शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

अंधारमय जीवनात ६० वर्षांनंतर प्रकाश; बाळू कांबळे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:24 IST

शिक्षणाची बाराखडी गिरवण्याच्या ऐन वयात त्याची दृष्टी गेली. अन् अवघं भविष्यच अंधारमय झालं. अंधकारमयच जीवनाचा शेवट होईल, अशा निराशेने ग्रासलेले असताना वयाच्या ६६ व्या वर्षी म्हणजेच ६० वर्षांनीसुद्धा त्यांना दृष्टी प्राप्त झाली.

शिरूर : शिक्षणाची बाराखडी गिरवण्याच्या ऐन वयात त्याची दृष्टी गेली. अन् अवघं भविष्यच अंधारमय झालं. अंधकारमयच जीवनाचा शेवट होईल, अशा निराशेने ग्रासलेले असताना वयाच्या ६६ व्या वर्षी म्हणजेच ६० वर्षांनीसुद्धा त्यांना दृष्टी प्राप्त झाली. येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांच्या प्रयत्नातून निमगाव म्हाळुंगे येथील बाळू नाना कांबळे या ज्येष्ठ नागरिकाच्या आयुष्यात शेवटच्या टप्प्यात पुन्हा उमेदीची ज्योत प्रज्वलित झाली.कांबळे हे ७ वर्षांचे असताना तापामुळे इन्फेक्शन होऊन त्यांचे डोळे गेले. त्यामुळे शाळेत प्रवेश घेण्याचे त्या वेळचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. आपल्याला आता दिसणार नाही, या कल्पनेने कांबळे प्रचंड निराश झाले. कुटुंबीयांनाही याचे दु:ख झाले. मात्र वास्तव कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांनी (पालकांनी) स्वीकारले व अंधारमय जीवनाचा प्रवास सुरू झाला. शेतीवर अवलंबून कांबळे कुटुंबीयांनी आपल्या अंध मुलाचा प्रामाणिक सांभाळ केला. दिवसांमागून दिवस गेले. तारुण्यांच्या उंबरठ्यावर विवाहाचा विषय आला असता मावसमामाने आपली मुलगी अंध भाच्यास दिली. कांबळेंचा विवाह तिच्याशी झाला. यामुळे कांबळेंना जगण्याची एक उमेद मिळाली. अंधत्वामुळे कांबळेंना जीवनात कामधंदा करता आला नाही. मात्र त्यांच्या पत्नीने घरातील दुधाचा धंदा सांभाळला. वेळप्रसंगी शेतात खुरपणीचे कामही केले.गुजरात येथील एका कामगाराच्या डोळ्यांत प्लॅस्टिक पडून त्यांचे दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. ‘लोकमत’च्या बातमीमुळे या व्यक्तीला माहिती मिळाल्याने त्याने शिरूर येथे डॉ. भालेकरांची भेट घेतली. त्याच्या डोळ्यांवर भालेकरांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यात त्याला पुन्हा दृष्टी आली. याबाबतची माहिती कांबळेंना त्यांच्या मित्रांनी दिली. यावर त्यांनी शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.कांबळे यांची केस अवघड होती. मात्र कांबळेंची दुर्दम्य इच्छाशक्ती व डॉ. भालेकर यांचे स्किल यामुळे ६० वर्षांनंतर कांबळे यांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण प्रज्वलित झाला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली व एका डोळ्याने (उजवा) त्यांना दिसू लागले. १९८४मध्ये त्यांचे लग्न झाले होते. ४२ वर्षांनी त्यांना आपल्या कुटुंबीयांना डोळे भरून पाहता आले.1 ज्यांनी जन्म दिला त्या आईवडिलांना कांबळे यांना लहानपणी (दृष्टी जाण्याआधी) पाहता आले. एवढेच काच ते त्यांचे भाग्य. जिच्याशी लग्न केले, तिला मात्र पाहता येत नाही याचे शल्य कांबळेंंना नेहमी असायचे.2दोन्ही मुले पुढे कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून काम करू लागली. पुढे त्या दोघांचे तसेच मुलीचेही लग्न झाले. पत्नीलाही नाही आणि मुलांनाही कांबळे यांना दृष्टिअभावी पाहता आले नाही. मुलांची विवाहकार्येही डोळे भरून पाहता आली नाहीत. तीन ते चार वेळा नेत्रतज्ज्ञांकडे डोळे तपासणी केली. मात्र यश आले नाही.

टॅग्स :Puneपुणे