शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:55 IST

पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले.

पुणे : पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिली, असे खोटे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करण्यात या मागणीसाठी शेट्टी यांनी आंदोलन केले होते. त्यांच्या या पवित्र्यानंतर उस्मानाबादच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्याच्या एफआरपी दराबाबत साखर आयुक्त संभाजी कडू पाटील व स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी साखर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देता ती दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून गाळप परवाना मिळविलेल्या कारखान्यांचे गाळप परवाने दिलेच कसे ? असा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना विचारला. या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवेदनही आयुक्तांना सादर केले. यावेळी भैरवनाथ साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांना साखर आयुक्तांनी फोनवर एफआरपी दिली की नाही याची विचारणा केली. त्यावर सावंत यांनी संपूर्णपणे एफआरपी दिली असे सांगितले. त्यावेळी आयुक्तांनी चर्चेसाठी शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याचे सुचवलेशेट्टी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, एफआरपी मिळाली नसल्याच्या त्यांचा दावा असल्याचे सांगितले. त्यावर सावंत यांनी, 'मी शिवसेनेचा नेता आहे. मी दहा कारखान्यांचा चेअरमन आहे.एफआरपी दिली, नाही दिली तरी तुमचा काय संबंध? थकीत एफआरपी विषयी आम्ही आणि साखर आयुक्त पाहून घेऊ,' असं सांगितलं. त्यानंतर शेट्टी यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन गाळप परवाना घेणा-या सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना तात्काळ निलंबित करावा, अशी मागणी करत तिथेच धरणे आंदोलन सुरू केले. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल घेत या कारखान्याच्या गाळप परवान्याचे तात्पुरते निलंबन करण्यात आले.यावेळी शेट्टी म्हणाले की, सावंत यांनी एफआरपी थकली नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून परवाना मिळवला आहे. त्यांच्या भैरवनाथ शुगर्स कारखान्याचा गाळप परवाना निलंबित करून थकीत एफआरपीची चौकशी व्हायलाच हवी. एफआरपी न दिलेल्या पंधरा कारखान्यावर कारवाई करावी.तसेच ज्या प्रकारे सातारा,सांगली,कोल्हापूरचा एफआरपी तिढा सुटला तसा लवकरच सोलापूर, पुणेसह बाकी महाराष्ट्रचा तिढा सोडवला जाईल.