शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीत वाढवूया आपल्यातील शक्ती आणि युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

खूप पालक हा प्रश्न आम्हा शिक्षकांना विचारतात की, आता ऑनलाइन शाळा संपली विद्यार्थी सुट्टीमध्ये काय करणार? आम्हीसुद्धा वर्क ...

खूप पालक हा प्रश्न आम्हा शिक्षकांना विचारतात की, आता ऑनलाइन शाळा संपली विद्यार्थी सुट्टीमध्ये काय करणार? आम्हीसुद्धा वर्क फ्रॉम होम आहोत, तर अशा परिस्थितीमध्ये या बालचमूंना कसे बिझी ठेवायचे हा प्रत्येक पालकाचा मोठा प्रश्न असतो.

पण, मी यावर असे म्हणेल की, आपण परत एकदा आपल्या बालपणामध्ये जावे आणि आपल्या लहानपणी आपण जसे बालपण मनापासून एंजॉय केले तसे बालपण या विद्यार्थ्यांना या बालचमूंना देण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. परत एकदा आठवा तर! ती लगोरी, विटीदांडू, लपंडाव ,पत्त्यांचा बंगला, काचकमळ, सागर गोटे, ॲपलचंपल, लंगडी, चप्पी असे कितीतरी खेळ आपण खेळत असू. दुपारच्या वेळेला आपण घरातले कितीतरी खेळ विद्यार्थ्यांबरोबर खेळू शकतो अगदी सांगायचे झाले तर आज काच कमळ किंवा पत्त्यांचा बंगला यातून आपल्या आईबाबांनी आपल्या आजी-आजोबांनी आपल्याला मनाची एकाग्रता कशी ठेवायची हे शिकवले. सागरगोटेमुळे सुद्धा आपल्याला टाईम मॅनेजमेंट बरोबर कळते. लगोरीमध्ये आपल्याला नेम कसा रोखायचा, नेम कसा ठेवायचा, नजर कशी तीक्ष्ण ठेवायची हे आपल्याला समजते. घर छोटे असले, तरी दोघात-तिघात रस्सीखेच सारखे खेळही खेळता येऊ शकेत ज्यातून स्थिरता, ताकद आणि एकाग्रता सारख्या गोष्टी वाढीस लागतील. असेच छोटे छोटे खेळ आपण या बालचमूंन बरोबर खेळू शकतो. फक्त एकच विनंती की आपल्याला आपल्या लहान वयात परत एकदा जावे लागेल. आजकालच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा खूप लोड दिला जातो. आपले बालपण आठवा आणि आताच्या मुलांचे बालपण, ही मुलं प्रॅक्टिकल होत चालली आहे. असं मला वाटतं. या मुलांमध्ये प्रेम, भावना, जिव्हाळा, माया, आपुलकी, शिस्त, संस्कार आपणच रुजवायला पाहिजे.

ही छोटी मुलं हल्ली आपलं आपलं राहणं पसंत करतात. त्यांच्याशी संवाद साधून आपण आपल्या घरातील जबाबदाऱ्या त्यांच्याशी बोलल्या पाहिजे फक्त घरातल्या आईबाबांचे कर्तव्य घर सांभाळण्याचे नाही तर घरातील प्रत्येक सदस्याचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी आपली जबाबदारी सांभाळून एकमेकांना सांभाळून, साथ देऊन, जबाबदारी, कर्तव्य पाळले पाहिजे त्यांच्या समोर बोलताना आपण नकारात्मक न बोलता सकारात्मकच बोलले पाहिजे. घरातील प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण त्यांना लहान वयात आदर शिकवू शकतो.

या corona काळात याने आपल्याला खूप काही शिकवले. किंबहुना आज हा मनाचा गॅप आपल्यासाठी आवश्यक होता असे मला वाटते.

यामुळेच माणसाला माणसाची खरी किंमत कळाली. याच तर भावना आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचा आहेत. मिळालेल्या मोकळ्या वेळेमध्ये छान छान गोष्टी आपण जर या विद्यार्थ्यांना सांगितल्या काही स्वतःचे अनुभव जर सांगितले तर आपल्या मध्ये आणि आपल्या पाल्यामध्ये खूप छान बॉण्डिंग तयार होऊ शकते आणि हीच ती आता योग्य वेळ आहे. म्हणून आपण शांत राहून संयमी राहून बाहेरच्या परिस्थितीला तोंड देऊन हा वेळ जास्तीत जास्त आपल्या पाल्यांना देऊन त्याचा नक्कीच छान सदुपयोग करू!!!!!!

--

फोटो १ - रस्सीखेच कार्ट

फोटो -२ अनघा दातार