगे, मोडक असे हिंदी भाषेचा प्रचार करणारे शिक्षक लाभले. आमच्या काळात हिंदी भाषेच्या परीक्षा देऊन शालेय वयातच पंडित या पदवीपर्यंत मजल गाठता यायची. महाविद्यालयात जाण्यापूर्वीच हिंदी भाषेतील पंडित ही पदवी मला मिळाली होती. त्या वेळी मी हिंदी प्रचाराचे वर्ग घेत असे. प्रांतिक भाषेबरोबरच हिंदी भाषेतून काम केल्यास देशसेवा घडेल, हा त्यामागचा उद्देश होता. गेली ६० वर्षे मी भाषाविषयक काम करत आहे. रा. चिं. ढेरे यांच्यासह संशोधन करू लागल्यापासून त्यांचे लक्ष दक्षिणेकडे, तर माझे लक्ष उत्तरेकडील अभ्यासाकडे जास्त होते. नामदेवांच्या ध्यासामुळे; तसेच संत एकनाथ, संत रामदास अशा संतांच्या प्रवासाचा शोध घेत बृहनमहाराष्ट्र आणि उत्तर भारतात भ्रमंती करत राहिलो. मी नाथसंप्रदायाचा अभ्यासक असल्याने देशभर प्रवास करण्याची संधी मिळाली आणि मी बहुभाषिक होत गेलो.

टिळकयुगात, गांधीयुगात महाराष्ट्राबाहेर राहून काम केलेल्या पत्रकार, विचारवंतांच्या कामाचा मी अभ्यास केला. दोन्ही भाषांमध्ये पीएच.डी. करून तोच अभ्यासाचा विषय मानला. यानिमित्ताने भारतातील भाषाविषयक कार्याची व्याप्ती जाणून घेण्याची संधी मिळाली. संतांचा अभ्यास भाषिक सौहार्दावर अवलंबून असतो. ज्याला संत साहित्याचा राष्ट्रीय पातळीवर अभ्यास करायचा असेल त्याला भाषिक सौहार्द जपावेच लागते. हिंदी आणि मराठी भाषांमध्ये अनुवाद करता आले. त्यामुळेच उत्तर प्रदेश सरकारतर्फे सौहार्द सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची दोन लाख रुपयांची रक्कम मी गुरुकुल प्रतिष्ठानच्या कामासाठी खर्च करणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे साहित्यिकांना पुरस्काराची दिली जाणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असते. साहित्यिकांचा सन्मान यथायोग्य केला जावा. मराठी साहित्यातील अनुवादाची स्थिती फारशी चांगली नाही. मराठी भाषिक आपल्या शेजारील प्रांतांचाही पुरेसा अभ्यास करत नाहीत. कोणत्याही विद्यापीठात इतर भाषांचा अभ्यास नीट होत नाहीत. आपल्याजवळील गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या प्रांतातील भाषांच्या शिक्षणाची नीट सोय नाही. मराठी विभागही तौलनात्मक अभ्यासाला फारसे महत्त्व देत नाही. मराठी माणसाने अभिमान बाळगावा अशा अनेक समृद्ध गोष्टी मराठी साहित्यामध्ये आहेत; मात्र दुसऱ्या भाषेत गेल्याशिवाय इतर भाषिकांना ही समृद्धी कशी कळणार? महाराष्ट्रातील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार अत्यंत कमी प्रमाणात मिळाले याचे कारण म्हणजे, चांगल्या साहित्यिकांची प्रतिमा इतर प्रांतात उमटावी, यासाठी आपण काहीही केलेले नाही. वि. स. खांडेकर यांचे वाङ्मय अनुवादकांनी हिंदी, तमीळ आणि गुजराती भाषेमध्ये अनुवादित केले. त्या प्रांतांमध्ये आजही खांडेकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. आपण कायम आपल्या प्रांतापुरतेच मर्यादित राहिलो आहोत. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनाही अस्खलित हिंदी बोलता येत नसल्याने त्यांची प्रतिमा दिल्लीमध्ये डागाळलेली आहे. हिंदी व्यवस्थित येत नसेल तर आपण देशाचे नेतृत्व कसे करणार? नेतृत्व, सामाजिक कार्य, संशोधन करायचे असल्यास हिंदीची कास धरायला हवी; मात्र भाषावार प्रांत रचनेनंतर अत्यंत संकुचित झालो आहोत. भारतीय भाषांची समग्र ओळख असणे आवश्यक आहे. शिवाजीमहाराज, ज्ञानेश्वरमहाराज, तुकाराममहाराज यांचे कार्य हिंदी भाषेतून इतर भाषिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता आले पाहिजे. भाषिक समृद्धी वाढविण्यासाठी साहित्यिकांमधील सुसंवाद वाढला पाहिजे.

मराठी साहित्यातील अनुवादाची स्थिती फारशी चांगली नाही. कोणत्याही विद्यापीठात इतर भाषांचा अभ्यास नीट होत नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार अत्यंत कमी प्रमाणात मिळाले याचे कारण म्हणजे, चांगल्या साहित्यिकांची प्रतिमा इतर प्रांतात उमटावी, यासाठी आपण काहीही केलेले नाही. भाषिक समृद्धी वाढविण्यासाठी साहित्यिकांमधील सुसंवाद वाढला पाहिजे, असे मत उत्तर प्रदेश सरकारचा सौहार्द सन्मान जाहीर झाल्याच्या निमित्ताने डॉ. अशोक कामत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणे