शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नक्षलवाद्यांच्या भूमिकेवरही नाटक येऊ द्या; नाट्यलेखक राजीव नाईक परखड मत

By श्रीकिशन काळे | Updated: November 17, 2023 14:26 IST

लोकशाहीवादी रंगभूमीवर प्रत्येकाला सर्वप्रकारचे नाटक करण्याचे स्वातंत्र्य हवं

पुणे : एखादा नक्षलवादी असेल तर त्याला त्याची बाजू मांडू दिली पाहिजे. नक्षलवाद्यावर नाटक येत असेल तर ते होऊ दिले पाहिजे. ते न पाहताच केवळ नावावरून तुम्ही त्यावर टीका करू नका. ते पहा आणि मग ठरवा ते नाकारायचे की स्वीकारायचे. मला अमान्य असलेल्या गोष्टी देखील लोकशाहीवादी रंगभूमीवर यायला हव्यात, असे परखड मत ज्येष्ठ नाट्यलेखक राजीव नाईक यांनी व्यक्त केले.

रूपवेध प्रतिष्ठान, पुणे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात रंगकर्मी लकी गुप्ता यांना ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ नाईक यांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी दीपा श्रीराम लागू, आनंद लागू, डॉ. मोहन आगाशे, एस. पी. कुलकर्णी, राजेश देशमुख आदी उपस्थित होते. पुरस्कार प्रदान केल्यानंतर लकी गुप्ता यांनी ‘माँ मुझे टागोर बना दो’ याचे सादरीकरण केले.

लोकशाहीवादी रंगभूमीवर प्रत्येकाला सर्वप्रकारचे नाटक करण्याचे स्वातंत्र्य हवं. तात्विक, विचारांमध्ये मतभेद असले तरी देखील, समोरच्यावर केवळ टीका न करता त्याचे म्हणणं जाणून घ्यायला हवं. ते जाणून मग तुम्ही बोलू शकता की, ते योग्य आहे की अयोग्य. पण नाटक न बघता केवळ नावावरून त्यावर टीका करणे कधीच मान्य होणार नाही, असे नाईक म्हणाले.

जर शब्दांची रंगभूमी नको असेल आणि कमानी रंगमंचावरील नाटकाला मुक्त करायचे आहे, तर त्याला ते मुक्त करता यायला हवे. त्याला जर त्या बॉक्समधून बाहेर पडायचे असेल तर ते पडू द्यावे. हेच खऱ्या लोकशाहीवादी रंगभूमीचे लक्षण असते, असे नाईक यांनी सांगितले.

लोकशाहीचे महत्त्व हे आहे की, त्यामध्ये सावरकरवादी, गांधीवादी, मार्क्सवादी हे एकमेकांचे ऐकतात. ऐकू शकतात. तुमची भूमिका ही तुम्ही मांडली पाहिजे. एका भूमिकेवर ठाम राहा. तुम्ही जर सर्वांचे ऐकाल तर भोंगळ व्हाल ना ! भूमिका तर घेतलीच पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट अमान्य करत असाल तर त्यावर टीका करू शकता. पण ती गोष्ट पहा आणि मग करा. - राजीव नाईक, ज्येष्ठ नाट्यलेखक

टॅग्स :PuneपुणेartकलाSocialसामाजिकcultureसांस्कृतिक