शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:55 IST

पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले.

पुणे : पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिली, असे खोटे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करण्यात या मागणीसाठी शेट्टी यांनी आंदोलन केले होते. त्यांच्या या पवित्र्यानंतर उस्मानाबादच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्याच्या एफआरपी दराबाबत साखर आयुक्त संभाजी कडू पाटील व स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी साखर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देता ती दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून गाळप परवाना मिळविलेल्या कारखान्यांचे गाळप परवाने दिलेच कसे ? असा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना विचारला. या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवेदनही आयुक्तांना सादर केले. यावेळी भैरवनाथ साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांना साखर आयुक्तांनी फोनवर एफआरपी दिली की नाही याची विचारणा केली. त्यावर सावंत यांनी संपूर्णपणे एफआरपी दिली असे सांगितले. त्यावेळी आयुक्तांनी चर्चेसाठी शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याचे सुचवलेशेट्टी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, एफआरपी मिळाली नसल्याच्या त्यांचा दावा असल्याचे सांगितले. त्यावर सावंत यांनी, 'मी शिवसेनेचा नेता आहे. मी दहा कारखान्यांचा चेअरमन आहे.एफआरपी दिली, नाही दिली तरी तुमचा काय संबंध? थकीत एफआरपी विषयी आम्ही आणि साखर आयुक्त पाहून घेऊ,' असं सांगितलं. त्यानंतर शेट्टी यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन गाळप परवाना घेणा-या सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना तात्काळ निलंबित करावा, अशी मागणी करत तिथेच धरणे आंदोलन सुरू केले. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल घेत या कारखान्याच्या गाळप परवान्याचे तात्पुरते निलंबन करण्यात आले.यावेळी शेट्टी म्हणाले की, सावंत यांनी एफआरपी थकली नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून परवाना मिळवला आहे. त्यांच्या भैरवनाथ शुगर्स कारखान्याचा गाळप परवाना निलंबित करून थकीत एफआरपीची चौकशी व्हायलाच हवी. एफआरपी न दिलेल्या पंधरा कारखान्यावर कारवाई करावी.तसेच ज्या प्रकारे सातारा,सांगली,कोल्हापूरचा एफआरपी तिढा सुटला तसा लवकरच सोलापूर, पुणेसह बाकी महाराष्ट्रचा तिढा सोडवला जाईल.